शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

निरवडेत आंबा, काजू बागा खाक

By admin | Updated: April 27, 2016 23:23 IST

सहा लाखांचे नुकसान : गावठी बॉम्ब फुटल्याने आग लागल्याचा ग्रामस्थांचा संशय; काढणीवेळी आंब्याचे नुकसान

तळवडे : निरवडे-कोनापाल (बाईतवाडी) येथे दोन एकर जागेतील आंंबा-काजू बागेस मंगळवारी आग लागून एकूण सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. सावंत कुटुंबीय, नामदेव पांढरे, अमरनाथ वैज यांच्या आंबा बागेस मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीच्या भडक्याने रमाकांत सावंत, पांढरे आणि वैज कुटुंबीयांची आंबा व काजूची कलमे जळून खाक झाली.निरवडे-कोनापाल (बाईतवाडी) येथे दोन एकर जागेतील आंंबा-काजू बागेस मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागून मोठी हानी झाली आहे. यामध्ये आंबा, काजू कलमे जळून खाक झाली. विशेष म्हणजे यामध्ये काढणीस आलेल्या आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. तयार आंब्यांच्या १५० पेट्यांचे नुकसान झाले असून, या नुकसानीचा विचार केल्यास ढोबळमानाने केवळ दोन लाखांचे नुकसान झाले, तर जळालेल्या आंबा कलमांचे चार लाख असे एकूण सहा लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी, निरवडे तलाठी अजित वैज, प्रमोद गावडे, तळवडे सरपंच व आंबा व्यापारी पंकज पेडणेकर, आंबा व्यापारी सदा सावंत, रमण सावंत व शेतकरी जमा झाले होते. अन्य सहकारी वर्गाने ही आग आटोक्यात आणली, अन्यथा मोठे नुकसान झाले असते. ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने अन्य ठिकाणी त्याची झळ पोहोचली नाही. अन्यथा शेजारील बागेचे मोठे नुकसान झाले असते. दरम्यान, ही आग गावठी बॉम्ब फुटल्यामुळे लागल्याचा संशय उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. रानटी डुकरांना मारण्यासाठी गावठी बॉम्ब जंगलामध्ये ठेवले जातात. हे गावठी बॉम्ब जंगलात लावण्याचे प्रकार वाढले असून याचे लोन आता ग्रामीण भागातही पसरत आहे. त्याचाच हा परिणाम आहे. आंबा-काजू बागेत बॉम्ब ठेवण्याचा हा उद्देश जरी वन्य प्राण्यांना हुसकावण्याचा असला तरी शिकारीसाठीही याचा उपयोग होऊ शकतो. तसेच हा घडलेला आगीचा प्रकारही त्यामुळेच घडला असून वन विभागाने याची दखल न घेतल्याने असा प्रकार घडल्याचा आरोपही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, तळवडे गावचे सरपंच पंकज पेडणेकर यांची याठिकाणी आंबा बाग करारावर आहे. यात सावंत कुटुंबीयांची बाग त्यांनी करारावर घेतली. पण बहरात आलेल्या बागेलाच आग लागल्याने ते कमालीचे हताश झाले होते. त्यांनी या घटनेबद्दल संतापासह तीव्र नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)