शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नवनगर प्राधिकरणमधून ७० हेक्टर क्षेत्र वगळले

By admin | Updated: July 2, 2015 00:22 IST

शासनाचा निर्णय : सिंधुदुर्गनगरीच्या विकासाचा मार्ग खुला; नगरविकास विभागाची अधिसूचना जारी

ओरोस : सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरणाच्या नियंत्रणातील ओरोस येथील परंपरागत निवास व शेती झोनमधील ७० हेक्टर क्षेत्र वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. तशी नगरविकास विभागाची अधिसूचनाही जारी झाल्याने या झोनमधील महामार्गाच्या पूर्वेकडील सुलोचनानगर ते पीठढवळ नदीपर्यंतचा ७० हेक्टरचा हा पट्टा झोनमधून मुक्त झाला.यापूर्वी एकदा ओरोस ग्रामपंचायतीने प्राधिकरण क्षेत्रातून जनतेची घरे, वाणिज्य आणि सार्वजनिक विकासासाठी असलेली ही जमीन वगळण्यात यावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार ओरोस येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ च्या पूर्वेकडील सर्व ७० हेक्टर क्षेत्र वगळण्याचा ठराव प्राधिकरण समितीने केला होता आणि ११ मार्च २०१० ला नगरविकास खात्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर द्वारकानाथ डिचोलकर यांनी हे क्षेत्र वगळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता शासनाने अधिसूचना काढत हे क्षेत्र वगळण्याचा निर्णय घेतल्याने ओरोसवासीयांच्या संघर्षाला यश आले.नगरविकास विभागाच्या २७ एप्रिल २०१५ च्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र वगळले आहे. वगळलेल्या क्षेत्राकरिता यापुढे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सुधारित केलेल्या मंजूर विकास आराखड्यातील नियमांनुसार बांधकाम परवानगी राहील व ही परवानगी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी घेणे आवश्यक राहील, असेही या अधिसूचनेत नमूद केले आहे.ओरोस येथील महामार्गाच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील एकूण ११५ हेक्टर क्षेत्र प्रथम मुख्यालय विकासासाठी सिडकोकडे व त्यानंतर सिंधुदुर्गनगरी नवनगर विकासासाठी प्राधिकरण समितीकडे अधिसूचित करून शासनाने दिले होते. गेली २० वर्षे या दोन वेगळ्या अधिसूचनांमुळे या झोनमधील विकासासाठी कोणतीही परवानगी प्रशासन देत नव्हते. आता हे क्षेत्र प्राधिकरण समितीच्या कार्यक्षेत्रातून वगळण्यात आल्यामुळे या ७० हेक्टर क्षेत्रातील विकासाचा मार्ग आता खुला झाला. (वार्ताहर)ख्रिश्चनवाडीसाठी लढा सुरूयाच झोनमधील ख्रिश्चनवाडीमधील रहिवासी क्षेत्र शहर विकासासाठी आवश्यक नाही. हे क्षेत्र वगळण्यात यावे, यासाठी आपला न्यायालयीन लढा सुरू राहणार असल्याचेही याचिकाकर्ते द्वारकानाथ डिचोलकर यांनी पत्रकारांना सांगितले. आपण याचिका दाखल केल्यामुळेच शासनाला हे क्षेत्र वगळावे लागले, असेही ते म्हणाले.