शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेत्यांवर गुंडाना घेऊन फिरण्याची वेळ : नारायण राणे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 16:57 IST

आमच्यावर दहशतवादाचा आरोप करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सभांना गुंडांची उपस्थिती होती.शिवसेनेला माणसेच मिळत नसल्याने गुंड घेऊन फिरण्याची वेळ आली आहे.आम्ही मात्र विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली.त्यामुळे जनता आमच्या पूर्ण पाठीशी राहिल.नीलेश राणे ६० हजाराच्या मताधिक्याने निवडणून येतील असा विश्‍वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देशिवसेना नेत्यांवर गुंडाना घेऊन फिरण्याची वेळ : नारायण राणे यांची टीकाआम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली

कणकवली :आमच्यावर दहशतवादाचा आरोप करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सभांना गुंडांची उपस्थिती होती.शिवसेनेला माणसेच मिळत नसल्याने गुंड घेऊन फिरण्याची वेळ आली आहे.आम्ही मात्र विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली.त्यामुळे जनता आमच्या पूर्ण पाठीशी राहिल.नीलेश राणे ६० हजाराच्या मताधिक्याने निवडणून येतील असा विश्‍वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे व्यक्त केला.नारायण राणे यानी कणकवली तालुक्यातील वरवडे फणसनगर येथे मंगळवारी ११.३० वाजण्याच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला.यावेळी त्यांच्या समवेत पत्नी निलम राणे, सून प्रियांका राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.मतदानाचा हक्क बजावण्यापुर्वी नारायण राणे यानी वरवडे येथील आपल्या निवासस्थानी भेट देऊन देवदर्शन घेतले त्यानंतर फणसनगर जिल्हापरिषद शाळेतील मतदान केंद्रावर दाखल होत मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.नारायण राणे म्हणाले, गेली ३० वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.जिल्ह्याचा विकास करत असताना जात,पात,धर्म न मानता जिल्हा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवुन काम केले.त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मतदार निश्‍चितपणे निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.दहशतवादाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, दहशतवाद जिल्ह्यात कोण करतो हे कालच्या प्रसंगावरुन सिध्द झाले आहे.पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या समवेत सभेत निलेश पराडकर नामक गुंड बसतो. त्यावरुन शिवसेना हीच दहशत पसरवित असल्याचे सिध्द होत आहे.

जिल्ह्याच्या विकासाची कोणती कामे करायची नाहीत आणि समोरच्यांना बदनाम करायचे हेच शिवसेनेचे सुत्र असुन शिवसेनेत नितिमत्ता आणि धोरण शिल्लक राहीलेले नाही.उध्दव ठाकरे यांना विकासाबाबत काही देणे-घेणे राहीलेले नाही. केवळ मतांसाठी नागरिकांचा वापर करायचा हेच त्यांचे सुत्र असुन सिंधुदुर्गात दहशतवाद पसरविण्यास शिवसेनाच कारणीभुत असल्याचा आरोप खासदार नारायण राणे यानी यावेळी केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarayan Raneनारायण राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग