शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

मोटारसायकल सफर लवकरच पर्यटकांच्या सेवेला

By admin | Updated: February 8, 2016 00:57 IST

दीपक माने यांची माहिती : खासगी कंपनीशी करार

सिंधुदुर्गनगरी : महाबळेश्वर आणि पाचगणीप्रमाणेच आता सिंधुदुर्गातही पर्यटकांना मोटारसायकलचा आनंद घेता येणार आहे. यासाठी प्रक्रिया आता शासनस्तरावर सुरू झाली असून, यासाठी एका खासगी कंपनीशी करार करण्यात आला आहे. ही मोटारसायकल सफर आता लवकरच सिंधुदुर्गाच्या सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास सिंधुदुर्गचे प्रकल्प अधिकारी दीपक माने यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाची भुरळ देशाबरोेबरच परदेशी पर्यटकांनाही पडली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात अजूनही मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यटकांसाठी सिंधुदुर्ग पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने ‘टूर आॅन टू व्हीलर’ ही योजना अमलात आणणार आहे.महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणी पर्यटन सफर योजना सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीशी करार करण्यात आला असून, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांनी पुढाकार घेतला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांच्या सोयीसाठी निवास व न्याहरी योजना राबविण्यात येत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६२ निवास न्याहरी असून आता पर्यटकांना राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी या सर्व न्याहरी आता आॅनलाईन करण्यात आल्या असून या सर्वांची माहिती आता पर्यटन विभागाच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक निवास न्याहरी प्रकल्पाच्या ठिकाणी ए.सी., नॉन ए.सी.बाबत आकारण्यात येणारे भाडे, आदींची माहिती पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे भारतासह विदेशातील पर्यटकांना या सर्व निवास न्याहरी योजनांमध्ये बुकिंग करता येणार आहे. या आॅनलाईनसाठीची कार्यशाळा या जिल्ह्यात मालवण, कसाल आणि वेंगुर्ला या तीन ठिकाणी घेण्यात आल्या होत्या, अशी माहिती माने यांनी दिली. (प्रतिनिधी)असे असणार भाड्याचे दर सिंधुदुर्गातील हिल निसर्ग, स्टेशन, समुद्र किनारे, आदींची मोटारसायकलच्या माध्यमातून सफर करण्यासाठी विविध कंपन्यांच्या मोटारसायकली विविध पर्यटन विभाग ठेवणार असून, या मोटारसायकली बुकिंगसाठी प्रतिमोटारसायकल १००० रुपये घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या मोटारसायकली जे पर्यटक घेऊ न जातील त्या पर्यटकांना प्रती मोटारसायकल स्वत: पेट्रोल भरून १७५ रुपये १२ तासांसाठी अशाप्रकारे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर १२ तासांत जर ही गाडी परत आणून दिली नाही, तर प्रतितास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे दीपक माने यांनी सांगितले.