शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिंद धरणात पाण्यापेक्षा गाळ जास्त

By admin | Updated: May 12, 2015 23:41 IST

१८ वर्षांपासून गाळ जैसे थे : शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; वांग नदीत पाणी सोडण्यावर मर्यादा

सणबूर : ढेबेवाडी विभागाला वरदान लाभलेल्या वांग नदीवरील महिंद धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे. १८ वर्षांपासून या धरणातील गाळ न काढल्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त गाळाने धरण भरल्याने धरणात अतिशय कमी प्रमाणात पाणीसाठा होत आहे. महिंद धरणामध्ये १८ वर्षांपूर्वी पाणी अडवायला सुरुवात झाली. ८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेच्या या धरणाचे लाभक्षेत्र बनपुरी गावापर्यंतच आहे. या धरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटायला काही प्रमाणात मदत होत आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रात कृष्णा खोरे विकास महामंडळाने बंधारे बांधले आहेत. मात्र धरणातच पाणी कमी असल्याने या बंधाऱ्यात पाणी साठवता येत नाही. उन्हाळ्यात या विभागातील लोेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. धरणातून पाणी सोडले गेले तर ही वेळ येणार नाही हे खरे आहे मात्र धरणातील गाळ न काढल्यामुळे धरणातच अतिशय कमी प्रमाणात पाणीसाठा होत असल्याने पाणी कसं सोडायच, हाही प्रश्न धरण प्रशासनासमोर आहे. मात्र त्यांनी यावर तोडगा काढण्याची गरज आहे. महिंद धरणातील गाळ काढून धरणाची थोडी उंची वाढवावी, तसेच विभागातील लोकांना पाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. या धरणाचे पाणी याच विभागातील लोकांना मिळत नसेल तर या धरणाचा उपयोग काय? असा प्रश्न विभागातील जनता करीत आहे. (वार्ताहर) महिंद धरणातील गाळ काढला तर धरणातील पाणीसाठा वाढेल शिवाय उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न जाणवणार नाही. यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने नियोजन करून धरणातील गाळ काढण्याची गरज आहे. तरच धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. - संजय लोहार, उपसरपंच,मंद्रुळकोळे खुर्द पाझर तलावही कोरडेढेबेवाडी विभागातील अनेक गावात पाझर तलावांचे जाळे आहे. या तलावात पाणीसाठा झाल्यानंतर नजीकच्या विहिरींची पाणी पातळी वाढते. मात्र, सध्या पाझर तलावांची अवस्थाही बिकट आहे. तलावामध्ये पाण्यापेक्षा गाळ जास्त प्रमाणात असल्याने पावसाळ्यात तलावामध्ये कमी प्रमाणात पाणी साचते. नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर हा पाणीसाठा राहतो. त्यानंतर तलावही कोरडे पडतात. परिणामी, परिसरातील गावांचा पाणीप्रश्न अधिकच गंभीर होतो.