शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

बांदरी विभागाला नवसंजीवनी?

By admin | Updated: January 13, 2016 21:59 IST

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : महाळुंगे येथे जलोपासना अभियान

खेड : अठरा गाव बांदरी विभागातील महाळुंगे गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १७ जानेवारीला भेट देणार आहेत. येथील जगबुडी नदीच्या पाण्यावर जलोपासना अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. खेड येथील एमबीए महाविद्यालयाचे प्राध्यापक सतीश कदम यांच्या स्वत:च्या मालकीच्या ६ एकर जागेत उभारण्यात आलेल्या फार्म हाऊसमध्ये ग्रामीण पर्यटन सुरू करण्याच्या कामालाही त्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या महाळुंगेसारख्या गावात बहुउद्देशीय योजनांचा प्रथमच प्रारंभ मुख्यमंत्री यांच्याहस्ते होत आहे. हा मार्ग असलेल्या अठरा गाव धवडे बांदरी विभागातील ४० गावांतील पर्यटन आणि कृषी विकासाला यामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा त्यामुळे महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस १७ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता महाळुंगे येथे उपस्थित राहणार आहेत. गावातील केदारनाथ मंदिराजवळ यावेळी खास जलचेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जगबुडी नदीच्या पाण्यावर जलोपासना अभियानासह आंबवली महाळुंगे ग्रामीण पर्यटन कार्याला त्यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने या कोकण जलपरिक्रमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिली. जलपरिक्रमा आणि जलचेतना परिषदेमुळे येथील अठरा गाव बांदरी विभागासह तालुक्यातील कृषी आणि पर्यटन क्षेत्रही विकसित होणार आहे. या भागातील डोंगराळ भागात असलेल्या धनगरवाड्यांसह डोंगरातील अनेक गावांना वारंवार भासणारी पाणीटंचाई तसेच नदीकिनारी पारंपरिक पध्दतीने करीत असलेल्या शेतीमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने या जलचेतना परिषदेचा आणि जलपरिक्रमा योजनेचा चांगला लाभ मिळणार आहे. तसेच त्यामुळे रोजगारासह सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला हातभार लागणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री अनंत गीते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, भटक्या विमुक्त जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते आणि प्रमुख मार्गदर्शक राजेंद्रसिंह आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. (प्रतिनिधी) पर्यटनाची माहिती : १९९५ नंतर मुख्यमंत्री ग्रामीण भागात १९९५मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी तालुक्यातील महत्त्वाच्या कामांसाठी भेटी दिल्या होत्या़ त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १९९५नंतर तालुक्यातील ग्रामीण भागाला भेट देणारे पहिले मुख्यमंत्री आहेत. ग्रामीण भागाच्या पर्यटन विभागाची माहिती यानिमित्त घराघरात पोहोचणार आहे़