शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात मान्सूनची दमदार हजेरी

By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST

समुद्रातही ताशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे

मालवण : मागील आठवड्यापासून खोळंबलेला मान्सून अखेर शुक्रवारपासून जिल्ह्यात बरसायला सुरुवात झाली आहे. शनिवारी दिवसभरातही सर्वच ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला. समुद्रातही ताशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने बंदर विभागाकडून मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीबागायतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. गेला आठवडाभर मान्सून हुलकावणी देत होता. शेतकरी आणि आंबा बागायतदारांनाही मशागतीची कामे करावयाची असल्याने दमदार पावसाची प्रतिक्षा होती. मात्र शुक्रवारपासून मालवणात बऱ्यापैकी पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंत मागील २४ तासात तालुक्यात ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाच्या सरी दमदार असल्या तरी जोर नसल्यामुळे तालुक्यात कुठेही पडझडीच्या घटनेची नोंद नव्हती. दोन दिवसांत तालुक्याच्या सर्वच ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे शेतीबागायतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी नांगरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. तर आंबा बागायतदारांनी बागायतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, समुद्र खवळलेला असून समुद्रात ताशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी) दोडामार्गात संततधार! दोडामार्ग तालुक्याला शनिवारी मान्सून पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. या पावसाचा फटका साटेली-भेडशी आठवडा बाजाराला बसला. सामानाची आवराआवर करताना व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शनिवारी कोसळलेल्या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे. अधूनमधून दर्शन देणाऱ्या वरुणराजाने शनिवारी सकाळपासूनच धो-धो बरसण्याचा धडाका लावला. तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. साटेली-भेडशी आठवडा बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे मात्र बळीराजा सुखावला असून मशागतीची कामे सुरू झाली. ४८ तासात अतिवृष्टी? रविवार १४ जूनपासून ४८ तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार संबंधितांना सतर्क राहण्याच्या सूचना आपत्ती निवारण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.