शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरमध्ये आंदोलन

By admin | Updated: August 30, 2015 00:33 IST

मागण्यांकडे दुर्लक्ष : ७ पासून बेमुदत संप

रत्नागिरी : चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांची खासगी भरती रद्द करणे, अनुकंपा तत्त्वावरील सेवाभरती विनाअट करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तसेच वैद्यकीय कारणास्तव अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास सेवेत सामावून घेणे, यांसह एकूण २४ मागण्या शासनाने प्रलंबित ठेवल्याने लढा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा एकवटले आहेत. या मागण्यांचा विचार झाला नाही, तर येत्या १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. तरीही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ७ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे. शासनाच्या सेवेतील सर्वांत कमी वेतन घेणारा वर्ग म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. मात्र, शासनाने त्यांना सहाव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र रचले असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांत ३० टक्के चतुर्थ श्रेणी कर्मचारी अतिरिक्त ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अतिरिक्ततेची टांगती तलवार आहे. यांसह कित्येक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांनी १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या लढ्याला येत्या १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण १ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. २ सप्टेंबरला लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. ३ व ४ सप्टेंबरला दुपारी २ वाजता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. तर ५ सप्टेंबरला सकाळी १० ते १२ या वेळेत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा संघटनेने जिल्हा दौरा करून तालुकावार कार्यकारिणी बांधणी केली आहे. १ सप्टेंबरपासून सुरू होणारे हे आंदोलन १०० टक्के यशस्वी करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेचे सचिव महंमद पठाण यांनी केले आहे. (प्रतिनिधी)