शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

गृहसंकुलांसाठी नवीन अट

By admin | Updated: June 27, 2015 00:15 IST

जिल्हा परिषद : छतावरचे पाणी साठवणाऱ्यांना परवानगी देण्याचा ठराव

रत्नागिरी : उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवत असल्याने यापुढे रेन हॉर्वेस्टिंगचा उपाय करणाऱ्यांनाच शहर परिसरातील ग्रामपंचायतींनी गृहसंकुलासाठी परवानगी द्यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.पावसाचे प्रमाण जास्त असूनही दरवर्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पाणीटंचाई उद््भवते. जिल्हा परिषदेला दरवर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करावी लागते. त्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतो. तरीही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी कासावीस होते. जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यामध्ये ९८ गावांतील २२७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु होती. या टंचाईग्रस्तांना केवळ २५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. या टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करताना शासनाची दमछाक झाली होती. दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून आणखी किती गावांना पाणी पुरवठा करणार, याचाही विचार करणे आवश्यक आहे. शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे जागेचे भावही वधारल्याने सर्वसामान्यांना ते परवडणे आवाक्याबाहेरचे झाले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात बिल्डर्सकडून गृहसंकुलांची उभारणी करण्यात येत आहे. वाढत्या लोकवस्त्यांना ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठा करणे अवघड होत आहे. या गृहसंकुलांची निर्मिती करताना त्यापूर्वी पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. पाणी साठवण्यासाठी रेन हॉर्वेस्टिंग हा उपाय केल्यास गृहसंकुलातील रहिवाशांची काही प्रमाणात पाण्याची सोय करता येणार आहे. त्यासाठीच जिल्हा परिषदेने शहर परिसरातील ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये गृहसंकुल बांधतांना रेनहॉर्वेस्टिंगचा उपाय करणाऱ्यांनाच बांधकामाची परवानगी देण्यात यावी, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिल्डर्संना गृहसंकुल बांधतांना रेनहॉर्वेस्टिंगची उपाय करणे आवश्यक असून, ते रहिवाशांच्या फायद्याचे ठरणार आहे. रहिवाशांना फायद्याचा असा हा नियम जिल्हापरिषदेने ठरावाद्वारे पारीत केला असल्याने ग्रामीण भागातील बांधकामे करताना संबंधितांना हे भान ठेवावे लागणार आहे. हा नवा प्रयोग किती यशस्वी ठरतो हे येणारा काळच ठरविणार आहे मात्र सध्या तरी अशा बांधकामांना महत्वाचा हा नियम पाळावाच लागणार आहे. या साऱ्यावर अंकूश ठेवण्यासाठी मात्र विशेष प्रयत्न करावे लागतील हे नक्कीच. या साऱ्या अंमलबजावणीकडे लक्ष लागणार आहे. (शहर वार्ताहर)छतावरचे पाणी बरेच काही देणार...1पावसाळ्यात छतावरचे पाणी साठवून त्याचा वापर करण्याचा उपाय सर्व गृहसंकुलांनी केल्यास त्याचा टंचाईच्या कालावधीत मोठा फायदा होईल. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास टंचाईच्या कालावधीत मोठा फायदा होणार आहे. अर्थातच अंमलबजावणीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 2घर बांधणीसाठी परवानगी देताना आता काही ग्रामपंचायतीही पाण्याच्या सोयीबाबत खबरदारी घेत आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून घर बांधणीसाठी परवानगी मागणाऱ्या जमीन मालकाकडून नळ कनेक्शन मागणार नाही, असे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतात. त्यामुळे घर बांधण्याआधीच जमीन मालकांने पाण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. 3उदय बने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी परिषद भवनाच्या आवारामध्येच रेन हार्वेस्टींग करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. मात्र, वर्षभरानंतर प्रशसनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने पाण्याची टाकी व त्याला जोडण्यात आलेले पाईपची विल्हेवाट लागली.