शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

थंडावलेल्या बांधकामांना नव्या वर्षात मिळणार नवी ऊर्जा

By admin | Updated: January 1, 2015 00:19 IST

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गौण खनिजावर बंदी आणल्याने चिरेखाणी, वाळू, माती यांच्या उत्खननावर बंदी आली होती

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यात असलेली गौण खनिज बंदी न्यायालयाच्या निकालानंतर सुमारे दोन वर्षांनंतर उठविण्यात आली आहे. लवकरच पाच तालुक्यांमधील चिरेखाण व्यवसाय सुरू होणार असल्याने थंडावलेल्या बांधकामांना आता नव्या वर्षात गती मिळणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गौण खनिजावर बंदी आणल्याने चिरेखाणी, वाळू, माती यांच्या उत्खननावर बंदी आली होती. याचा परिणाम यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणावर झाला. या साऱ्यांचे व्यवसाय ठप्प झाले होते. एवढेच नव्हे; तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होेता. शासनाचे लिलाव थांंबले. पर्यायाने खासगी आणि शासकीय बांधकामे थंडावली. शासनाचा महसूलही थांबला होता. त्यामुळे शासनाचेही करोडो रूपयांचे नुकसान होत होते. गेली दोन वर्षे बंदीमुळे चिरे, वाळू उपलब्ध होणे कठीण झाल्याने बांधकामाच्या साहित्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यामुळे सामान्य माणसाचे घर बांधणे हे स्वप्नच ठरले आहे. तयार बांधकामांचीही तीच स्थिती. त्यामुळे याचा फटका सामान्य माणसालाही बसू लागला. तसेच याचा फटका शासकीय बांधकामांनाही मोठ्या प्रमाणावर बसत होता. काही कालावधीनंतर जिल्ह्यात अंशत: बंदी उठविण्यात आली. यावेळी रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगड या चार तालुक्यांना बंदीतून वगळण्यात आले. मात्र, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यांवर पुन्हा बंदीची टांगती तलवार राहिली होती. त्यामुळे पुन्हा या पाच तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिकांचे व्यवसाय पुन्हा थंडावले होते. परंतु आता या पाच तालुक्यांवरील बंदी इको सेन्सिटिव्ह १९२ गावे वगळून उठविण्यात आल्याने तालुक्यांमधील विविध बांधकामांना वेग मिळणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बंदी उठलेल्या पाच तालुक्यांमध्ये मात्र सध्या उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत. जिल्हा प्रशासनानेही आता यासाठी हिरवा कंदील दाखवल्याने बांधकामेही लवकरच मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता २०१५ या नव्या वर्षात थांबलेल्या सर्वच बांधकामांना गती मिळणार आहे. (प्रतिनिधी) पाच तालुक्यातील गौण खनिज बंदी उठल्याने त्या भागातील बांधकामांना गती मिळणार. थांबलेल्या कामांना गती मिळण्याच्या शक्यतेने बिल्डर लॉबी सुखावली. १९२ गावे वगळून बंदी उठविण्याच्या निर्णयाचा फायदा.