शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

सामाजिक समतेचे विचार रूजण्यासाठी तरुणांच्या योगदानाची गरज

By admin | Updated: April 15, 2016 23:35 IST

दीपक केसरकर : सिंधुदुर्गनगरी येथे सामाजिक समता सप्ताहाची सांगता

ओरोस : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक समता समाजात अधिक दृढ होण्यासाठी ग्रामीण भागापर्यंत रुजण्यासाठी युवक-युवतींच्या योगदानाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.सिंधुदुर्गनगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित सामाजिक समता सप्ताहाच्या सांगता समारंभात पालकमंत्री दीपक केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, सहायक आयुक्त समाज कल्याण जयंत चाचरकर, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते. कृषी क्षेत्रात होणारे बदल, पाण्याचे सुयोग्य नियोजन, समतोल आर्थिक विकास, सुधारित चाऱ्याची लागवड, कौशल्यवृद्धी, पर्यटनातून रोजगाराच्या संधी, आदींमधून रोजगाराच्या संधी व आर्थिक स्तर उंचावू शकतो. याचाच विचार करून युवक-युवतींनी यामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत. याचा अभ्यास करून ग्रामीण व शहरी भागात याचा प्रसार केल्यास सामाजिक समता अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी येत्या सहा महिन्यांत जिल्ह्यात केंद्र्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आज देशभरात ‘ग्राम उदय से भारत उदय’ हे अभियान सुरू होत आहे. या अभियानाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आजपासून प्रारंभ झाल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.विशेष घटक योजनेअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने काढलेल्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले असून, आजच्या विशेष ग्रामसभेत याचे वाचन करण्यात येणार आहे. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण प्राप्त चंद्र्रकांत जाधव यांच्या ‘समाजसेवेची ४० वर्षे’ या गौरवग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन पैलू विषद केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतिचिन्ह देण्यात आले. सहायक आयुक्त समाज कल्याण जयंत चाचरकर यांनी प्रास्ताविक, श्याम सावंत यांनी सूत्रसंचालन, तर तालुका समन्वयक सुरेखा डवर यांनी आभार मानले. (वार्ताहर)