शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महिन्यात महामार्गाची चाळण

By admin | Updated: October 12, 2015 00:57 IST

काम संशयाच्या भोवऱ्यात : गणेश चतुर्थीअगोदर केले होते रस्ते दुरुस्त

रजनीकांत कदम -- कुडाळ--मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून, ठिकठिकाणी अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गणेश चतुर्थीअगोदर या महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले; मात्र खड्ड्यातील दगड-माती वर येऊन पुन्हा स्थिती ‘जैसे थे’ झाल्याने संबंधित विभागाने खड्डे बुजविण्याच्या कामात बोगसपणा केल्याची चर्चा वाहनचालक व नागरिकांत आहे.कुडाळ तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ही परिस्थिती केवळ कुडाळ तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची आहे. हे खड्डे अपघातास निमंत्रण देत असून, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन मात्र खड्डे कायमस्वरूपी मिटविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत लोकांनी व वाहनचालकांनी गणेश चतुर्थीपूर्वी उठविलेल्या आवाजामुळे प्रशासनाने गणेश चतुर्थीपूर्वी खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र, खड्डे चिऱ्याचे दगड व त्यावर माती टाकून बुजविण्यात आले. त्यामुळे हल्ली दोन-तीन दिवसांत पडलेल्या पावसामुळे व अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे खड्ड्यातील दगड-माती वर येऊन पुन्हा खड्डे तयार झाले.कामात अनियमितपणा : नागरिकांचा आरोपचिऱ्याचे दगड कठीण असले, तरी ते मऊ असतात. असे दगड रस्त्यावरील खड्ड्यात भरल्यानंतर गाड्या, पाणी गेल्याने ते मऊ होतात व खड्डा पुन्हा तयार होतो. महामार्ग विभागाने अशाप्रकारे चिऱ्याच्या दगडांचा तसेच कमी प्रमाणात डांबर, खडी वापरून हे खड्डे बुजविण्याचे बोगस काम केले असल्याचा आरोप नागरिक संबंधित विभागावर करीत आहेत. महामार्गावर केवळ खड्ड्यांमुळे धोका वाढत नाही तर रस्त्याच्या दुतर्फा वाढणारी झाडीझुडपे, तुटायला आलेल्या झाडाच्या फांद्या यापासूनही धोका वाढत आहे. काही ठिकाणी तर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, झाडी रस्त्यावरच आली आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.वळणावळणाच्या, चढ-उतार व अरुंद असलेल्या या राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असतात. सद्य:स्थितीत या महामार्गावरील अपघात क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे व रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी. महामार्गावर एखादा भीषण अपघात झाल्यानंतरच महामार्ग प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल जनता, वाहनचालक व प्रवासी यांच्यातून विचारला जात आहे. गणेश चतुर्थी अगोदर बुजविण्यात आलेले खड्डे चांगल्या पद्धतीने बुजविले असते तर आज या खड्ड्यांपासून सुटका झाली असती. मात्र, एकदाच व्यवस्थित काम न करता ते काम पुन्हा पुन्हा का करावे लागते, याचे कोडे मात्र न सुटणारेच आहे. जिल्ह्यातील प्रमुख आणि महत्त्वाचा मार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग ओळखला जातो. केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर भारतातील मोठ्या प्रमाणात प्रवासी या रस्त्यांवरून ये-जा करीत असतात. त्यामुळे हा महामार्ग सुस्थितीत राखण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.हे करणे आवश्यक आहे...महामार्गावरील खड्ड्यांतील माती पूर्णपणे काढावी व मगच त्यात खडी व जास्त डांबर वापरून खड्डा भरावा. काही झाडांच्या फांद्या सुकलेल्या आहेत. या फांद्यांपासून भविष्यात धोका आहे, अशा झाडांचा सर्व्हे करून ती तोडण्यात यावीत. काही ठिकाणी महामार्गाची साईडपट्टी मोठ्या प्रमाणात खचल्याने धोकादायक बनली आहे. त्यामुळे तिथेही माती टाकावी. दिशादर्शक तसेच अन्य सूचना फलक काही ठिकाणी मोडकळीस आले आहेत. ते बदलावेत. अशा प्रकारच्या काही दुरुस्त्या राष्ट्रीय महामार्गावर केल्यास महामार्ग काही प्रमाणात सुस्थितीत येऊ शकतो. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे येथील महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी जोरदार मागणी प्रवासी व वाहनचालकांतून होत आहे.