शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

नारायण राणेंचा राजकारणातला दबदबा आजही कायम...

By वैभव देसाई | Updated: April 14, 2018 08:19 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं असं वजन निर्माण करणारे मोजकेच नेते आहेत. त्यात नारायण राणेंचं नाव हे अगत्यानंच घ्यावं लागलं. शिवसेनेत असताना आणि शिवसेना सोडल्यानंतरही राणेंना प्रदीर्घ संघर्ष करावा लागला.

महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं असं वजन निर्माण करणारे मोजकेच नेते आहेत. त्यात नारायण राणेंचं नाव हे अगत्यानंच घ्यावं लागेल. शिवसेनेत असताना आणि शिवसेना सोडल्यानंतरही राणेंना प्रदीर्घ संघर्ष करावा लागला. काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांना आश्वासन देऊनही मुख्यमंत्रिपद काही मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानं काँग्रेसनंही त्यांचं खच्चीकरण करण्याचा उपद्व्याप केला. 2014पासून नारायण राणेंचा राजकारणात असलेला दबदबा काहीसा ओसरू लागला होता.2014च्या लोकसभा निवडणुकीत राणेंचे चिरंजीव निलेश राणेंचा पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही राणेंवर कुडाळ मतदारसंघातून पराभव पत्करण्याची नामुष्की ओढवली. काँग्रेसमध्ये होत असलेलं खच्चीकरण आणि काँग्रेसची संस्कृती न रुचल्यानं 'स्वाभिमानी' राणे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अशातच कोकणात भाजपालाही हात-पाय पसरायचे असल्यानं त्यांनी राणेंना गळाला लावलं. परंतु भाजपानंही नारायण राणेंचा काँग्रेसपेक्षा जास्त अवमान केला, असं म्हटल्यासं वावगं ठरणार नाही. भाजपानं त्यांना राज्यात दोन नंबरचं मंत्रिपद देतो, अशा भूलथापाही मारल्या. राणेंनाही त्या ख-या वाटल्यानं तेसुद्धा मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले. परंतु राणेंसारखा नेता जर मंत्रिमंडळात आला तर शिवसेनेबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही काहीशी भीती वाटू लागली. राणेंनी मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा कधीही लपवून ठेवलेली नाही. अशातच त्यांना पक्षात घेऊन मंत्रिपद दिल्यास काही दिवसांनी ते मुख्यमंत्रिपदावरच दावा करतील या धास्तीनं फडणवीसही अस्वस्थ झाले. त्यामुळे त्यांनी कधी शिवसेनेचं कारण पुढे केलं, तर कधी भाजपाच्या अंतर्गत नेत्यांचा दबाव असल्याचं भासवत राणेंचा भाजपाप्रवेश रोखून धरला. मग अमित शाहांकरवी त्यांनी नारायण राणेंना स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्यास बाध्य केलं. त्यानुसार नारायण राणेंनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षसुद्धा काढला.तरीही त्यांना मंत्रिपदासाठी भाजपानं ताटकळतच ठेवलं. महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर करत भाजपानं त्यांना आपल्या कोट्यातून राज्यसभेवरही पाठवलं. परंतु राणेंचं महाराष्ट्रातील असलेलं अस्तित्व त्यांच्या 'स्वाभिमाना'नं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. नारायण राणेंचा तळकोकणात असलेला दबदबा कायम असल्याचं कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा प्रत्ययास आलं. कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं राष्ट्रवादीशी युती करत एकूण 17 जागांपैकी 11 जागांवर विजय मिळवत स्वतःचा वरचष्मा कायम राखला. या निवडणुकीत राणेंचा स्वाभिमान हा पक्ष भाजपाविरोधातच लढला. स्वाभिमान-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने घवघवीत यश संपादन करत भाजपा-शिवसेना युतीला कात्रजचा घाट दाखवला. तसेच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट संदेश पारकर यांचा पराभव करत कणकवलीतल्या त्यांच्या राजकीय वजनाला धक्का लावला. त्यामुळे राणेंचे विरोधक आपसुकच मागे पडले.  येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत निवडणुकीत राणेंच्या पक्षानं मारलेली मुसंडी वाखाणण्याजोगीच म्हणावी लागेल. नारायण राणेंच्या पक्षासमोर आता खरं आव्हान असेल ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत स्वतःची ताकद दाखवण्याचं. भाजपाबरोबर युती झाल्यास फडणवीसांना राणेंच्या मर्जीतला उमेदवार या मतदारसंघात द्यावा लागेल. त्यानंतर सावंडवाडी-वेंगुर्ला आणि कुडाळ-मालवण या विधानसभा मतदारसंघात भाजपाला त्यांच्याच विचार करून उमेदवार निवडावा लागणार आहे. पण जर भाजपाची शिवसेनेसोबत युती झाली तर राणे या सर्व मतदारसंघांतून स्वतःचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात.त्यामुळे राणेंना राजकारणात अजूनही बराच संघर्ष करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैभववाडी-कणकवली-देवगड हा मतदारसंघ राणेंचा हक्काचा आहे. तिथून त्यांचे पुत्र नितेश राणे आमदार आहेत. तो त्यांचा हक्काचा मतदारसंघ असल्यानं येत्या विधानसभा निवडणुकीत तिथून पराभव होण्याची शक्यता कमीच आहे. परंतु इतर मतदारसंघात त्यांना स्वतःची ताकद दाखवावी लागणार आहे. कोकणात दबदबा कायम ठेवायचा असल्यास नारायण राणेंना संघर्ष हा करावाच लागणार आहे. त्यामुळे येत्या काळातच राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राजकारणात तग धरतो ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे