शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

‘देवाचा डोंगर’वर आटआट

By admin | Updated: January 19, 2015 00:23 IST

शासनाचे दुर्लक्ष : कच्चा रस्ता, महिलांची पायपीट चालूच

श्रीकांत चाळके - खेड तालुक्यातील तुळशी देवाचा डोंगर या गावातील धनगरवाडीचा पाण्याचा आधारच संपल्याने, येथील ग्रामस्थांना घरापासून ४ किलोमीटर अंतरावरील जामगे गावात जावे लागते. देवाच्या डोंगर पायथ्याशी असलेल्या छोटयाशा पाण्याच्या डबक्यातील पाणी संपल्याने आतापासुनच ही पायपीट सुरू झाली आहे़ तुळशीपासून ४ किलोमिटर अंतरावरील ही वाडी़ रस्ता देखील कच्चा, तोही दगडधोंड्यातून जाणारा़ रामदास कदमांनीच हा रस्ता तयार केला. मात्र त्यानंतर या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे कोणी ढुकुनही पाहिले नाही़ डोंगरदऱ्यामध्ये ही वाडी असल्याने शासनाचा पाण्याचा टँकर तेथे जात नसल्याने प्रशासनही हताश झाले आहे़खेड शहरापासून तुळशी देवाचा डोंगर हे २० किलोमिटर अंतरावर आहे़ या धनगरवाडीलगतच महादेवाचे मंदिर आहे़ याच गावामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात वसलेल्या अनेक वस्त्यापैकी धनगर समाजाची एक वाडी वसली आहे़ या वाडीत या समाजाची अवघी १० घरे आहेत़ येथील २५ ग्रामस्थांना येथे कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही़ या वाडीत लहानसा प-या आहे़ पाणी नोव्हेंबरपर्यंत पुरते़ त्यानंतर ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडतात. वाडी डोंगरावर असल्याने त्याना तुळशी गावात खाली उतरावे लागते. हे पाणी आणण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यात येतो. ज्यांच्याकडे वाहने नाहीत त्यांना डोंगरावरून जामगे गावात ४ किलोमीटरवर उतरावे लागत असल्याने पाणी घेऊन पुन्हा डोंगरावर चढणे अशक्यप्राय होत असल्याने दररोज एवढे अंतर चालत जावून पाण्यासाठी तीन तीन खेपा माराव्या लागत आहेत़ अशातच रस्ता खराब आणि बिकट असल्याने दोन दिवसाला पुरेल एवढे पाणी एकाच दिवशी भरावे लागत आहे़ आतापासुनच या धनगरवाडयांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे़ त्यांच्या गाई म्हैशींना पाणी पुरवण्याचे मोठे काम त्यांना करावे लागत आहे़ हे अवघड असले तरीही कसलीही तमा न बाळगता त्यांना हे करावे लागत आहे. धनगरवाड्यामध्ये असलेल्या या पाणी टंचाईला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात असून शासनाने यात लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. पाण्याचा प्रश्न प्रलंबित खेड तालुक्यातील देवाचा डोंगर येथील पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित.ाुळशी देवाचा डोंगरला कायमच पाण्याची प्रतिक्षा. ग्रामस्थांना करावी लागतेय ४ किलोमीटर पायपीट.पायथ्याशी असलेल्या छोट्याशा डबक्यातील पाणी संपले.डोंगरमाथ्यावर जाताना ग्रामस्थांना करावा लागतोय संघर्ष.कच्चा रस्ता, डांबरीकरण नाही, टँकर जात नसल्याने प्रशासनही हताश.नोव्हेंबरातच पाणी नाही.