शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

घरबांधणीबाबत नवा आदेश क्लिष्ट

By admin | Updated: February 11, 2016 23:41 IST

जिल्हा परिषद स्थायी समिती सभा : शासनाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्याचा ठराव

सिंधुदुर्गनगरी : घरबांधणी परवानगी दाखल्यांच्या मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतीऐवजी तहसीलदारांकडे दिल्यामुळे त्यातील क्लिष्टता वाढली आहे. शासनाच्या या नवीन आदेशानुसार परवानगीसाठी विविध १९ कागदपत्रांची आवश्यकता आहे. केवळ सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यापुरत्या घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्याचा ठराव गुरुवारी एकमताने स्थायी समिती सभेत घेण्यात आला. शिक्षण विभागाची व पर्यायाने जिल्हा परिषदेची बदनामी करणाऱ्या शिक्षक संघटनांवर कारवाई करण्याचाही निर्णय यावेळी घेतला. येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात संग्राम प्रभूगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी सभापती दिलीप रावराणे, आत्माराम पालयेकर, महिला व बालविकास सभापती रत्नप्रभा वळंजू, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव तसेच सदस्य सतीश सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, प्रमोद कामत, वंदना किनळेकर, रेवती राणे, पुष्पा नेरूरकर, श्रावणी नाईक उपस्थित होते.ग्रामीण भागात घर बांधायचे असल्यास ग्रामपंचायत परवानगी देत असे. मात्र, हा अधिकार काढून तो तहसीलदारांना दिला आहे. यासंदर्भात सतीश सावंत म्हणाले की, घरबांधणीच्या या दाखल्यांसाठी आता १९ प्रकारचे कागद जोडावे लागतात. त्यामुळे क्लिष्टता वाढली आहेच, शिवाय ग्रामपंचायतीचे उत्पन्नही बंद झाले आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी एकतर गावठण जाहीर करावे व जिल्हा परिषदेने या निर्णयाविरोधात याचिका दाखल करावी.कुडाळ तालुक्यातील भडगाव येथील शिक्षिकेने पोषण आहारात अफरातफर केल्याने तिची एका वर्षाची वेतनवाढ रोखल्याचे शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांनी सांगितले. मात्र, त्या शाळेतील दोन शिक्षकांच्या वादात ती शाळाच बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने दोन्ही शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, असे सतीश सावंत यांनी सांगितले.तळवडे हायस्कूल पोषण आहार अफरातफरविषयी मुख्याध्यापकाचे निलंबन करण्याची मंजुरी शाळा समितीने मागितली होती. ती त्यांना दिली आहे. मात्र, निलंबन संस्था स्तरावर होणार असल्याचे धाकोरकर यांनी सांगितले.ग्रामस्वच्छता अभियान बंद करून दुसरे अभियान सुरू करण्याचा घाट शासनाने घातला आहे. ही योजना सुरु ठेवून योजनेचे नावही संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान असेच ठेवावे, असा ठराव करून शासनाला पाठविण्याचे अध्यक्षांनी सांगितले.कुडाळ ग्रामपंचायतीने मागासवर्गीय वस्तीमध्ये प्रेशर कुकर वाटण्याची योजना हाती घेतली होती. वास्तविक ती योजना त्या वस्तीवर लादली होती. त्याची चौकशी व्हावी तसेच नगरपंचायत जाहीर झाली म्हणून या गैरव्यवहारांना ग्रामपंचायत विभाग पाठीशी घालणार का, असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला.समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी तांडा वस्तीचे सर्वेक्षण गेल्या वर्षभरात होऊ शकलेले नाही ते महिनाभरात पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी केली. तसेच सतीश सावंत यांनी अशा दुर्गम वस्त्यांना विशेष बाब म्हणून प्राधान्याने वीज जोडणी द्यावी, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)बदनामी करणाऱ्या संघटनांवर कारवाई करावीप्रगत शिक्षण महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हा शिक्षण विभागाची कामगिरी खूपच खराब आहे. तसेच शिक्षणाधिकारी निष्क्रिय आहेत, अशी वक्तव्ये शिक्षक संघटनांकडून केली गेली.शिक्षण विभागाची व पर्यायाने जिल्हा परिषदेची बदनामी करणाऱ्या संघटनांवर कारवाई करावी, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले. तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी संघटनेच्या कामाच्या नावाखाली शाळेत उशिरा जातात त्यांचीही चौकशी करावी, असे ते म्हणाले.जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांनी कोकणात भरपूर पाणी असल्याने येथील सिंचन बंधारे योजना बंद करावी, असा निर्णय मंत्रिमंडळात घेतला. मात्र, सिंचनाची माहिती घ्यावी मगच वक्तव्य करावे, असे सतीश सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यासाठी स्वतंत्र वीज निरीक्षक नेमावासिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती वीज मीटरची संख्या वाढली आहे. म्हणूनच जिल्ह्यासाठी स्वतंत्र वीज निरीक्षक नेमावा, जेणेकरून येथील ग्राहकांची कित्येक महिन्यांपासूनची वीज जोडणीची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लागतील, अशी मागणी सतीश सावंत यांनी केली. बोगस कीटकनाशकांमुळे आंबा बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशा बोगस औषधांचा वापर करू नये, असे शेतकरी आणि बागायतदारांना एस.एम.एस.द्वारे सातत्याने सांगावे, अशी मागणीही सावंत यांनी केली.पाटबंधारे कार्यालयाचे स्थलांतर नकोतिलारीतील पाटबंधारे कार्यालय जलसंपदामंत्र्यांनी जळगावला हलविण्याचा घाट घातला आहे. कार्यालय स्थलांतरित करू नये, असा ठरावही घेण्यात आला.