शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

थंडावलेल्या बांधकामांना नव्या वर्षात मिळणार नवी ऊर्जा

By admin | Updated: January 1, 2015 00:19 IST

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गौण खनिजावर बंदी आणल्याने चिरेखाणी, वाळू, माती यांच्या उत्खननावर बंदी आली होती

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यात असलेली गौण खनिज बंदी न्यायालयाच्या निकालानंतर सुमारे दोन वर्षांनंतर उठविण्यात आली आहे. लवकरच पाच तालुक्यांमधील चिरेखाण व्यवसाय सुरू होणार असल्याने थंडावलेल्या बांधकामांना आता नव्या वर्षात गती मिळणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गौण खनिजावर बंदी आणल्याने चिरेखाणी, वाळू, माती यांच्या उत्खननावर बंदी आली होती. याचा परिणाम यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणावर झाला. या साऱ्यांचे व्यवसाय ठप्प झाले होते. एवढेच नव्हे; तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होेता. शासनाचे लिलाव थांंबले. पर्यायाने खासगी आणि शासकीय बांधकामे थंडावली. शासनाचा महसूलही थांबला होता. त्यामुळे शासनाचेही करोडो रूपयांचे नुकसान होत होते. गेली दोन वर्षे बंदीमुळे चिरे, वाळू उपलब्ध होणे कठीण झाल्याने बांधकामाच्या साहित्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यामुळे सामान्य माणसाचे घर बांधणे हे स्वप्नच ठरले आहे. तयार बांधकामांचीही तीच स्थिती. त्यामुळे याचा फटका सामान्य माणसालाही बसू लागला. तसेच याचा फटका शासकीय बांधकामांनाही मोठ्या प्रमाणावर बसत होता. काही कालावधीनंतर जिल्ह्यात अंशत: बंदी उठविण्यात आली. यावेळी रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगड या चार तालुक्यांना बंदीतून वगळण्यात आले. मात्र, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यांवर पुन्हा बंदीची टांगती तलवार राहिली होती. त्यामुळे पुन्हा या पाच तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिकांचे व्यवसाय पुन्हा थंडावले होते. परंतु आता या पाच तालुक्यांवरील बंदी इको सेन्सिटिव्ह १९२ गावे वगळून उठविण्यात आल्याने तालुक्यांमधील विविध बांधकामांना वेग मिळणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बंदी उठलेल्या पाच तालुक्यांमध्ये मात्र सध्या उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत. जिल्हा प्रशासनानेही आता यासाठी हिरवा कंदील दाखवल्याने बांधकामेही लवकरच मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता २०१५ या नव्या वर्षात थांबलेल्या सर्वच बांधकामांना गती मिळणार आहे. (प्रतिनिधी) पाच तालुक्यातील गौण खनिज बंदी उठल्याने त्या भागातील बांधकामांना गती मिळणार. थांबलेल्या कामांना गती मिळण्याच्या शक्यतेने बिल्डर लॉबी सुखावली. १९२ गावे वगळून बंदी उठविण्याच्या निर्णयाचा फायदा.