शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अतिआत्मविश्वासामुळे विधानसभेत पराभव: नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:11 IST

मालवण : मालवण ही माझी राजकीय कर्मभूमी आहे. मालवणवासीयांच्या प्रेमाच्या जोरावर मी सहावेळा आमदारकीसह मुख्यमंत्री बनलो. याच विश्वासाच्या जोरावर मी २०१४ च्या निवडणुकीत उभा राहिलो. माझा पराभव करण्याची विरोधकांमध्ये क्षमता नव्हती. मात्र, कार्यकर्त्यांचा निष्काळजीपणा आणि माझा अतिआत्मविश्वास माझ्या पराभवाचे मुख्य कारण आहे. मतमोजणी सुरू असताना मालवण पिछाडीवर जात होते तेव्हाच ...

मालवण : मालवण ही माझी राजकीय कर्मभूमी आहे. मालवणवासीयांच्या प्रेमाच्या जोरावर मी सहावेळा आमदारकीसह मुख्यमंत्री बनलो. याच विश्वासाच्या जोरावर मी २०१४ च्या निवडणुकीत उभा राहिलो. माझा पराभव करण्याची विरोधकांमध्ये क्षमता नव्हती. मात्र, कार्यकर्त्यांचा निष्काळजीपणा आणि माझा अतिआत्मविश्वास माझ्या पराभवाचे मुख्य कारण आहे. मतमोजणी सुरू असताना मालवण पिछाडीवर जात होते तेव्हाच पराभव निश्चित झाला होता. पराभव हा अपघात असला तरी खूप वेदना सहन कराव्या लागल्या, अशी कबुली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी मालवण येथे कार्यकर्ता मेळाव्यात दिली.मालवण येथील स्वाभिमानच्या कार्यकर्ता मेळाव्यात आगामी निवडणुकांबाबत पदाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांचे नेतृत्व जिल्ह्याला पुन्हा एकदा लाभावे, अशी हाक दिल्यानंतर राणेंनी आपल्या अध्यक्षीय भाषणात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जाहीर मीमांसा केली. यावेळच्या निवडणुकांमध्ये संधी दिल्यास निवडणुकांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेत दिसेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.राणे म्हणाले, पराभव झाला असताना मी खचून न जाता दुसºया दिवसापासून कामाला लागलो. राज्यात कोणत्या मतदारसंघात जेवढी विकासात्मक कामे झाली नसतील तेवढी कामे माझ्या मतदारसंघात झाली. सी-वर्ल्ड प्रकल्प रायगड येथे करण्याचा घाट घातला असताना मी सिंधुदुर्गात खेचून आणला. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी दिल्ली दरबारी नेले. २०१४ मध्ये विमानतळ पूर्णत्वास येत असताना आता चार वर्षे उलटली तरी उड्डाण चाचणी झालेली नाही. पालकमंत्री केवळ बढाया मारत असल्याची टीकाही राणेंनी केली....म्हणून ‘नाणार’ला विरोधखासदारांनी बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा एकही प्रकल्प सिंधुदुर्गात आणला नाही. मात्र कोकण उद्ध्वस्त करणारा नाणार येथील रिफायनरी प्रकल्प कोकणावर लादला जात आहे. नाणार परिसरात शेकडो बागायतदारांची लाखो आंबा, काजू कलमे आहेत. शिवाय कच्च्या पेट्रोलवर प्रक्रिया करून दूषित पाणी समुद्रात सोडण्यात येणार असल्याचे वायुप्रदूषण होऊन मासेमारीसह कोकणच्या निसर्गाचा ºहास होईल. कोकणी माणसाचे अस्तित्व टिकविण्यासाठी नाणार प्रकल्प कोकणात येऊ देणारच नाही, अशी भूमिकाही राणेंनी स्पष्ट केली.पालकमंत्र्यांवर मोफत उपचार करून मिळेल !जिल्ह्यातील जनतेला आरोग्याची चांगली सेवा मिळावी यासाठी हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून दिली असताना बदनामी करणाºया पालकमंत्र्यांना याच हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून दिले जातील. केवळ मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्याच्या गप्पाच मारत सुटले असून त्यासाठी जागा, निधीची आवश्यकता लागते याचा पत्ताच नाही अशा शब्दांत राणेंनी त्यांची खिल्ली उडविली. विविध समस्या सर्वसामान्यांना भेडसावत असताना स्थानिक आमदार झोपले आहेत. समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी वजन लागते, नुसते वजन असून उपयोग नाही असा उपरोधिक टोला राणे यांनी हाणला.