शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

नित्यानंद झगडे यांचा पिशवीतला आंबा

By admin | Updated: June 8, 2015 00:48 IST

त्या आंब्याच्या मोहरानंतर आलेल्या कैरीला अडकविण्यात आल्या. यामुळे कैरीचे तयार आंब्यात रुपांतर होत असतानाच्या दोन-तीन महिन्याच्या कालावधीत त्या फळाचे सुर्याच्या कडक उष्णतेपासून संरक्षण करता आले.

मंदार गोयथळे - असगोलीकोकण कृषी विद्यापीठामधून मिळालेल्या प्रशिक्षणातून ‘मँगो बॅगिंग’ पद्धतीचा वापर पहिल्या वर्षी आपल्या बागेतील आंब्याच्या एका झाडावर करण्याचे निश्चित केले. त्यानुसार झाडावर आलेल्या ४५० पैकी सरासरी २०० कैऱ्यांना कागदी पेपरच्या पिशव्या गुंडाळून बॅगिंग केले. जेव्हा या कैरीचे तयार आंब्यात रुपांतर झाले तेव्हा ते फळ खाली उतरवून पिकवले असता ‘बँगिग’ केलेल्या आंब्याचे फळ इतर आंब्यांपेक्षा पिवळे धम्मक व अधिक रसाळ असल्याचे पाहायला मिळाले. शिवाय ‘बॅगिंग’ केल्यामुळे झाडावरील एकही फळ वानरांच्या नजरेस न पडल्याने आंब्याचे आपोआप संरक्षण झाले. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या ‘बॅगिंग’चा प्रयोग आंब्याचे संरक्षण, दर्जा व चव टिकवण्यासाठी खरोखरच उपयोगी पडल्याचे मत असगोलीमधील प्रगतशील बागायतदार नित्यानंद झगडे यांनी व्यक्त केले.गुहागर नगरपंचायत क्षेत्रात येणाऱ्या असगोली या भागात नित्यानंद झगडे यांनी आपल्या बागेमध्ये आंब्यांची शेकडो कलमे लावली आहेत. यावर्षीच्या हंंगामासाठी डिसेंबर २०१४मध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्यावतीने जिल्ह्यातील प्रगतशील बागायतदारांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. त्या आंबा छाटणी व अन्य विषयाच्या प्रशिक्षणात बागायतदारांना ‘मँगो बॅगिंग’ ही नवीन पद्धत अवलंबण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानुसार नित्यानंद झगडे यांनी आपल्या बागेतील एका झाडावर हा प्रयोग करण्याचे निश्चित केले. यापूर्वीच झगडे यांनी आपल्या आबा कलमांची उंची १० ते ११ फुटांवर छाटणी करुन घेतल्याने त्यांना ‘मँगो बॅगिंग’ची नवीन पद्धत राबविणे अधिक सोपे गेले. साधारण अर्ध्या फुटाच्या पेपरच्या कागदी पिशव्या तयार करुन त्या आंब्याच्या मोहरानंतर आलेल्या कैरीला अडकविण्यात आल्या. यामुळे कैरीचे तयार आंब्यात रुपांतर होत असतानाच्या दोन-तीन महिन्याच्या कालावधीत त्या फळाचे सुर्याच्या कडक उष्णतेपासून संरक्षण करता आले. मधमाशी व इतर कीड लागणाऱ्या कीटकांपासून व फळांचे रक्षण झाले. तसेच मुख्य म्हणजे फळ तयार होत असताना ते कागदी पिशवीमुळे वानर व माकडांच्या नजरेत न आल्याने त्या फळाचे आपोआप संरक्षण झाल्याचा मोठा फायदा या नव्या पद्धतीमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले.जेव्हा आंब्याचे ५० टक्के फळ तयार झाल्याचे लक्षात आले तेव्हा पुन्हा हाताने सर्व तयार आंबे पिकण्याच्या प्रक्रियेसाठी खाली उतरविण्यात आले. उतरविल्यानंतर साधारणत: ८ ते १० दिवसानंतर जेव्हा ते फळ पिकले तेव्हा त्यांचा रंग इतर सर्वसाधारण आंब्यापेक्षा अधिक पिवळा धम्मक असल्याचे व फळ कापून खाल्ले असता अधिक गोड व रसाळ असल्याचे अनुभवायला मिळाले. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाच्यावतीने प्रगतशील व बागायतदारांसाठी मार्गदर्शन करण्यात आलेली ‘मँगो बॅगिंग’ची पद्धत हापूस आंब्याच्या संरक्षण, त्यांना आकर्षक व अधिक रसाळ बनवण्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे. असगोलीतील शेतकऱ्याने नव्या उपक्रमासाठी संशोधन केले व त्यातून कोकणातील आंबा उत्पादकांसाठी त्याचा कसा फायदा करून घेता येईल याबाबत विचार केला. त्याच्या नव्या प्रयोगातून फळाची संख्या व चव यातील परिणाम सकारात्मक असल्याचे सिध्द जाले आहे.