शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

मुुंबईरिटर्न हात राबताहेत

By admin | Updated: April 20, 2015 00:01 IST

अडीच एकर शेतीत बटाटा लागवड करण्याचा निर्णय घेतला व कायमची मुंबई सोडली. मुंबईत चाकरमानी म्हणून जीवन जगण्यापेक्षा आपला गावच बरा,

शिवाजी गोरे - दापोली -मुुंबईत २० वर्षे राहून जीवाची मुंबई केली. परंतु वाढती महागाई व बंद पडलेले उद्योगधंदे यामुळे सर्वसामान्य माणसाचे मुुंबईत खायचे वांदे होऊ लागले आहेत. मुंबईत गेली २० वर्षे सुकोंडी येथील तरुण महेंद्र जोशी यांनी लग्नपत्रिका छपाईच्या व्यवसायात काम केले. परंतु महिन्याच्या शेवटी हातात काहीच शिल्लक राहात नसल्याने गावाकडील अडीच एकर शेतीत बटाटा लागवड करण्याचा निर्णय घेतला व कायमची मुंबई सोडली. मुंबईत चाकरमानी म्हणून जीवन जगण्यापेक्षा आपला गावच बरा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.सुकोंडी गावातील तरुण २० वर्षांपूर्वी मोठ्या उमेदीने मुंबईत गेला होता. इतरांना जसे मुुंबईचे आकर्षण आहे तसेच आकर्षण त्यालासुद्धा वाटत होते. परंतु शिक्षण कमी असल्यामुळे मुुंबईत जाऊन वेठबिगारी काम करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. अनेक तरुण मुंबईत मोठ्या अपेक्षेने येतात. परंतु मुंबईत गेल्यावर भ्रमनिरास होतो. महेंद्र जोशींना मुंबईत गेल्यावर आपल्याला चांगली नोकरी मिळेल, असे वाटत होते. परंतु तसं काही झालं नाही. नाईलाजाने लग्नपत्रिका छपाई कारखान्यात काम मिळाले. परंतु पगार कमी असल्यामुळे खर्चही भागत नव्हता. त्यानंतर भाड्याने जागा घेऊन लग्नपत्रिका छपाई करण्याचा व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न केला. कामासाठी माणसे मिळत नसल्याने तो व्यवसायसुद्धा बंद पडला. त्यामुळे गावाकडे जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. अनेक तरुणांना गावात शेती करणे कमीपणाचे वाटू लागते. येथील तरूण मुंबईत जाऊन वेठबिगारीची कामे करतात, पण गावात शेती करणार नाहीत. मात्र, महेंद्र जोशी या तरुणाने मुंंबई सोडून गावात राहण्याचा निर्णय घेतला. गेली दोन वर्षे बटाटा शेती, कलिंगड, वांगी, टोमॅटो, भोपळा, मिरची, मटार, काकडीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. कोकरी कुकराज या बटाट्याच्या जातीची लागवड करुन सुकोंडीच्या कातळावर कष्टातून जिद्दीने बटाट्याची शेती केली. शेतीचा संपूर्ण खर्च वजा जाता एकरी १ लाख रुपये उत्पन्न घेण्याची किमया त्यांनी साधली आहे. आपल्या कुटुंबीयांसमवेत गावात काबाडकष्ट करुन एक एकर जमिनीत १ लाख रुपये इतका नफा मिळवून गावाकडची शेतीच बरी असे दाखवून दिले आहे. बटाट्याला चांगली मागणी असल्याने पुढच्या वर्षी अधिक लागवड करण्याचा मानस जोशी यांनी व्यक्त केला आहे. आंबा - काजू लागवडीला जोडधंदा म्हणून बटाटा शेती व भाजीपाला शेती करण्याचा आपला मानस असल्याचे जोशी यांचे म्हणणे आहे.दापोली तालुक्यातील सुकोंडीतील तरूणाने २० वर्षांपूर्वी उपजीविकेसाठी मुंबई गाठली. मात्र, कमी शिक्षणामुळे त्याला वेठबिगारी करण्याखेरीज अन्य पर्याय उरला नव्हता. चांगली नोकरी मिळेल या इच्छेने तो तिथे धडपडत राहिला. मात्र, त्याच्या पदरी निराशा आली. अनेक वर्षे प्रतीक्षा करीत थांबणे त्याने पसंत केले. सुकोंडीच्या या तरूणाने मुंबईतून गावाला येणे पसंत केले आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. अनेकांना गावात शेती करणे कमीपणाचे वाटते. मात्र, ते त्यानी वाटून घेतले नाही. कोकरी कुकराज या बटाट्याच्या लागवडीने त्यांचे स्वप्न पूर्ण केले. पहिली दोन वर्षे कलिंगड, बटाटा , वांगी, टोमॅटो, भोपळा यांची शेती त्याने केली. कातळावर आंबा लागवड होते, ती यशस्वीही होते हे अनेक लोकांनी दाखवून दिले आहे. मात्र, महेश जोशी यांनी कातळावर बटाट्याची लागवड करून लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. बटाट्याला चांगली मागणी आहे. आंबा, काजूला जोडधंदा म्हणून कोकणातील शेतकऱ्यांनी बटाटा लागवड करावी, असा सल्ला जोशी यांनी येथील शेतकऱ्यांना दिला.