शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

११५ ग्रामपंचायतींसाठी निर्मल अभियान

By admin | Updated: November 2, 2014 23:30 IST

कुडाळ तालुक्याचा आढावा : पांढरपट्टेंची तेंडोली, आंदुर्ले गावांना भेट

कुडाळ : कुडाळ तालुक्यामध्ये ११५ ग्रामपंचायती निर्मल व्हायच्या आहेत. ही गावे डिसेंबर २०१४ पर्यंत निर्मल करण्यासाठी शौचालय उभारावेत, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांना दिले आहेत. ते कुडाळ तालुक्यात आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी तेंडोली व आंदुर्ले या ग्रामपंचायतींना भेट दिली. निर्मल भारत अभियानात कुडाळ तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींपैकी ४४ ग्रामपंचायती निर्मल झाल्या. २५ ग्रामपंचायती निर्मल व्हायच्या होत्या. त्यापैकी दहा ग्रामपंचायतींचे निर्मलसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्या ग्रामपंचायती लवकरच निर्मल पुरस्कारासाठी जाहीर होतील, अशी आशा जिल्हा परिषदेला आहे. दरम्यान, तालुक्यातील आंदुर्ले, गोवेरी, पाट-परबवाडा, तेंडोली, झाराप, तेर्सेबांबर्डे, माणगाव, नेरूर कर्याद नेरूर, हिर्लोक, जांभवडे, सोनवडे तर्फ कळसुली, कुपवडे, महादेवाचे केरवडे या ग्रामपंचायती अद्याप निर्मल झालेल्या नाहीत. गावामध्ये आवश्यक असलेले शौचालय सुध्दा उभारण्यात आलेले नाही. हे गाव निर्मल व्हावे, अशी गावातल्या ग्रामस्थांची मानसिकता नसली, तरी प्रशासकीय यंत्रणेची हे गाव निर्मल करण्याची इच्छा आहे. कारण हे गाव निर्मल न झाल्यास प्रशासनावर ठपका बसणार आहे. त्यामुळे प्रशासनातील कर्मचारी या ग्रामपंचायती निर्मल करण्यासाठी विशेष प्रयत्नरत आहेत. काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तर या ग्रामपंचायती दत्तक घेऊन स्वच्छतेचे महत्त्व, शौचालयाचे महत्त्व आदीबाबत जनजागृती केली आहे. काही धरणग्रस्त भागांमध्ये शौचालय बांधणीसाठी बऱ्याच शासकीय अटींचा अडसर येत आहे. पण काही ग्रामपंचायतींमध्ये अडचणी नसल्या, तरी गाव निर्मल करण्याची मानसिकता होत नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी कुडाळ पंचायत समितीची भेट घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी तालुक्यातील १५ ग्रामपंचायती निर्मल झाल्या नसल्याचे दिसून आले. हे गाव येत्या डिसेंबरपर्यंत निर्मल करण्याठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांच्यासमवेत कुडाळ तालुका गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या पिंगुळी या जिल्हा परिषद मतदारसंघात ३ ग्रामपंचायती निर्मल आहेत. यामध्ये आंदुर्ले, पाट परबवाडा, तेंडोली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायती निर्मल करण्यासाठी शासन स्तरावरून विशेष प्रयत्न सुरू आहेत. (वार्ताहर)