शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरमध्ये आंदोलन

By admin | Updated: August 30, 2015 00:33 IST

मागण्यांकडे दुर्लक्ष : ७ पासून बेमुदत संप

रत्नागिरी : चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांची खासगी भरती रद्द करणे, अनुकंपा तत्त्वावरील सेवाभरती विनाअट करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तसेच वैद्यकीय कारणास्तव अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास सेवेत सामावून घेणे, यांसह एकूण २४ मागण्या शासनाने प्रलंबित ठेवल्याने लढा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा एकवटले आहेत. या मागण्यांचा विचार झाला नाही, तर येत्या १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. तरीही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ७ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे. शासनाच्या सेवेतील सर्वांत कमी वेतन घेणारा वर्ग म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. मात्र, शासनाने त्यांना सहाव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र रचले असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांत ३० टक्के चतुर्थ श्रेणी कर्मचारी अतिरिक्त ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अतिरिक्ततेची टांगती तलवार आहे. यांसह कित्येक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांनी १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या लढ्याला येत्या १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण १ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. २ सप्टेंबरला लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. ३ व ४ सप्टेंबरला दुपारी २ वाजता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. तर ५ सप्टेंबरला सकाळी १० ते १२ या वेळेत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा संघटनेने जिल्हा दौरा करून तालुकावार कार्यकारिणी बांधणी केली आहे. १ सप्टेंबरपासून सुरू होणारे हे आंदोलन १०० टक्के यशस्वी करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेचे सचिव महंमद पठाण यांनी केले आहे. (प्रतिनिधी)