शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

रत्नागिरीत रंगणार नवा ‘खुर्ची’ वाद

By admin | Updated: June 13, 2015 00:13 IST

साडेतीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपालिकेत सेना - भाजपा युती सत्तेत आल्यानंतर सव्वा वर्षांच्या टप्प्यात नगराध्यक्षपदाचे वाटप ठरले.

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेतील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. महेंद्र मयेकर यांचा सव्वा वर्षाचा कालावधी येत्या २४ जुलै रोजी संपत असल्याने ते राजीनामा देणार काय, याच प्रश्नाभोवती राजकारण फिरत असून, राज्यातील युती तुटलेली असताना रत्नागिरी पालिकेतील युती राहणार काय, याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे, तर नगराध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेतून आपसातील वाद विकोपास गेले आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपालिकेत सेना - भाजपा युती सत्तेत आल्यानंतर सव्वा वर्षांच्या टप्प्यात नगराध्यक्षपदाचे वाटप ठरले. प्रत्येक पक्षाला दोनदा संधी मिळणार असे ठरविण्यात आले. प्रथम संधी अधिक नगरसेवक असलेल्या शिवसेनेला मिलिंद कीर यांच्या रुपाने मिळाली. त्यानंतर सलग अडीच वर्षांचा काळ नगराध्यक्षपद भाजपकडे आहे. येत्या २४ जुलैनंतर तरी हे पद सव्वा वर्षाचा हक्क असलेल्या शिवसेनेला मिळणार की नाही, याचीच चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही स्थितीत सेनेकडे नगराध्यक्षपद राहू द्यायचे नाही, असे शिवसेनेच्या गोटातील वातावरण आहे. त्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठांकडूनही स्ट्रॅटेजी ठरवली जात आहे. सेनेतील इच्छुकांमध्येही या पदासाठी जोरदार स्पर्धा आहे. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष व इच्छुक हे एकदिलाने सर्व कामे करीत असताना एका उद्यानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरूनही वादंग झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नगराध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वादावर नेते कसा तोडगा काढतात याकडे लक्ष लागले आहे. मात्र यानिमित्ताने वाद विकोपाला गेले आहेत. (प्रतिनिधी)कदमांच्या उद्याच्या दौऱ्याकडे लक्षशिवसेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्षपदाबाबत मूळमूळीत भूमिका घेतल्याने भाजपने वरचढ होत सेनेला नगराध्यक्षपदापासून वंचित ठेवल्याची चर्चा शिवसेनेत आहे. येत्या रविवारी शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम हे रत्नागिरीत येत असून, रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा विषय त्यांच्या कोर्टात नेला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.