शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

गृहसंकुलांसाठी नवीन अट

By admin | Updated: June 27, 2015 00:15 IST

जिल्हा परिषद : छतावरचे पाणी साठवणाऱ्यांना परवानगी देण्याचा ठराव

रत्नागिरी : उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवत असल्याने यापुढे रेन हॉर्वेस्टिंगचा उपाय करणाऱ्यांनाच शहर परिसरातील ग्रामपंचायतींनी गृहसंकुलासाठी परवानगी द्यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.पावसाचे प्रमाण जास्त असूनही दरवर्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पाणीटंचाई उद््भवते. जिल्हा परिषदेला दरवर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करावी लागते. त्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतो. तरीही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी कासावीस होते. जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यामध्ये ९८ गावांतील २२७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु होती. या टंचाईग्रस्तांना केवळ २५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. या टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करताना शासनाची दमछाक झाली होती. दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून आणखी किती गावांना पाणी पुरवठा करणार, याचाही विचार करणे आवश्यक आहे. शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे जागेचे भावही वधारल्याने सर्वसामान्यांना ते परवडणे आवाक्याबाहेरचे झाले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात बिल्डर्सकडून गृहसंकुलांची उभारणी करण्यात येत आहे. वाढत्या लोकवस्त्यांना ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठा करणे अवघड होत आहे. या गृहसंकुलांची निर्मिती करताना त्यापूर्वी पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. पाणी साठवण्यासाठी रेन हॉर्वेस्टिंग हा उपाय केल्यास गृहसंकुलातील रहिवाशांची काही प्रमाणात पाण्याची सोय करता येणार आहे. त्यासाठीच जिल्हा परिषदेने शहर परिसरातील ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये गृहसंकुल बांधतांना रेनहॉर्वेस्टिंगचा उपाय करणाऱ्यांनाच बांधकामाची परवानगी देण्यात यावी, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिल्डर्संना गृहसंकुल बांधतांना रेनहॉर्वेस्टिंगची उपाय करणे आवश्यक असून, ते रहिवाशांच्या फायद्याचे ठरणार आहे. रहिवाशांना फायद्याचा असा हा नियम जिल्हापरिषदेने ठरावाद्वारे पारीत केला असल्याने ग्रामीण भागातील बांधकामे करताना संबंधितांना हे भान ठेवावे लागणार आहे. हा नवा प्रयोग किती यशस्वी ठरतो हे येणारा काळच ठरविणार आहे मात्र सध्या तरी अशा बांधकामांना महत्वाचा हा नियम पाळावाच लागणार आहे. या साऱ्यावर अंकूश ठेवण्यासाठी मात्र विशेष प्रयत्न करावे लागतील हे नक्कीच. या साऱ्या अंमलबजावणीकडे लक्ष लागणार आहे. (शहर वार्ताहर)छतावरचे पाणी बरेच काही देणार...1पावसाळ्यात छतावरचे पाणी साठवून त्याचा वापर करण्याचा उपाय सर्व गृहसंकुलांनी केल्यास त्याचा टंचाईच्या कालावधीत मोठा फायदा होईल. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास टंचाईच्या कालावधीत मोठा फायदा होणार आहे. अर्थातच अंमलबजावणीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 2घर बांधणीसाठी परवानगी देताना आता काही ग्रामपंचायतीही पाण्याच्या सोयीबाबत खबरदारी घेत आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून घर बांधणीसाठी परवानगी मागणाऱ्या जमीन मालकाकडून नळ कनेक्शन मागणार नाही, असे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतात. त्यामुळे घर बांधण्याआधीच जमीन मालकांने पाण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. 3उदय बने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी परिषद भवनाच्या आवारामध्येच रेन हार्वेस्टींग करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. मात्र, वर्षभरानंतर प्रशसनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने पाण्याची टाकी व त्याला जोडण्यात आलेले पाईपची विल्हेवाट लागली.