शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
4
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
5
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
6
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
7
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
8
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
9
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
10
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
11
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
12
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
13
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
14
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
15
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
16
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
17
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
18
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
19
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
20
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा

शिवसेना नेत्यांवर गुंडाना घेऊन फिरण्याची वेळ : नारायण राणे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 16:57 IST

आमच्यावर दहशतवादाचा आरोप करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सभांना गुंडांची उपस्थिती होती.शिवसेनेला माणसेच मिळत नसल्याने गुंड घेऊन फिरण्याची वेळ आली आहे.आम्ही मात्र विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली.त्यामुळे जनता आमच्या पूर्ण पाठीशी राहिल.नीलेश राणे ६० हजाराच्या मताधिक्याने निवडणून येतील असा विश्‍वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देशिवसेना नेत्यांवर गुंडाना घेऊन फिरण्याची वेळ : नारायण राणे यांची टीकाआम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली

कणकवली :आमच्यावर दहशतवादाचा आरोप करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सभांना गुंडांची उपस्थिती होती.शिवसेनेला माणसेच मिळत नसल्याने गुंड घेऊन फिरण्याची वेळ आली आहे.आम्ही मात्र विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली.त्यामुळे जनता आमच्या पूर्ण पाठीशी राहिल.नीलेश राणे ६० हजाराच्या मताधिक्याने निवडणून येतील असा विश्‍वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे व्यक्त केला.नारायण राणे यानी कणकवली तालुक्यातील वरवडे फणसनगर येथे मंगळवारी ११.३० वाजण्याच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला.यावेळी त्यांच्या समवेत पत्नी निलम राणे, सून प्रियांका राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.मतदानाचा हक्क बजावण्यापुर्वी नारायण राणे यानी वरवडे येथील आपल्या निवासस्थानी भेट देऊन देवदर्शन घेतले त्यानंतर फणसनगर जिल्हापरिषद शाळेतील मतदान केंद्रावर दाखल होत मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.नारायण राणे म्हणाले, गेली ३० वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.जिल्ह्याचा विकास करत असताना जात,पात,धर्म न मानता जिल्हा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवुन काम केले.त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मतदार निश्‍चितपणे निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.दहशतवादाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, दहशतवाद जिल्ह्यात कोण करतो हे कालच्या प्रसंगावरुन सिध्द झाले आहे.पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या समवेत सभेत निलेश पराडकर नामक गुंड बसतो. त्यावरुन शिवसेना हीच दहशत पसरवित असल्याचे सिध्द होत आहे.

जिल्ह्याच्या विकासाची कोणती कामे करायची नाहीत आणि समोरच्यांना बदनाम करायचे हेच शिवसेनेचे सुत्र असुन शिवसेनेत नितिमत्ता आणि धोरण शिल्लक राहीलेले नाही.उध्दव ठाकरे यांना विकासाबाबत काही देणे-घेणे राहीलेले नाही. केवळ मतांसाठी नागरिकांचा वापर करायचा हेच त्यांचे सुत्र असुन सिंधुदुर्गात दहशतवाद पसरविण्यास शिवसेनाच कारणीभुत असल्याचा आरोप खासदार नारायण राणे यानी यावेळी केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarayan Raneनारायण राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग