शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिआत्मविश्वासामुळे विधानसभेत पराभव: नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:11 IST

मालवण : मालवण ही माझी राजकीय कर्मभूमी आहे. मालवणवासीयांच्या प्रेमाच्या जोरावर मी सहावेळा आमदारकीसह मुख्यमंत्री बनलो. याच विश्वासाच्या जोरावर मी २०१४ च्या निवडणुकीत उभा राहिलो. माझा पराभव करण्याची विरोधकांमध्ये क्षमता नव्हती. मात्र, कार्यकर्त्यांचा निष्काळजीपणा आणि माझा अतिआत्मविश्वास माझ्या पराभवाचे मुख्य कारण आहे. मतमोजणी सुरू असताना मालवण पिछाडीवर जात होते तेव्हाच ...

मालवण : मालवण ही माझी राजकीय कर्मभूमी आहे. मालवणवासीयांच्या प्रेमाच्या जोरावर मी सहावेळा आमदारकीसह मुख्यमंत्री बनलो. याच विश्वासाच्या जोरावर मी २०१४ च्या निवडणुकीत उभा राहिलो. माझा पराभव करण्याची विरोधकांमध्ये क्षमता नव्हती. मात्र, कार्यकर्त्यांचा निष्काळजीपणा आणि माझा अतिआत्मविश्वास माझ्या पराभवाचे मुख्य कारण आहे. मतमोजणी सुरू असताना मालवण पिछाडीवर जात होते तेव्हाच पराभव निश्चित झाला होता. पराभव हा अपघात असला तरी खूप वेदना सहन कराव्या लागल्या, अशी कबुली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी मालवण येथे कार्यकर्ता मेळाव्यात दिली.मालवण येथील स्वाभिमानच्या कार्यकर्ता मेळाव्यात आगामी निवडणुकांबाबत पदाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांचे नेतृत्व जिल्ह्याला पुन्हा एकदा लाभावे, अशी हाक दिल्यानंतर राणेंनी आपल्या अध्यक्षीय भाषणात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जाहीर मीमांसा केली. यावेळच्या निवडणुकांमध्ये संधी दिल्यास निवडणुकांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेत दिसेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.राणे म्हणाले, पराभव झाला असताना मी खचून न जाता दुसºया दिवसापासून कामाला लागलो. राज्यात कोणत्या मतदारसंघात जेवढी विकासात्मक कामे झाली नसतील तेवढी कामे माझ्या मतदारसंघात झाली. सी-वर्ल्ड प्रकल्प रायगड येथे करण्याचा घाट घातला असताना मी सिंधुदुर्गात खेचून आणला. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी दिल्ली दरबारी नेले. २०१४ मध्ये विमानतळ पूर्णत्वास येत असताना आता चार वर्षे उलटली तरी उड्डाण चाचणी झालेली नाही. पालकमंत्री केवळ बढाया मारत असल्याची टीकाही राणेंनी केली....म्हणून ‘नाणार’ला विरोधखासदारांनी बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा एकही प्रकल्प सिंधुदुर्गात आणला नाही. मात्र कोकण उद्ध्वस्त करणारा नाणार येथील रिफायनरी प्रकल्प कोकणावर लादला जात आहे. नाणार परिसरात शेकडो बागायतदारांची लाखो आंबा, काजू कलमे आहेत. शिवाय कच्च्या पेट्रोलवर प्रक्रिया करून दूषित पाणी समुद्रात सोडण्यात येणार असल्याचे वायुप्रदूषण होऊन मासेमारीसह कोकणच्या निसर्गाचा ºहास होईल. कोकणी माणसाचे अस्तित्व टिकविण्यासाठी नाणार प्रकल्प कोकणात येऊ देणारच नाही, अशी भूमिकाही राणेंनी स्पष्ट केली.पालकमंत्र्यांवर मोफत उपचार करून मिळेल !जिल्ह्यातील जनतेला आरोग्याची चांगली सेवा मिळावी यासाठी हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून दिली असताना बदनामी करणाºया पालकमंत्र्यांना याच हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून दिले जातील. केवळ मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्याच्या गप्पाच मारत सुटले असून त्यासाठी जागा, निधीची आवश्यकता लागते याचा पत्ताच नाही अशा शब्दांत राणेंनी त्यांची खिल्ली उडविली. विविध समस्या सर्वसामान्यांना भेडसावत असताना स्थानिक आमदार झोपले आहेत. समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी वजन लागते, नुसते वजन असून उपयोग नाही असा उपरोधिक टोला राणे यांनी हाणला.