शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

बंदर विकासातून रोजगाराचे नवे दालन

By admin | Updated: October 13, 2016 21:30 IST

रवींद्र चव्हाण : तळवडेत ग्रामस्थांकडून सत्कार; विकासासाठी मतदभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहनतळवडे :

 सिंधुदुर्ग जिल्ह्याला बंदर -विकास होणे गरजेचे आहे, हे ओळखून जिल्ह्यातील बंदर विकास व रेल्वेलाईन बंदरापर्यंत जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत. त्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यटन विकास व रोजगाराचे नवे दालन निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तळवडे येथील कार्यक्रमात व्यक्त केले.तळवडे येथील दसरोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी तळवडेचे सरपंच पंकज पेडणेकर, उदय परब, दिलीप परब, संदीप परब, प्रणय परब, संजय परब, अनिल परब, रवींद्र परब, सुनील परब, अशोक परब, मकरंद परब, प्रमोद परब, सुधाकर परब, अरविंद परब, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, चौपदरी महामार्ग निर्माण करताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दखल राज्यशासन घेत आहे. यात बऱ्याच अडचणी येत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले. तळवडे गावाशी माझे अतूट नाते आहे. या गावात मी वाढलो. मी कोकणचा सुपुत्र आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विकास साधणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी थळकर परब बंधूंतर्फे रवींद्र चव्हाण यांचा त्यांचे मामा गणपत परब, बाळकृष्ण परब, मधुकर परब, लक्ष्मण परब, दिलीप परब यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)