शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

लातूर विभागातून मुंबईला बस नाही

By admin | Updated: November 29, 2015 23:18 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील प्रवाशांना थेट मुंबई जाण्यासाठी लातूर आगारातून बसची सोयच नाही. मंत्रालयीन कामासाठी तसेच मुंबई सहलीसाठी लातूरहून दररोज हजारो प्रवासी

लातूर : लातूर जिल्ह्यातील प्रवाशांना थेट मुंबई जाण्यासाठी लातूर आगारातून बसची सोयच नाही. मंत्रालयीन कामासाठी तसेच मुंबई सहलीसाठी लातूरहून दररोज हजारो प्रवासी जातात़ मात्र एसटी महामंडळाने लातूर विभागातून एकही थेट गाडी मुंबईला सोडलेली नाही़ यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सचा बोलबाला आहे़ उदगीर आगारानेही दोन वर्षांपासून बस बंद केल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा झाला आहे़ लातूर आगारात लांब पल्ल्याचा प्रवास करुन प्रवासी सेवा देणाऱ्या बसेसच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ आवश्यकता असेल तिथे लातूर आगारातून बस दिली जाईल, असे आश्वासन देणाऱ्या आगार प्रमुखाने लातूर आगारातून १११ बसेसद्वारे प्रवासी सेवा देणे सुरु केले आहे़ यामध्ये लांब पल्ल्याच्या बसेस ३२ आहेत़ यामध्ये लातूर-पुणे मार्गावर १०, लातूर-औरंगाबाद ६, लातूर-कोल्हापूर ४, लातूर-हैदराबाद ३, लातूर-निजामाबाद २ यासह इतर ठिकाणी अशा एकूण ३२ बसेसच्या माध्यमातून प्रवासी सेवा सुरु केली आहे़ परंतु, ‘जिवाची मुंबई’ करण्याची ईच्छा असणाऱ्या लातूरकरांना मात्र मुंबई बस सेवेपासून वंचित रहावे लागत आहे़ इतर आगारातून नांदेड, उरन, पनवेल, देगलूर या आगारातून मुंबईला जाण्यासाठी बसेस आहेत़ परंतु, स्वतंत्र लातूरहून जाणारी मुंबई बस लातूर विभागातील पाचही आगारात सुरु करण्यात आली नाही़ यापूर्वी उदगीर-बोरवली बस सुरु होती़ परंतु, तीही बस उत्पन्नातील तोट्यामुळे विभाग नियंत्रकाच्या आदेशानुसार गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आली आहे़ त्यामुळे मंत्रालयीन कामासह इतर कामासाठी ये-जा करणाऱ्या मुंबई बसच्या अभावी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे़ महामंडळाने बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे़ लातूर जिल्ह्याची लोकसंख्या २४ लाख असताना या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईला लातूरहून एकही बस नसल्याने प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे़ (प्रतिनिधी)