शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

रमार्इंच्या ‘माहेर’चा होणार विकास

By admin | Updated: February 18, 2016 21:29 IST

वणंदचा आराखडा शासनाकडे : अडीच कोटींची होणार कामे

शोभना कांबळे -- रत्नागिरी --दलितांचे उद्धारक आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे माहेरगाव, वणंद (ता. दापोली) च्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने २ कोटी ५७ लाखांचा आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. दापोलीपासून वणंद गाव ३ किलोमीटरच्या अंतरावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा असलेल्या रमाबाई आंबेडकर यांचे ते माहेर यामुळे वणंद या गावाला श्रद्धास्थान मानून आंबेडकरी जनता तसेच परजिल्ह्यातून अगदी परदेशातूनही अनेक पर्यटक या गावाला भेट देतात. मात्र, या गावाला अनेक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे.माई आंबेडकर यांनी या गावाला भेट दिल्यानंतर रमाबार्इंच्या जुन्या माहेरघरानजीक त्यांचे स्मारक बांधून घेतले होते. त्यानंतर राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री, विधान परिषदेचे आमदार विजय तथा भाई गिरकर यांनी या गावाला भेट दिली होती. या गावात शिक्षण, रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत गरजा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे गिरकर यांनी ‘आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत वणंद हे गाव दत्तक घेतले आहे. त्यांच्या दोन कोटीच्या निधीतून तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अर्थसहायातून आता वणंद गावचा विकास होणार आहे. (पान ८ वर)... ही कामे होणार!अनेक सुविधांसाठी अधिक निधीची गरज असल्याने त्यासाठी राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी २ कोटी ५७ लाखांचा आराखडा जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. यासाठी आमदार गिरकर यांनी सुचविलेल्या शौचालये, अंगणवाडी इमारती, नळपाणी योजना, रमाबाई यांच्या स्मारकाचे सुशोभिकरण, वाहनतळ, सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानशेड यांचा समावेश आहे.‘लोकमत’ने फोडली वाचावणंद गावच्या समस्यांबाबत सर्वांत प्रथम ‘लोकमत’ने वाचा फोडली. मोठ्यांची छोटी गावे या सदरातून वणंद गावच्या समस्या मांडण्यात आल्या. या गावाला असंख्य लोक भेट देत असल्याने तेथे कोणत्या प्राथमिक सुविधा हव्या आहेत, पर्यटकांची अपेक्षा काय आहे, याबाबतचा उहापोह ‘लोकमत’नेच केला आहे.