शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

महिंद धरणात पाण्यापेक्षा गाळ जास्त

By admin | Updated: May 12, 2015 23:41 IST

१८ वर्षांपासून गाळ जैसे थे : शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; वांग नदीत पाणी सोडण्यावर मर्यादा

सणबूर : ढेबेवाडी विभागाला वरदान लाभलेल्या वांग नदीवरील महिंद धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे. १८ वर्षांपासून या धरणातील गाळ न काढल्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त गाळाने धरण भरल्याने धरणात अतिशय कमी प्रमाणात पाणीसाठा होत आहे. महिंद धरणामध्ये १८ वर्षांपूर्वी पाणी अडवायला सुरुवात झाली. ८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेच्या या धरणाचे लाभक्षेत्र बनपुरी गावापर्यंतच आहे. या धरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटायला काही प्रमाणात मदत होत आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रात कृष्णा खोरे विकास महामंडळाने बंधारे बांधले आहेत. मात्र धरणातच पाणी कमी असल्याने या बंधाऱ्यात पाणी साठवता येत नाही. उन्हाळ्यात या विभागातील लोेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. धरणातून पाणी सोडले गेले तर ही वेळ येणार नाही हे खरे आहे मात्र धरणातील गाळ न काढल्यामुळे धरणातच अतिशय कमी प्रमाणात पाणीसाठा होत असल्याने पाणी कसं सोडायच, हाही प्रश्न धरण प्रशासनासमोर आहे. मात्र त्यांनी यावर तोडगा काढण्याची गरज आहे. महिंद धरणातील गाळ काढून धरणाची थोडी उंची वाढवावी, तसेच विभागातील लोकांना पाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. या धरणाचे पाणी याच विभागातील लोकांना मिळत नसेल तर या धरणाचा उपयोग काय? असा प्रश्न विभागातील जनता करीत आहे. (वार्ताहर) महिंद धरणातील गाळ काढला तर धरणातील पाणीसाठा वाढेल शिवाय उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न जाणवणार नाही. यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने नियोजन करून धरणातील गाळ काढण्याची गरज आहे. तरच धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. - संजय लोहार, उपसरपंच,मंद्रुळकोळे खुर्द पाझर तलावही कोरडेढेबेवाडी विभागातील अनेक गावात पाझर तलावांचे जाळे आहे. या तलावात पाणीसाठा झाल्यानंतर नजीकच्या विहिरींची पाणी पातळी वाढते. मात्र, सध्या पाझर तलावांची अवस्थाही बिकट आहे. तलावामध्ये पाण्यापेक्षा गाळ जास्त प्रमाणात असल्याने पावसाळ्यात तलावामध्ये कमी प्रमाणात पाणी साचते. नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर हा पाणीसाठा राहतो. त्यानंतर तलावही कोरडे पडतात. परिणामी, परिसरातील गावांचा पाणीप्रश्न अधिकच गंभीर होतो.