शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

संकुलातील ९ गाळे चोवीस तासांत ताब्यात घेणार

By admin | Updated: March 13, 2015 23:59 IST

पालिका बैठकीत साळगावकरांचा इशारा : ३९ गाळेधारकांकडून नियमांचे उल्लंघन

सावंतवाडी : इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील ३९ गाळ््यांपैकी नऊ गाळेधारकांनी पूर्णत: नगरपालिकेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांचे गाळे पालिका २४ तासांच्या आत ताब्यात घेणार असून, उर्वरित गाळेही लवकरच खाली करणार, असा इशारा सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला. तसेच ३९ गाळेधारकांपैकी १५ गाळेधारकांनी दिलेली लेखी उत्तरे समाधानकारक नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक विलास जाधव, अ‍ॅड. अरुण पणदूरकर, संजय पेडणेकर, गोविंद वाडकर, देवेंद्र टेमकर, अनारोजिन लोबो, शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे, अफरोझ राजगुरू, शुभांगी सुकी, साक्षी कुडतरकर, क्षिप्रा सावंत, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी इंदिरा गांधी संकुलातील गाळेधारकांबाबतचा ठराव नगरसेवक संजय पेडणेकर यांनी वाचला. त्यावर अ‍ॅड. पणदूरकर यांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की, संकुलातील ३९ गाळेधारकांनी पालिका नियमाचे पूर्णत: उल्लंघन केले असून त्यातील ९ गाळेधारकांनी तर इमारतीचे स्ट्रक्चरच बदलून टाकले आहे. त्यामुळे या गाळ््यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच १९८३ च्या स्थावर मालमत्ता हस्तांतर कायद्यानुसार हे गाळे पालिका ताब्यात घेऊ शकते, असेही यावेळी अ‍ॅड. पणदूरकर म्हणाले.तर उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक विलास जाधव, गोविंद वाडकर, नगरसेविका अनारोजिन लोबो, शुभांगी सुकी, वैशाली पटेकर, अफरोझ राजगुरू यांनी या गाळेधारकांवर कडक कारवाई करावी तसेच भविष्यात इमारतीला धोका उद्भवला तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार आहे. आम्ही कोणतीही जबाबदारी घेणार नाही तसा ठराव घ्यावा, असे नगरसेवकांनी यावेळी सांगितले. तसेच प्रशासनाने दिलेला अहवाल चुकीचा असून ते नगरसेवकांच्या डोळ्यात धूळफेक करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.यावर नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, सभागृहाच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे गाळेधारकांनी केलेले कृत्य हे अतिशय गंभीर स्वरूपाचे असून या गाळेधारकांवर पालिका नियमाप्रमाणे कारवाई करणार आहे, पण त्यातील ९ गाळेधारकांचे गाळे हे चोवीस तासात पालिका ताब्यात घेणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. आम्ही नागरिकांचे हित पहिल्यांदा जपणार असून, इमारतीला धोका उद्भवला तर त्याची भरपाई कोण देणार, असा सवाल करत या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात येणार आहे. या इमारतीच्या गाळ््याची दर चार महिन्यांनी पाहणी केली जाईल, असेही नगराध्यक्ष म्हणाले. (प्रतिनिधी)