शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
5
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
6
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
7
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
8
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
10
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
11
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
12
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
13
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
14
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
15
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
16
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
17
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
18
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
19
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
20
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

रत्नागिरीत रंगणार नवा ‘खुर्ची’ वाद

By admin | Updated: June 13, 2015 00:13 IST

साडेतीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपालिकेत सेना - भाजपा युती सत्तेत आल्यानंतर सव्वा वर्षांच्या टप्प्यात नगराध्यक्षपदाचे वाटप ठरले.

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेतील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. महेंद्र मयेकर यांचा सव्वा वर्षाचा कालावधी येत्या २४ जुलै रोजी संपत असल्याने ते राजीनामा देणार काय, याच प्रश्नाभोवती राजकारण फिरत असून, राज्यातील युती तुटलेली असताना रत्नागिरी पालिकेतील युती राहणार काय, याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे, तर नगराध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेतून आपसातील वाद विकोपास गेले आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपालिकेत सेना - भाजपा युती सत्तेत आल्यानंतर सव्वा वर्षांच्या टप्प्यात नगराध्यक्षपदाचे वाटप ठरले. प्रत्येक पक्षाला दोनदा संधी मिळणार असे ठरविण्यात आले. प्रथम संधी अधिक नगरसेवक असलेल्या शिवसेनेला मिलिंद कीर यांच्या रुपाने मिळाली. त्यानंतर सलग अडीच वर्षांचा काळ नगराध्यक्षपद भाजपकडे आहे. येत्या २४ जुलैनंतर तरी हे पद सव्वा वर्षाचा हक्क असलेल्या शिवसेनेला मिळणार की नाही, याचीच चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही स्थितीत सेनेकडे नगराध्यक्षपद राहू द्यायचे नाही, असे शिवसेनेच्या गोटातील वातावरण आहे. त्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठांकडूनही स्ट्रॅटेजी ठरवली जात आहे. सेनेतील इच्छुकांमध्येही या पदासाठी जोरदार स्पर्धा आहे. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष व इच्छुक हे एकदिलाने सर्व कामे करीत असताना एका उद्यानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरूनही वादंग झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नगराध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वादावर नेते कसा तोडगा काढतात याकडे लक्ष लागले आहे. मात्र यानिमित्ताने वाद विकोपाला गेले आहेत. (प्रतिनिधी)कदमांच्या उद्याच्या दौऱ्याकडे लक्षशिवसेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्षपदाबाबत मूळमूळीत भूमिका घेतल्याने भाजपने वरचढ होत सेनेला नगराध्यक्षपदापासून वंचित ठेवल्याची चर्चा शिवसेनेत आहे. येत्या रविवारी शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम हे रत्नागिरीत येत असून, रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा विषय त्यांच्या कोर्टात नेला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.