शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

आंदोलने-मोर्चांची अधिकाऱ्यांना धास्ती

By admin | Updated: April 11, 2017 00:34 IST

बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज; सावंतवाडीत दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना हवे स्वसंरक्षण

सावंतवाडी : दीपक केसरकर यांचे राजकीय वजन वाढल्याचा त्रास सध्या तालुक्यातील अधिकारीवर्गाला सहन करावा लागत आहे. सावंतवाडीचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्यात महत्त्वाचे मंत्रिपद दीपक केसरकरांकडे असल्याने हा तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनत चालला आहे. अचानक होणारी आंदोलने, मोर्चा तसेच उपोषणे यांची धास्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घेतली असून, तालुक्यातील दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे स्वसंरक्षणार्थ बंदुकीची मागणी केली आहे. मात्र, त्यांचा हा प्रस्ताव सध्या तरी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.सिंधुदुर्ग जिल्हा गेली पंधरा वर्षे राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. यापूर्वी जिल्ह्यातील राजकारणाचे सत्ताकेंद्र हे कणकवली होते. कारण नारायण राणे यांचा मतदारसंघ तसेच मंत्रिमंडळातही वजनदार मंत्री असल्याने नेहमीच विरोधी पक्ष त्यांना मतदारसंघातच घेरण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, २०१४ नंतर सिंधुदुर्गच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा सावंतवाडी झाला आहे. दीपक केसरकर यांना शिवसेनेने मंत्रिमंडळात स्थान दिल्याने ते जिल्ह्याचे पालकमंत्री बनले आहेत. तसेच गृहराज्यमंत्रिपद त्यांच्याजवळ असल्याने नेहमीच ते विरोधी पक्षाच्या रडारवर आहेत. त्यातच अचानक होणारी आंदोलने, मोर्चा, उपोषणे तसेच घेराव यामुळेही या मतदारसंघातील अधिकारी चांगलेच धास्तावल्याचे दिसून येत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मायनिंगपासून ते मच्छिमारीपर्यंत ज्वलंत प्रश्न आहेत. तसेच अधूनमधून वेगवेगळ््या विषयावर घेराव व आंदोलनेही होत असतात. या सर्व कारणांनी अधिकारीही घाबरतात. अनेकवेळा अचानक होणाऱ्या आंदोलनांना पोलिसांपूर्वी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच सामोरे जावे लागत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची सावधानता म्हणून सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार व तहसीलदार सतीश कदम यांनी पोलिसांजवळ स्वसंरक्षणार्थ बंदुकीची मागणी केली आहे.यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भाच्या काही भागात अवैध वाळू उत्खनन होत होते. तसेच चंद्रपूरमधील कोळसा उत्खनन यामुळे काहीवेळा अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रकार वाढले होते. त्याठिकाणी अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षण तसेच स्वसंरक्षणार्थ बंदुकाही देण्यात येतात, पण सावंतवाडीसारख्या ठिकाणी यापूर्वी अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नाही. असे असतानाही सावंतवाडीचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार व तहसीलदार सतीश कदम यांनी स्वसंरक्षणार्थ बंदुकीची मागणी केली आहे.याबाबतचा प्रस्ताव सावंतवाडी पोलिसांना देण्यात आला असून, त्यांनी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. या प्रस्तावावर पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी हे निर्णय घेणार आहेत. तरीही मंत्री केसरकर यांच्या मतदारसंघात अधिकाऱ्यांनी मागितलेल्या पोलिस संरक्षणामुळे अधिकारीवर्गात मात्र खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)