शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची ‘मोहर’?

By admin | Updated: September 25, 2014 00:21 IST

रत्नागिरी विधानसभा : लोकसभेच्या पुनरावृत्तीची भाजपला संधी

प्रकाश वराडकर -रत्नागिरी -जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची २००९मध्ये पुनर्रचना झाली, अन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा भूगोलही बदलला. तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील नावडी हा गट समाविष्ट झाला. त्यामुळे युतीचे प्राबल्य मतदारसंघात अधिक वाढले. परंतु ते जिल्हा परिषद व पंचायत समितीपुरतेच सीमित राहिले. २००५ व २००९ च्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने विजय संपादन करून राजकीय चमत्कार घडविला. भूगोल युतीच्या बाजूने असतानाही इतिहास बदलण्याचा चमत्कार कसा घडला, याचीच चर्चा होत राहिली. या निवडणुकीत विधानसभेच्या बदललेल्या भूगोलावर राष्ट्रवादीची मोहर पुन्हा उमटणार की, लोकसभा निवडणुकीतील युतीच्या मताधिक्याची पुनरावृत्ती होऊन राष्ट्रवादीला धक्का बसणार, याकडेच आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यापुरताच मर्यादित होता. मात्र, २००९मध्ये जिल्ह्यातील मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. त्यात संगमेश्वर तालुका लांजा-राजापूर, चिपळूण व रत्नागिरी मतदारसंघात विभागला गेला. संगमेश्वर तालुक्याच्या खाडीपट्ट्यातील नावडी जिल्हा परिषद गट रत्नागिरी मतदारसंघात समाविष्ट झाला. त्यामुळे पूर्वीच्या आठऐवजी या मतदारसंघात जिल्हा परिषद गटांची संख्या ९ झाली. समाविष्ट झालेला नावडी गट सेनेचाच बालेकिल्ला असल्याचे २०१२च्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट झाले. मतदारसंघाचा भूगोल बदलल्यानंतरही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय वर्चस्व युतीचेच राहिले. नावडी गटही सेनेच्याच वर्चस्वाखाली आला. त्यामुळे या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांपैकी वाटद हा एकच गट राष्ट्रवादीने जिंकला. तेथे प्रसाद ऊर्फ बाबू पाटील विजयी झाले. पावस गटात बहुजन विकास आघाडीने राष्ट्रवादीची मदत घेतली. त्यामुळे नंदकुमार मोहिते यांनी विजय मिळविला. याव्यतिरिक्त आघाडीला या विधानसभा मतदारसंघात अन्य गटांवर वर्चस्व मिळविता आले नाही. अन्य सातही जिल्हा परिषद गटांवर सेना-भाजपा युतीने वर्चस्व प्रस्थापित केले. त्यातील हातखंबा, नाचणे, गोळप व संगमेश्वर तालुक्यातील परंतु रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील नावडी गटातही सेनेनेच विजयाचा झेंंडा राजेश मुकादम यांच्या विजयाच्या रुपाने फडकावला. हातखंबा गटात उदय बने, नाचणे गटात विनया गावडे, गोळप गटात देवयानी झापडेकर सेनेच्या शिलेदारांनी विजय संपादन केला. करबुडे गटात शुभांगी देसाई, कोतवडे गटात सतीश शेवडे, शिरगाव गटात विजय सालीम हे भाजपा उमेदवार जिंकले. नऊपैकी तब्बल सात गटात युतीचे वर्चस्व असतानाही युतीचा येथील उमेदवार विजयी होऊ शकला नाही. गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत युतीच्या या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला. त्यामुळे मतदारसंघाचा भूगोल बदलूनही विधानसभेच्या विजयाचा गड गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये युतीला सर करता आला नाही, हा चमत्कारच मानला जात आहे. मात्र, या चमत्कारामागे युतीतीलच काहींचा नमस्कार असल्याची चर्चा गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये होती. लोकसभा निवडणुकीत विधानसभेप्रमाणे चमत्कार घडला नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीतील युतीच्या यशाची पुनरावृत्ती या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघात होणार की पुन्हा राष्ट्रवादीच आपला राजकीय करिश्मा दाखविणार, याबाबत आता सर्वांनाच उत्कंठा आहे. घोडामैदान जवळ आहे. येत्या दोन दिवसांनंतर निवडणूक अश्व चौखूर उधळणार आहेत. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना आता १५ आॅक्टोबरच्या मतदानाची व त्यानंतर १९ आॅक्टोबर २०१४ रोजी होणाऱ्या मतमोजणीतील निकालाची प्रतीक्षा आहे.