शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

निरवडेत आंबा, काजू बागा खाक

By admin | Updated: April 27, 2016 23:23 IST

सहा लाखांचे नुकसान : गावठी बॉम्ब फुटल्याने आग लागल्याचा ग्रामस्थांचा संशय; काढणीवेळी आंब्याचे नुकसान

तळवडे : निरवडे-कोनापाल (बाईतवाडी) येथे दोन एकर जागेतील आंंबा-काजू बागेस मंगळवारी आग लागून एकूण सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. सावंत कुटुंबीय, नामदेव पांढरे, अमरनाथ वैज यांच्या आंबा बागेस मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीच्या भडक्याने रमाकांत सावंत, पांढरे आणि वैज कुटुंबीयांची आंबा व काजूची कलमे जळून खाक झाली.निरवडे-कोनापाल (बाईतवाडी) येथे दोन एकर जागेतील आंंबा-काजू बागेस मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागून मोठी हानी झाली आहे. यामध्ये आंबा, काजू कलमे जळून खाक झाली. विशेष म्हणजे यामध्ये काढणीस आलेल्या आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. तयार आंब्यांच्या १५० पेट्यांचे नुकसान झाले असून, या नुकसानीचा विचार केल्यास ढोबळमानाने केवळ दोन लाखांचे नुकसान झाले, तर जळालेल्या आंबा कलमांचे चार लाख असे एकूण सहा लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी, निरवडे तलाठी अजित वैज, प्रमोद गावडे, तळवडे सरपंच व आंबा व्यापारी पंकज पेडणेकर, आंबा व्यापारी सदा सावंत, रमण सावंत व शेतकरी जमा झाले होते. अन्य सहकारी वर्गाने ही आग आटोक्यात आणली, अन्यथा मोठे नुकसान झाले असते. ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने अन्य ठिकाणी त्याची झळ पोहोचली नाही. अन्यथा शेजारील बागेचे मोठे नुकसान झाले असते. दरम्यान, ही आग गावठी बॉम्ब फुटल्यामुळे लागल्याचा संशय उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. रानटी डुकरांना मारण्यासाठी गावठी बॉम्ब जंगलामध्ये ठेवले जातात. हे गावठी बॉम्ब जंगलात लावण्याचे प्रकार वाढले असून याचे लोन आता ग्रामीण भागातही पसरत आहे. त्याचाच हा परिणाम आहे. आंबा-काजू बागेत बॉम्ब ठेवण्याचा हा उद्देश जरी वन्य प्राण्यांना हुसकावण्याचा असला तरी शिकारीसाठीही याचा उपयोग होऊ शकतो. तसेच हा घडलेला आगीचा प्रकारही त्यामुळेच घडला असून वन विभागाने याची दखल न घेतल्याने असा प्रकार घडल्याचा आरोपही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, तळवडे गावचे सरपंच पंकज पेडणेकर यांची याठिकाणी आंबा बाग करारावर आहे. यात सावंत कुटुंबीयांची बाग त्यांनी करारावर घेतली. पण बहरात आलेल्या बागेलाच आग लागल्याने ते कमालीचे हताश झाले होते. त्यांनी या घटनेबद्दल संतापासह तीव्र नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)