शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कांजी, रूमडाची शीतपेये दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 00:19 IST

रासायनिक शीतपेयांचा वापर वाढला : आरोग्याला पोषक तरीही लोकप्रियतेची उणीव

सुरेश बागवे ल्ल कडावल बदलत्या जीवनशैलीत सर्वच बाबतीत पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्याच्या अट्टाहासापायी बेचव व आरोग्यास अपायकारक शीतपेये घशात ओतली जात आहेत. बाजारात अतिक्रमण केलेल्या या बेगडी पेयांच्या भाऊगर्दीत कांजी किंवा रूमडाच्या पाण्यासारखी शुद्ध, नैसर्गिक, मधूर व शीतल पेये मात्र नामशेष होत आहेत.उन्हाळ््यातील रखरखते ऊन व जीवघेण्या उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होत असताना रूचकर व शीतल असे रूंबड किंवा रूमडाचे पाणी होरपळलेल्या शरीराबरोबरच मनालाही थंडावा देत असे. रूमडाचे पाणी औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याचे मानले जात असल्याने पूर्वी या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. विशेषत: असह्य उकाड्याला उतारा म्हणून कडक उन्हाळ््यात या पाण्याचा वापर नैसर्गिक शीतपेय म्हणून अधिक प्रमाणात व्हायचा. मात्र, कालचक्राच्या प्रवाहाबरोबर आधुनिकतेच्या नावाखाली बाजारात घुसखोरी केलेल्या शेकडो बेचव, बेगडी शीतपेयांच्या मांदियाळीत मधुर, रूचकर व शीतल असलेले रूमडाचे पाणी आज लुप्त झाले आहे.रुमडाचे पाणी मिळवणे अतिशय कौशल्याचे व जोखमीचे काम असते. या पाण्याची चव चाखण्यासाठी सर्प हमखास येतो, असा समज ग्रामीण भागात असल्यामुळे रूमडाच्या झाडापासून पाणी मिळविताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. या कामाची व कामातील जोखमीची सर्व माहिती असलेली व्यक्तीच हे काम करू शकते. नवखी व्यक्ती रूमडाचे पाणी मिळविण्याच्या फंदात सहसा पडत नाही.पाणी मिळविण्यासाठी प्रथम एक रूमडाचे झाड हेरून त्याच्या आसपासची लहान-सहान झुडपे तोडून तो भाग साफ केला जातो. त्यानंतर या झाडाच्या ज्या पाळापासून पाणी मिळविणे सोयीस्कर असेल, त्या पाळाखाली सुमारे दीड फूट खोलीचा खड्डा खोदण्यात येतो. पाण्यासाठी ज्या आकाराचे भांडे वापरायचे असेल, त्या मापाचा अंदाज घेऊनच हा खड्डा खोदण्यात येतो. त्यानंतर रूमडाच्या पाळाला कोयत्याने तोडून मध्ये खाच केली जाते. एका कळशीचे तोंड फडक्याने बांधून ती पाळाच्या खाचाखाली खड्ड्यात ठेवण्यात येते. नंतर त्या पाळासहीत कळशीवर प्रथम पालापाचोळ्याचे आच्छादन करून ते दगड व मातीच्या साह्याने मजबूत केले जाते. सर्पाला आत प्रवेश मिळू नये, हा यामागे उद्देश असतो. दुसऱ्या दिवशी अतिशय सावधगिरी बाळगत प्रथम कळशीवरील आच्छादन दूर करून पाण्याने भरलेली कळशी खड्ड्यांमधून अलगदपणे बाहेर काढली जाते. कांजी, रूमड पेये नामशेष उष्म्याने अंगाची लाही-लाही होऊन घामाच्या धारा वाहू लागल्या की, पूर्वी रूमडाचे पाणी हमखास काढले जायचे. आता जमाना बदलला आहे. बदलत्या जीवनशैलीत आधुनिकतेच्या हव्यासापोटी सर्वच बाबतीत पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्याचा अट्टाहास वाढीस लागला आहे. या अट्टाहासापायीच परदेशी कंपन्यांची बेचव व आरोग्यास अपायकारक शीतपेये घशात ओतली जात आहेत. बाजारात अतिक्रमण केलेल्या या बेगडी पेयांच्या भाऊगर्दीत कांजी, किंवा रूमडाच्या पाण्यासारखी शुद्ध, मधुर व शीतलपेये मात्र नामशेष होत आहेत.