शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

भेकुर्लीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: September 11, 2014 00:02 IST

पालकमंत्र्यांनी दत्तक घेतलेले गाव : रस्त्यावरील दरड काढण्यात अपयश

शिरीष नाईक - कसई दोडामार्ग --तळकट-भेकुर्ली रस्त्यावर ठिकठिकाणी दरड कोसळून मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे भेकुर्ली, खडपडे, कुंभवडे आदी ठिकाणच्या ग्रामस्थांना डोक्यावर सामान घेऊन पायी प्रवास करावा लागत आहे. गणेश चतुर्थीच्या कालावधीत तरी हा रस्ता वाहतुकीस मोकळा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. याबाबत बांधकाम विभागालाही कल्पना देण्यात आली. परंतु बांधकाम विभागाच्या निष्काळजी धोरण आणि जिल्हा परिषद सदस्यांचा बेजबाबदारपणा यामुळे रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ असून वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पालकमंत्री नारायण राणे यांनी दत्तक म्हणून घेतलेल्या या गावाकडे बांधकाम विभागाने मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता तातडीने वाहतुकीस मोकळा करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. तळकट-भेकुर्ली हा जिल्हा परिषद अंतर्गत कच्चा रस्ता असला, तरी परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांना वाहतुकीसाठी सोयिस्कर आहे. परंतु यावर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने रस्ता बंद होऊन लांब अंतराच्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. तसेच काही ठिकाणी रस्ता पूर्ण खचल्याने भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे आदी गावातील ग्रामस्थांना पायी प्रवास करावा लागत आहे. या घटनेला आता दीड महिना लोटला असून वृत्तपत्रांतूनही याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद सदस्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही. गणेश चतुर्थी असल्याने रस्ता मोकळा केला जाईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. परंतु या सणालाही बांधकाम विभागाने महत्त्व दिले नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत डोक्यावर सामान घेऊन भर पावसात सुमारे १२ किलोमीटर अंतर ग्रामस्थांना पार करावे लागले. यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मार्गावर प्रवास करताना कधी कधी तर ओहोळाच्या पाण्याचे वाढलेले पाणी ओसरेपर्यंत ग्रामस्थांना वाट पहावी लागते. त्यामुळे तळकट-भेकुर्ली रस्ता तातडीने वाहतुकीस मोकळा करावा, अशी मागणी होत आहे. दयनीय अवस्थापालकमंत्री नारायण राणे यांनी भेकुर्ली गाव दत्तक घेतले आहे. मात्र, या गावची अवस्था अजूनही दयनीय आहे. दळणवळणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने हे गाव अद्याप मागासलेले राहिले आहे. त्यामुळे तळकट ते भेकु र्ली या रस्त्यावरील मोऱ्या नव्याने बांधण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून मोऱ्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत एकही मोरी बांधण्यात आली नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे.