शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

महिंद धरणात पाण्यापेक्षा गाळ जास्त

By admin | Updated: May 12, 2015 23:41 IST

१८ वर्षांपासून गाळ जैसे थे : शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; वांग नदीत पाणी सोडण्यावर मर्यादा

सणबूर : ढेबेवाडी विभागाला वरदान लाभलेल्या वांग नदीवरील महिंद धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे. १८ वर्षांपासून या धरणातील गाळ न काढल्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त गाळाने धरण भरल्याने धरणात अतिशय कमी प्रमाणात पाणीसाठा होत आहे. महिंद धरणामध्ये १८ वर्षांपूर्वी पाणी अडवायला सुरुवात झाली. ८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेच्या या धरणाचे लाभक्षेत्र बनपुरी गावापर्यंतच आहे. या धरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटायला काही प्रमाणात मदत होत आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रात कृष्णा खोरे विकास महामंडळाने बंधारे बांधले आहेत. मात्र धरणातच पाणी कमी असल्याने या बंधाऱ्यात पाणी साठवता येत नाही. उन्हाळ्यात या विभागातील लोेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. धरणातून पाणी सोडले गेले तर ही वेळ येणार नाही हे खरे आहे मात्र धरणातील गाळ न काढल्यामुळे धरणातच अतिशय कमी प्रमाणात पाणीसाठा होत असल्याने पाणी कसं सोडायच, हाही प्रश्न धरण प्रशासनासमोर आहे. मात्र त्यांनी यावर तोडगा काढण्याची गरज आहे. महिंद धरणातील गाळ काढून धरणाची थोडी उंची वाढवावी, तसेच विभागातील लोकांना पाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. या धरणाचे पाणी याच विभागातील लोकांना मिळत नसेल तर या धरणाचा उपयोग काय? असा प्रश्न विभागातील जनता करीत आहे. (वार्ताहर) महिंद धरणातील गाळ काढला तर धरणातील पाणीसाठा वाढेल शिवाय उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न जाणवणार नाही. यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने नियोजन करून धरणातील गाळ काढण्याची गरज आहे. तरच धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. - संजय लोहार, उपसरपंच,मंद्रुळकोळे खुर्द पाझर तलावही कोरडेढेबेवाडी विभागातील अनेक गावात पाझर तलावांचे जाळे आहे. या तलावात पाणीसाठा झाल्यानंतर नजीकच्या विहिरींची पाणी पातळी वाढते. मात्र, सध्या पाझर तलावांची अवस्थाही बिकट आहे. तलावामध्ये पाण्यापेक्षा गाळ जास्त प्रमाणात असल्याने पावसाळ्यात तलावामध्ये कमी प्रमाणात पाणी साचते. नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर हा पाणीसाठा राहतो. त्यानंतर तलावही कोरडे पडतात. परिणामी, परिसरातील गावांचा पाणीप्रश्न अधिकच गंभीर होतो.