शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘देवाचा डोंगर’वर आटआट

By admin | Updated: January 19, 2015 00:23 IST

शासनाचे दुर्लक्ष : कच्चा रस्ता, महिलांची पायपीट चालूच

श्रीकांत चाळके - खेड तालुक्यातील तुळशी देवाचा डोंगर या गावातील धनगरवाडीचा पाण्याचा आधारच संपल्याने, येथील ग्रामस्थांना घरापासून ४ किलोमीटर अंतरावरील जामगे गावात जावे लागते. देवाच्या डोंगर पायथ्याशी असलेल्या छोटयाशा पाण्याच्या डबक्यातील पाणी संपल्याने आतापासुनच ही पायपीट सुरू झाली आहे़ तुळशीपासून ४ किलोमिटर अंतरावरील ही वाडी़ रस्ता देखील कच्चा, तोही दगडधोंड्यातून जाणारा़ रामदास कदमांनीच हा रस्ता तयार केला. मात्र त्यानंतर या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे कोणी ढुकुनही पाहिले नाही़ डोंगरदऱ्यामध्ये ही वाडी असल्याने शासनाचा पाण्याचा टँकर तेथे जात नसल्याने प्रशासनही हताश झाले आहे़खेड शहरापासून तुळशी देवाचा डोंगर हे २० किलोमिटर अंतरावर आहे़ या धनगरवाडीलगतच महादेवाचे मंदिर आहे़ याच गावामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात वसलेल्या अनेक वस्त्यापैकी धनगर समाजाची एक वाडी वसली आहे़ या वाडीत या समाजाची अवघी १० घरे आहेत़ येथील २५ ग्रामस्थांना येथे कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही़ या वाडीत लहानसा प-या आहे़ पाणी नोव्हेंबरपर्यंत पुरते़ त्यानंतर ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडतात. वाडी डोंगरावर असल्याने त्याना तुळशी गावात खाली उतरावे लागते. हे पाणी आणण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यात येतो. ज्यांच्याकडे वाहने नाहीत त्यांना डोंगरावरून जामगे गावात ४ किलोमीटरवर उतरावे लागत असल्याने पाणी घेऊन पुन्हा डोंगरावर चढणे अशक्यप्राय होत असल्याने दररोज एवढे अंतर चालत जावून पाण्यासाठी तीन तीन खेपा माराव्या लागत आहेत़ अशातच रस्ता खराब आणि बिकट असल्याने दोन दिवसाला पुरेल एवढे पाणी एकाच दिवशी भरावे लागत आहे़ आतापासुनच या धनगरवाडयांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे़ त्यांच्या गाई म्हैशींना पाणी पुरवण्याचे मोठे काम त्यांना करावे लागत आहे़ हे अवघड असले तरीही कसलीही तमा न बाळगता त्यांना हे करावे लागत आहे. धनगरवाड्यामध्ये असलेल्या या पाणी टंचाईला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात असून शासनाने यात लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. पाण्याचा प्रश्न प्रलंबित खेड तालुक्यातील देवाचा डोंगर येथील पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित.ाुळशी देवाचा डोंगरला कायमच पाण्याची प्रतिक्षा. ग्रामस्थांना करावी लागतेय ४ किलोमीटर पायपीट.पायथ्याशी असलेल्या छोट्याशा डबक्यातील पाणी संपले.डोंगरमाथ्यावर जाताना ग्रामस्थांना करावा लागतोय संघर्ष.कच्चा रस्ता, डांबरीकरण नाही, टँकर जात नसल्याने प्रशासनही हताश.नोव्हेंबरातच पाणी नाही.