शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

राष्ट्रवादीला पुन्हा मिळणार पॉवर

By admin | Updated: April 23, 2015 00:34 IST

रत्नागिरी मतदारसंघ : घर सोडूून गेलेले परतीच्या मार्गावर

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाजावाजा करत एका नेत्याच्या पावलावर पाऊल टाकत राष्ट्रवादीतील जे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या विश्वासाने शिवसेनेत गेले होते, त्यांचा आता भ्रमनिरास झाला आहे. त्यांचे अस्तित्वच धोक्यात आल्याने हे नेते व कार्यकर्तेही आता परतीच्या मार्गावर आहेत. पडद्यामागे बऱ्याच राजकीय घडामोडी सुरू आहेत. येत्या महिनाभरात कार्यकर्त्यांच्या परतीवर शिक्कामोर्तब होणार असून, रत्नागिरी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसला पुन्हा ‘पॉवर’ मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. राज्यात शिवसेना व भाजपा यांची युती तुटल्यानंतर राजकीय सोय व सावधानता म्हणून एका राजकीय नेत्याने निवडणुकीच्या तोंडावर अचानकपणे राष्ट्रवादीतून शिवसेनेत उडी मारली. त्यावेळी आपल्यासोबत राष्ट्रवादीतील कार्यकर्ते व नेत्यांची एक फळीही नेली. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची पॉवर काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र, हा गड राखण्यासाठी, मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मच्छिमार नेते बशीर मुर्तुझा यांना उमेदवारी दिली होती. त्यांना मतदारसंघात चांगली मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसची ताकद बऱ्यापैकी असल्याचे पक्षनेतृत्त्वाच्याही लक्षात आले होते. मात्र, शिवसेनेत गेल्याने जुने शिवसैनिक व नवीन आलेले शिवसैनिक असा वाद शिवसेनेत निर्माण झाला. सेनेच्या जुन्या व निष्ठावान शिलेदारांनी सुरुवातीला थोडी नरमाईची भूमिका घेतली. मात्र, नंतर जुन्या शिवसैनिकांनी आपली ताकद दाखवून दिल्यानंतर व राज्यस्तरावरूनही नव्याने दाखल झालेल्यांची फारशी दखल घेतली जात नाही, हे लक्षात आल्यावर आपण चुकीच्या ठिकाणी आलो. जुन्या सैनिकांपुढे आपला निभाव लागणार नाही, हे लक्षात आल्याने राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले हे नेते व कार्यकर्ते आता राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील नेत्यांच्या संपर्कात आहेत. आपला निर्णय चुकल्याची कबुली देत हे नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादीत परतण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतही नवीन शिवसैनिकांची चांगलीच कोंडी झाली. त्यामुळे आपली राष्ट्रवादी बरी, अशी प्रतिक्रीयाही परतीच्या मार्गावर असलेल्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)चव्हाणना मिळणार मंत्रीपद ?दरम्यान, जिल्ह्यात शिवसेनेच्या कोणत्या आमदाराला येत्या काहीकाळात मंत्रीपद मिळणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चेचे गुऱ्हाळ घातले जात आहे. मात्र, सध्या राज्याचे पर्यावरणमंत्री असलेले रामदास कदम यांच्या विधानपरिषद सदस्यत्त्वाची मुुदत संपल्यानंतर चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. आपल्या नेत्यालाच कोणी विचारत नाहीत तर आपल्याला पक्षात कोण विचारणार, असा सूर राष्ट्रवादीतून सेनेत गेलेल्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये आहे.शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत सुंदोपसुंदी होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीकडे आता जुन्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढल्याने पुन्हा या मतदारसंघात राष्ट्रवादी जोर करू शकते. शिवसेना - भाजपच्या तुटलेल्या मनाचा फायदा राष्ट्रवादीला मिळू शकतो. त्यामुळे पुढील गणितं पाहण्यासारखी होणार आहेत.शिवसेनेत गेलेले राष्ट्रवादीचे जुनेजाणते नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादीत परतण्याच्या तयारीत आहेत. हे होणारच होते. अनेक कार्यकर्ते व नेतेही राष्ट्रवादीत परतण्याबाबत आपल्याशी सतत संपर्कात आहेत. त्यामुळे विरोधी गोटात अस्वस्थता असणे साहजिक आहे. पण, हे होणार आहे. सन्मानाने आम्ही त्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना स्वगृही घेणार आहोत. ‘सुबह का भुला, शामको वापस आये तो उसे भुला नहीं कहते’ याच न्यायाने या कार्यकर्त्यांना पक्षात स्थान दिले जाईल.-बशीर मुर्तुझा, राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस.