शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

नीतेश राणे यांनी स्टंटबाजी करू नये

By admin | Updated: January 19, 2015 00:22 IST

वैभव नाईक : भात खरेदी दोन दिवसांत सुरू होणार

कणकवली : युतीमधील नेते धान्य खरेदी संदर्भात प्रयत्न करत होते. शासनाने भात खरेदीसाठी हिरवा कंदील दाखवला असून येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी भातखरेदीचे आदेश काढणार आहेत. त्यामुळे आमदार नीतेश राणे यांनी आंदोलनाची स्टंटबाजी करू नये, असे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे. ते कणकवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते.नाईक पुढे म्हणाले, राज्य मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेल्या गोदामातील भाताची शासनाने उचल केलेली नव्हती. नागपूर अधिवेशनापासून मी स्वत: आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करत होतो. केंद्रीय खाद्यमंत्री रामविलास पासवान यांच्याकडेही यासंदर्भात बैठक घेऊन मंत्री बापट यांनी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी थांबलेल्या भातखरेदीसंदर्भात प्रयत्न चालवले होते. जिल्ह्यातील गोदामांची साठवण क्षमता कमी आहे. ज्यांच्या ताब्यात खरेदीविक्री संघ आहेत तेच गोदामे सुरक्षित नसल्याचे सांगत आहेत. कॉँग्रेसच्या सत्ताकाळात गोदामे उभारण्यासाठीही निधी आणण्यात आला नाही. त्यामुळे आमदार राणेंनी दिखावू आंदोलने करू नयेत, असे नाईक म्हणाले.गेल्या नियोजन बैठकीत हत्ती हटावसाठी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच केंद्र सरकारकडून यापूर्वीच ३० लाखाच्या निधीची तरतूद झाली आहे. परराज्यातील पाळीव हत्ती आणण्यासाठी दोन-तीन दिवसांत परवानगी मिळेल. जिल्ह्यातील कॉँग्रेस नेत्यांनी इकोसेन्सिटिव्ह संदर्भात केलेली आंदोलने दिखावू ठरली. युती सरकार आल्यानंतर याप्रश्नी विशेष अ‍ॅटर्नी जनरल देऊन प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. भविष्यात हा प्रश्न उदभवणार नाही, असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अद्याप प्रश्न सुटला नाही; बुधवारी मंत्र्यांची बैठकनीतेश राणेंनी कोल्हापूर बसस्थानकांसंदर्भातील एसटीचा प्रश्न सोडवल्याचे फुकाचे श्रेय घेतले. मात्र, अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही. बुधवारी यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्वप्रकारचे कर भरत असल्याने एसटी बसला कुठल्याही स्थानकात जाण्याचा अधिकार असल्याची शिवसेनेची भूमिका आहे, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. आंगणेवाडीतील रस्त्यासाठी निधी मंजूरमुंबई-आंगणेवाडी अशा दोन थेट विशेष व्होल्व्हो गाड्या सोडण्याची मागणीही रावते यांच्याकडे करणार आहे. परेल- मालवण व्हाया आंगणेवाडी अशा या बस सोडण्यात येतील. आंगणेवाडी बसस्थानक ते मंदिरापर्यंतच्या रस्त्यासाठी ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.