शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

रत्नागिरीत रंगणार नवा ‘खुर्ची’ वाद

By admin | Updated: June 13, 2015 00:13 IST

साडेतीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपालिकेत सेना - भाजपा युती सत्तेत आल्यानंतर सव्वा वर्षांच्या टप्प्यात नगराध्यक्षपदाचे वाटप ठरले.

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेतील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. महेंद्र मयेकर यांचा सव्वा वर्षाचा कालावधी येत्या २४ जुलै रोजी संपत असल्याने ते राजीनामा देणार काय, याच प्रश्नाभोवती राजकारण फिरत असून, राज्यातील युती तुटलेली असताना रत्नागिरी पालिकेतील युती राहणार काय, याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे, तर नगराध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेतून आपसातील वाद विकोपास गेले आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपालिकेत सेना - भाजपा युती सत्तेत आल्यानंतर सव्वा वर्षांच्या टप्प्यात नगराध्यक्षपदाचे वाटप ठरले. प्रत्येक पक्षाला दोनदा संधी मिळणार असे ठरविण्यात आले. प्रथम संधी अधिक नगरसेवक असलेल्या शिवसेनेला मिलिंद कीर यांच्या रुपाने मिळाली. त्यानंतर सलग अडीच वर्षांचा काळ नगराध्यक्षपद भाजपकडे आहे. येत्या २४ जुलैनंतर तरी हे पद सव्वा वर्षाचा हक्क असलेल्या शिवसेनेला मिळणार की नाही, याचीच चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही स्थितीत सेनेकडे नगराध्यक्षपद राहू द्यायचे नाही, असे शिवसेनेच्या गोटातील वातावरण आहे. त्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठांकडूनही स्ट्रॅटेजी ठरवली जात आहे. सेनेतील इच्छुकांमध्येही या पदासाठी जोरदार स्पर्धा आहे. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष व इच्छुक हे एकदिलाने सर्व कामे करीत असताना एका उद्यानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरूनही वादंग झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नगराध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वादावर नेते कसा तोडगा काढतात याकडे लक्ष लागले आहे. मात्र यानिमित्ताने वाद विकोपाला गेले आहेत. (प्रतिनिधी)कदमांच्या उद्याच्या दौऱ्याकडे लक्षशिवसेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्षपदाबाबत मूळमूळीत भूमिका घेतल्याने भाजपने वरचढ होत सेनेला नगराध्यक्षपदापासून वंचित ठेवल्याची चर्चा शिवसेनेत आहे. येत्या रविवारी शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम हे रत्नागिरीत येत असून, रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा विषय त्यांच्या कोर्टात नेला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.