शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

नित्यानंद झगडे यांचा पिशवीतला आंबा

By admin | Updated: June 8, 2015 00:48 IST

त्या आंब्याच्या मोहरानंतर आलेल्या कैरीला अडकविण्यात आल्या. यामुळे कैरीचे तयार आंब्यात रुपांतर होत असतानाच्या दोन-तीन महिन्याच्या कालावधीत त्या फळाचे सुर्याच्या कडक उष्णतेपासून संरक्षण करता आले.

मंदार गोयथळे - असगोलीकोकण कृषी विद्यापीठामधून मिळालेल्या प्रशिक्षणातून ‘मँगो बॅगिंग’ पद्धतीचा वापर पहिल्या वर्षी आपल्या बागेतील आंब्याच्या एका झाडावर करण्याचे निश्चित केले. त्यानुसार झाडावर आलेल्या ४५० पैकी सरासरी २०० कैऱ्यांना कागदी पेपरच्या पिशव्या गुंडाळून बॅगिंग केले. जेव्हा या कैरीचे तयार आंब्यात रुपांतर झाले तेव्हा ते फळ खाली उतरवून पिकवले असता ‘बँगिग’ केलेल्या आंब्याचे फळ इतर आंब्यांपेक्षा पिवळे धम्मक व अधिक रसाळ असल्याचे पाहायला मिळाले. शिवाय ‘बॅगिंग’ केल्यामुळे झाडावरील एकही फळ वानरांच्या नजरेस न पडल्याने आंब्याचे आपोआप संरक्षण झाले. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या ‘बॅगिंग’चा प्रयोग आंब्याचे संरक्षण, दर्जा व चव टिकवण्यासाठी खरोखरच उपयोगी पडल्याचे मत असगोलीमधील प्रगतशील बागायतदार नित्यानंद झगडे यांनी व्यक्त केले.गुहागर नगरपंचायत क्षेत्रात येणाऱ्या असगोली या भागात नित्यानंद झगडे यांनी आपल्या बागेमध्ये आंब्यांची शेकडो कलमे लावली आहेत. यावर्षीच्या हंंगामासाठी डिसेंबर २०१४मध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्यावतीने जिल्ह्यातील प्रगतशील बागायतदारांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. त्या आंबा छाटणी व अन्य विषयाच्या प्रशिक्षणात बागायतदारांना ‘मँगो बॅगिंग’ ही नवीन पद्धत अवलंबण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानुसार नित्यानंद झगडे यांनी आपल्या बागेतील एका झाडावर हा प्रयोग करण्याचे निश्चित केले. यापूर्वीच झगडे यांनी आपल्या आबा कलमांची उंची १० ते ११ फुटांवर छाटणी करुन घेतल्याने त्यांना ‘मँगो बॅगिंग’ची नवीन पद्धत राबविणे अधिक सोपे गेले. साधारण अर्ध्या फुटाच्या पेपरच्या कागदी पिशव्या तयार करुन त्या आंब्याच्या मोहरानंतर आलेल्या कैरीला अडकविण्यात आल्या. यामुळे कैरीचे तयार आंब्यात रुपांतर होत असतानाच्या दोन-तीन महिन्याच्या कालावधीत त्या फळाचे सुर्याच्या कडक उष्णतेपासून संरक्षण करता आले. मधमाशी व इतर कीड लागणाऱ्या कीटकांपासून व फळांचे रक्षण झाले. तसेच मुख्य म्हणजे फळ तयार होत असताना ते कागदी पिशवीमुळे वानर व माकडांच्या नजरेत न आल्याने त्या फळाचे आपोआप संरक्षण झाल्याचा मोठा फायदा या नव्या पद्धतीमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले.जेव्हा आंब्याचे ५० टक्के फळ तयार झाल्याचे लक्षात आले तेव्हा पुन्हा हाताने सर्व तयार आंबे पिकण्याच्या प्रक्रियेसाठी खाली उतरविण्यात आले. उतरविल्यानंतर साधारणत: ८ ते १० दिवसानंतर जेव्हा ते फळ पिकले तेव्हा त्यांचा रंग इतर सर्वसाधारण आंब्यापेक्षा अधिक पिवळा धम्मक असल्याचे व फळ कापून खाल्ले असता अधिक गोड व रसाळ असल्याचे अनुभवायला मिळाले. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाच्यावतीने प्रगतशील व बागायतदारांसाठी मार्गदर्शन करण्यात आलेली ‘मँगो बॅगिंग’ची पद्धत हापूस आंब्याच्या संरक्षण, त्यांना आकर्षक व अधिक रसाळ बनवण्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे. असगोलीतील शेतकऱ्याने नव्या उपक्रमासाठी संशोधन केले व त्यातून कोकणातील आंबा उत्पादकांसाठी त्याचा कसा फायदा करून घेता येईल याबाबत विचार केला. त्याच्या नव्या प्रयोगातून फळाची संख्या व चव यातील परिणाम सकारात्मक असल्याचे सिध्द जाले आहे.