शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
3
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
4
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
5
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
6
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
7
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
8
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
9
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
10
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
11
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
12
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
13
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
14
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
15
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
16
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
17
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
18
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
19
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
20
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

आंदोलने-मोर्चांची अधिकाऱ्यांना धास्ती

By admin | Updated: April 11, 2017 00:34 IST

बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज; सावंतवाडीत दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना हवे स्वसंरक्षण

सावंतवाडी : दीपक केसरकर यांचे राजकीय वजन वाढल्याचा त्रास सध्या तालुक्यातील अधिकारीवर्गाला सहन करावा लागत आहे. सावंतवाडीचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्यात महत्त्वाचे मंत्रिपद दीपक केसरकरांकडे असल्याने हा तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनत चालला आहे. अचानक होणारी आंदोलने, मोर्चा तसेच उपोषणे यांची धास्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घेतली असून, तालुक्यातील दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे स्वसंरक्षणार्थ बंदुकीची मागणी केली आहे. मात्र, त्यांचा हा प्रस्ताव सध्या तरी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.सिंधुदुर्ग जिल्हा गेली पंधरा वर्षे राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. यापूर्वी जिल्ह्यातील राजकारणाचे सत्ताकेंद्र हे कणकवली होते. कारण नारायण राणे यांचा मतदारसंघ तसेच मंत्रिमंडळातही वजनदार मंत्री असल्याने नेहमीच विरोधी पक्ष त्यांना मतदारसंघातच घेरण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, २०१४ नंतर सिंधुदुर्गच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा सावंतवाडी झाला आहे. दीपक केसरकर यांना शिवसेनेने मंत्रिमंडळात स्थान दिल्याने ते जिल्ह्याचे पालकमंत्री बनले आहेत. तसेच गृहराज्यमंत्रिपद त्यांच्याजवळ असल्याने नेहमीच ते विरोधी पक्षाच्या रडारवर आहेत. त्यातच अचानक होणारी आंदोलने, मोर्चा, उपोषणे तसेच घेराव यामुळेही या मतदारसंघातील अधिकारी चांगलेच धास्तावल्याचे दिसून येत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मायनिंगपासून ते मच्छिमारीपर्यंत ज्वलंत प्रश्न आहेत. तसेच अधूनमधून वेगवेगळ््या विषयावर घेराव व आंदोलनेही होत असतात. या सर्व कारणांनी अधिकारीही घाबरतात. अनेकवेळा अचानक होणाऱ्या आंदोलनांना पोलिसांपूर्वी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच सामोरे जावे लागत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची सावधानता म्हणून सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार व तहसीलदार सतीश कदम यांनी पोलिसांजवळ स्वसंरक्षणार्थ बंदुकीची मागणी केली आहे.यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भाच्या काही भागात अवैध वाळू उत्खनन होत होते. तसेच चंद्रपूरमधील कोळसा उत्खनन यामुळे काहीवेळा अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रकार वाढले होते. त्याठिकाणी अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षण तसेच स्वसंरक्षणार्थ बंदुकाही देण्यात येतात, पण सावंतवाडीसारख्या ठिकाणी यापूर्वी अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नाही. असे असतानाही सावंतवाडीचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार व तहसीलदार सतीश कदम यांनी स्वसंरक्षणार्थ बंदुकीची मागणी केली आहे.याबाबतचा प्रस्ताव सावंतवाडी पोलिसांना देण्यात आला असून, त्यांनी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. या प्रस्तावावर पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी हे निर्णय घेणार आहेत. तरीही मंत्री केसरकर यांच्या मतदारसंघात अधिकाऱ्यांनी मागितलेल्या पोलिस संरक्षणामुळे अधिकारीवर्गात मात्र खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)