शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक समतेचे विचार रूजण्यासाठी तरुणांच्या योगदानाची गरज

By admin | Updated: April 15, 2016 23:35 IST

दीपक केसरकर : सिंधुदुर्गनगरी येथे सामाजिक समता सप्ताहाची सांगता

ओरोस : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक समता समाजात अधिक दृढ होण्यासाठी ग्रामीण भागापर्यंत रुजण्यासाठी युवक-युवतींच्या योगदानाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.सिंधुदुर्गनगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित सामाजिक समता सप्ताहाच्या सांगता समारंभात पालकमंत्री दीपक केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, सहायक आयुक्त समाज कल्याण जयंत चाचरकर, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते. कृषी क्षेत्रात होणारे बदल, पाण्याचे सुयोग्य नियोजन, समतोल आर्थिक विकास, सुधारित चाऱ्याची लागवड, कौशल्यवृद्धी, पर्यटनातून रोजगाराच्या संधी, आदींमधून रोजगाराच्या संधी व आर्थिक स्तर उंचावू शकतो. याचाच विचार करून युवक-युवतींनी यामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत. याचा अभ्यास करून ग्रामीण व शहरी भागात याचा प्रसार केल्यास सामाजिक समता अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी येत्या सहा महिन्यांत जिल्ह्यात केंद्र्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आज देशभरात ‘ग्राम उदय से भारत उदय’ हे अभियान सुरू होत आहे. या अभियानाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आजपासून प्रारंभ झाल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.विशेष घटक योजनेअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने काढलेल्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले असून, आजच्या विशेष ग्रामसभेत याचे वाचन करण्यात येणार आहे. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण प्राप्त चंद्र्रकांत जाधव यांच्या ‘समाजसेवेची ४० वर्षे’ या गौरवग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन पैलू विषद केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतिचिन्ह देण्यात आले. सहायक आयुक्त समाज कल्याण जयंत चाचरकर यांनी प्रास्ताविक, श्याम सावंत यांनी सूत्रसंचालन, तर तालुका समन्वयक सुरेखा डवर यांनी आभार मानले. (वार्ताहर)