शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

कांजी, रूमडाची शीतपेये दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 00:19 IST

रासायनिक शीतपेयांचा वापर वाढला : आरोग्याला पोषक तरीही लोकप्रियतेची उणीव

सुरेश बागवे ल्ल कडावल बदलत्या जीवनशैलीत सर्वच बाबतीत पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्याच्या अट्टाहासापायी बेचव व आरोग्यास अपायकारक शीतपेये घशात ओतली जात आहेत. बाजारात अतिक्रमण केलेल्या या बेगडी पेयांच्या भाऊगर्दीत कांजी किंवा रूमडाच्या पाण्यासारखी शुद्ध, नैसर्गिक, मधूर व शीतल पेये मात्र नामशेष होत आहेत.उन्हाळ््यातील रखरखते ऊन व जीवघेण्या उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होत असताना रूचकर व शीतल असे रूंबड किंवा रूमडाचे पाणी होरपळलेल्या शरीराबरोबरच मनालाही थंडावा देत असे. रूमडाचे पाणी औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याचे मानले जात असल्याने पूर्वी या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. विशेषत: असह्य उकाड्याला उतारा म्हणून कडक उन्हाळ््यात या पाण्याचा वापर नैसर्गिक शीतपेय म्हणून अधिक प्रमाणात व्हायचा. मात्र, कालचक्राच्या प्रवाहाबरोबर आधुनिकतेच्या नावाखाली बाजारात घुसखोरी केलेल्या शेकडो बेचव, बेगडी शीतपेयांच्या मांदियाळीत मधुर, रूचकर व शीतल असलेले रूमडाचे पाणी आज लुप्त झाले आहे.रुमडाचे पाणी मिळवणे अतिशय कौशल्याचे व जोखमीचे काम असते. या पाण्याची चव चाखण्यासाठी सर्प हमखास येतो, असा समज ग्रामीण भागात असल्यामुळे रूमडाच्या झाडापासून पाणी मिळविताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. या कामाची व कामातील जोखमीची सर्व माहिती असलेली व्यक्तीच हे काम करू शकते. नवखी व्यक्ती रूमडाचे पाणी मिळविण्याच्या फंदात सहसा पडत नाही.पाणी मिळविण्यासाठी प्रथम एक रूमडाचे झाड हेरून त्याच्या आसपासची लहान-सहान झुडपे तोडून तो भाग साफ केला जातो. त्यानंतर या झाडाच्या ज्या पाळापासून पाणी मिळविणे सोयीस्कर असेल, त्या पाळाखाली सुमारे दीड फूट खोलीचा खड्डा खोदण्यात येतो. पाण्यासाठी ज्या आकाराचे भांडे वापरायचे असेल, त्या मापाचा अंदाज घेऊनच हा खड्डा खोदण्यात येतो. त्यानंतर रूमडाच्या पाळाला कोयत्याने तोडून मध्ये खाच केली जाते. एका कळशीचे तोंड फडक्याने बांधून ती पाळाच्या खाचाखाली खड्ड्यात ठेवण्यात येते. नंतर त्या पाळासहीत कळशीवर प्रथम पालापाचोळ्याचे आच्छादन करून ते दगड व मातीच्या साह्याने मजबूत केले जाते. सर्पाला आत प्रवेश मिळू नये, हा यामागे उद्देश असतो. दुसऱ्या दिवशी अतिशय सावधगिरी बाळगत प्रथम कळशीवरील आच्छादन दूर करून पाण्याने भरलेली कळशी खड्ड्यांमधून अलगदपणे बाहेर काढली जाते. कांजी, रूमड पेये नामशेष उष्म्याने अंगाची लाही-लाही होऊन घामाच्या धारा वाहू लागल्या की, पूर्वी रूमडाचे पाणी हमखास काढले जायचे. आता जमाना बदलला आहे. बदलत्या जीवनशैलीत आधुनिकतेच्या हव्यासापोटी सर्वच बाबतीत पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्याचा अट्टाहास वाढीस लागला आहे. या अट्टाहासापायीच परदेशी कंपन्यांची बेचव व आरोग्यास अपायकारक शीतपेये घशात ओतली जात आहेत. बाजारात अतिक्रमण केलेल्या या बेगडी पेयांच्या भाऊगर्दीत कांजी, किंवा रूमडाच्या पाण्यासारखी शुद्ध, मधुर व शीतलपेये मात्र नामशेष होत आहेत.