शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

चळवळ केवळ जात, आरक्षणापुरती नको

By admin | Updated: February 8, 2015 01:00 IST

प्रकाश आंबेडकर : वणंदमध्ये रमाई स्मारकाचे उद्घाटन

दापोली : आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भावनिकदृष्ट्या घराघरांत पोहोचले. मात्र, आता या चळवळीचा प्रवास केवळ जात आणि आरक्षण इथपर्यंत मर्यादित न ठेवता तो व्यापक झाला पाहिजे. त्यामुळे यापुढे लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिकदृष्ट्या ओळखायला हवे. त्यांचे विचार लोकांनी आत्मसात करायला हवेत, असे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. दापोली तालुक्यातील वणंद येथे शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई यांच्या जगातील पहिल्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी लाखो आंबेडकरांच्या अनुयायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूनबाई मीरा आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. संपूर्ण राज्यातून अपेक्षेपेक्षा जास्त कार्यकर्ते वणंद येथे आल्याने दापोली परिसराला चैतन्यभूमीचे स्वरूप आले होते. समाजाने यापुढे निव्वळ आरक्षणाच्या भरवशावर न राहता ही आरक्षणे बंद होणार हे लक्षात घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवे. यासाठी शिक्षण, उद्योग व्यवसायामध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढायला हवाय. काही विरोधक समाजात फूट पाडून स्वार्थ साधायचा प्रयत्न करतात, त्यांना दूर ठेवायला हवे. आंबेडकरी विचारांची चळवळ प्रत्येक कार्यकर्त्याने झोकून देऊन वाढवायला हवी, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळ आणि स्मारके बांधण्याची कामे केवळ आंबेडकर नावाच्या माणसांनीच करावयाची काय? असा प्रश्न करीत आंबेडकरांच्या नावाचा वापर स्वार्थासाठी करणाऱ्या इतरांनीही काहीतरी करायची जबाबदारी घ्यायला हवी, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात या स्मारकाचे उद्घाटन मीरा आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले. (प्रतिनिधी)