शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

पीडित महिलांसाठी आधार गटाची गरज

By admin | Updated: October 30, 2015 23:10 IST

बैठकीतील सूर : कौटुंबिक हिंसाचारासंदर्भात स्वयंसेवी संस्थांची रत्नागिरीत बैठक

रत्नागिरी : समाजातील महिलांवरील हिंसेविरोधात व्यापक प्रमाणात जनमत तयार व्हावे, पीडित महिलांना न्याय मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, या हेतूने जिल्हा पातळीवर आधार गट तयार करण्याची गरज आज विविध संस्था, आस्थापनांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या संवाद बैठकीत व्यक्त करण्यात आली.लांजातील हेरिटेज कल्चर आर्ट अ‍ॅण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी आणि संगमेश्वर तालुक्यातील स्नेहसमृद्धी व साहील संस्था यांच्या सहकार्याने कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा २००५ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच पीडित महिलेला न्याय मिळावा, या हेतूने जिल्हास्तरावर आधार गट स्थापन करण्यात यावा, या हेतूने जिल्हा शासकीय रुग्णालयाशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अ‍ॅड. राजशेखर मलुष्टे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक दीपक भागवत, महिला बालकल्याण विभागाच्या मंदा पाटील, आस्था संस्थेच्या सुरेखा पाथरे - जोशी, गोगटे - जोगळकर महाविद्यालयाच्या डॉ. चित्रा गोस्वामी, रत्नागिरीच्या नगरसेविका शिल्पा सुर्वे, विविध सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते, समुपदेशक, डॉक्टर्स, हेरिटेज संस्थेचे संतोष कांबळे, अपर्णा पवार, स्नेहसमृद्धी संस्थेच्या श्रद्धा देशपांडे, साहील संस्थेच्या शुभांगी कोलगे, तसेच विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.हेरिटेज संस्थेचे संतोष कांबळे, स्नेहसमृद्धी संस्थेच्या श्रद्धा देशपांडे यांनी पीडित महिलांना न्याय मिळवून देताना येणाऱ्या अडचणी विशद केल्या. यासाठी जिल्हास्तरावर आधार गट स्थापन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत पीडित महिलेला कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळण्याच्या दृष्टीने समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करायला हवा, असे मत व्यक्त करण्यात आले. अ‍ॅड. मलुष्टे यांनी मत व्यक्त करताना या कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचणी विशद केल्या. यासाठी पुरूषवर्गाचेही प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कायद्याची व्याप्ती सर्वदूर पोहोचणे गरजेचे असून पीडित महिलेला न्याय मिळतो का, हे पाहाणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.माविमच्या लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच या कायद्याबाबत केवळ प्रबोधन न करता प्रत्यक्षात पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न माविम करत असल्याचे भागवत यांनी सांगितले. महिला बालकल्याण विभागाच्या मंदा पाटील यांनी या कायद्यातील तरतुदी तसेच या अनुषंगाने शासनाच्या असलेल्या योजनांची माहिती दिली. डॉ. चित्रा गोस्वामी, सुरेखा पाथरे तसेच इतर सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी यावेळी सूचना केल्या. यासंदर्भात जिल्हा आधार गटाच्या प्रत्यक्ष कामकाजासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. साहील संस्थेच्या शुभांगी कोलगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)