शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

अतिआत्मविश्वासामुळे विधानसभेत पराभव: नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:11 IST

मालवण : मालवण ही माझी राजकीय कर्मभूमी आहे. मालवणवासीयांच्या प्रेमाच्या जोरावर मी सहावेळा आमदारकीसह मुख्यमंत्री बनलो. याच विश्वासाच्या जोरावर मी २०१४ च्या निवडणुकीत उभा राहिलो. माझा पराभव करण्याची विरोधकांमध्ये क्षमता नव्हती. मात्र, कार्यकर्त्यांचा निष्काळजीपणा आणि माझा अतिआत्मविश्वास माझ्या पराभवाचे मुख्य कारण आहे. मतमोजणी सुरू असताना मालवण पिछाडीवर जात होते तेव्हाच ...

मालवण : मालवण ही माझी राजकीय कर्मभूमी आहे. मालवणवासीयांच्या प्रेमाच्या जोरावर मी सहावेळा आमदारकीसह मुख्यमंत्री बनलो. याच विश्वासाच्या जोरावर मी २०१४ च्या निवडणुकीत उभा राहिलो. माझा पराभव करण्याची विरोधकांमध्ये क्षमता नव्हती. मात्र, कार्यकर्त्यांचा निष्काळजीपणा आणि माझा अतिआत्मविश्वास माझ्या पराभवाचे मुख्य कारण आहे. मतमोजणी सुरू असताना मालवण पिछाडीवर जात होते तेव्हाच पराभव निश्चित झाला होता. पराभव हा अपघात असला तरी खूप वेदना सहन कराव्या लागल्या, अशी कबुली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी मालवण येथे कार्यकर्ता मेळाव्यात दिली.मालवण येथील स्वाभिमानच्या कार्यकर्ता मेळाव्यात आगामी निवडणुकांबाबत पदाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांचे नेतृत्व जिल्ह्याला पुन्हा एकदा लाभावे, अशी हाक दिल्यानंतर राणेंनी आपल्या अध्यक्षीय भाषणात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जाहीर मीमांसा केली. यावेळच्या निवडणुकांमध्ये संधी दिल्यास निवडणुकांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेत दिसेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.राणे म्हणाले, पराभव झाला असताना मी खचून न जाता दुसºया दिवसापासून कामाला लागलो. राज्यात कोणत्या मतदारसंघात जेवढी विकासात्मक कामे झाली नसतील तेवढी कामे माझ्या मतदारसंघात झाली. सी-वर्ल्ड प्रकल्प रायगड येथे करण्याचा घाट घातला असताना मी सिंधुदुर्गात खेचून आणला. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी दिल्ली दरबारी नेले. २०१४ मध्ये विमानतळ पूर्णत्वास येत असताना आता चार वर्षे उलटली तरी उड्डाण चाचणी झालेली नाही. पालकमंत्री केवळ बढाया मारत असल्याची टीकाही राणेंनी केली....म्हणून ‘नाणार’ला विरोधखासदारांनी बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा एकही प्रकल्प सिंधुदुर्गात आणला नाही. मात्र कोकण उद्ध्वस्त करणारा नाणार येथील रिफायनरी प्रकल्प कोकणावर लादला जात आहे. नाणार परिसरात शेकडो बागायतदारांची लाखो आंबा, काजू कलमे आहेत. शिवाय कच्च्या पेट्रोलवर प्रक्रिया करून दूषित पाणी समुद्रात सोडण्यात येणार असल्याचे वायुप्रदूषण होऊन मासेमारीसह कोकणच्या निसर्गाचा ºहास होईल. कोकणी माणसाचे अस्तित्व टिकविण्यासाठी नाणार प्रकल्प कोकणात येऊ देणारच नाही, अशी भूमिकाही राणेंनी स्पष्ट केली.पालकमंत्र्यांवर मोफत उपचार करून मिळेल !जिल्ह्यातील जनतेला आरोग्याची चांगली सेवा मिळावी यासाठी हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून दिली असताना बदनामी करणाºया पालकमंत्र्यांना याच हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून दिले जातील. केवळ मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्याच्या गप्पाच मारत सुटले असून त्यासाठी जागा, निधीची आवश्यकता लागते याचा पत्ताच नाही अशा शब्दांत राणेंनी त्यांची खिल्ली उडविली. विविध समस्या सर्वसामान्यांना भेडसावत असताना स्थानिक आमदार झोपले आहेत. समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी वजन लागते, नुसते वजन असून उपयोग नाही असा उपरोधिक टोला राणे यांनी हाणला.