कणकवली : शहरातील काही कचरापेट्यांची आयुष्य मर्यादा संपल्याने त्यांच्या जागी नव्या कचरापेट्या आणल्या जाणार आहेत. नगरपंचायतीकडून यासाठी दर मागवण्यात आले आहेत. नव्या कचरापेट्या या गॅल्व्हनाईज्ड प्रकारच्या असतील. त्या जास्त टिकाऊ असतील, असे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.कणकवलीत सध्या ३० कचरापेट्या आहेत. या कचरापेट्या लोखंडी पत्र्याच्या आहेत. यातील बहुतांश कचरापेट्या खराब झाल्या आहेत. यापूर्वी यातील काही पेट्या दुरूस्त करून घेण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या पुन्हा खराब झाल्या आहेत. त्यामुळे सुमारे २० कचरा पेट्यांच्या जागी नव्या गॅल्व्हनाईज्ड कचरापेट्या बसवल्या जातील. गॅल्व्हनाईज्ड कचरापेट्या लोखंडी पत्र्याच्या पेट्यांपेक्षा जास्त काळ टिकतील. कोंडवाड्यासाठी पुढाकार नाहीशहरात मोकाट गुरे फिरत असून ही गुरे कचरा पेट्यांतील कचरा बाहेर काढतात. मोकाट गुरांच्या समस्येवर अद्याप मार्ग निघालेला नाही. नगरपंचायतीकडून खासगी कोंडवाडा चालवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, कोंडवाडा चालवण्याचे निकष किचकट असल्याने कोणी कोंडवाडा चालवण्यासाठी पुढे येत नसल्याचे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.एकंदरीत कणकवली येथील कचऱ्याची समस्या मिटविण्याची जबाबदारी आता नगरपंचायतीवर येवून पडली आहे. शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष अॅड. प्रज्ञा खोत यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)घनकचरा प्रकल्पाची उभारणी केव्हा?शहरात गोळा होणारा कचरा मुडेश्वर मैदानाच्या पुढे नागवे गावाच्या सीमेनजीक असलेल्या डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येत आहे. त्याठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारण्याचे नगरपंचायतीच्या विचाराधीन आहे.हा प्रकल्प कंपनी सात वर्षे चालवणार आहे. त्यानंतर तो सक्षमपणे चालवणे परवडेल काय याचा नगरपंचायत विचार करत आहे.अस्वच्छताशहरातील अनेक कचरापेट्यांच्या बाहेर कचरा पडलेला दिसतो. या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरते. रोगराई पसरण्याची भीतीही यामुळे निर्माण होत आहे. कुत्री या पेट्यांमध्ये शिरतात. तर गाईगुरे तोंड घालून कचरा बाहेर काढतात. तर काही नागरिकच कचरा पेटीबाहेर कचरा उडवून देतात. कुत्री आणि गुरे यांना रोखण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या कचरापेट्या आणण्याची गरज आहे.
नव्या कचरापेट्या बसविणार
By admin | Updated: November 18, 2014 23:22 IST