शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

सिंधुदुर्गात मान्सूनची दमदार हजेरी

By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST

समुद्रातही ताशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे

मालवण : मागील आठवड्यापासून खोळंबलेला मान्सून अखेर शुक्रवारपासून जिल्ह्यात बरसायला सुरुवात झाली आहे. शनिवारी दिवसभरातही सर्वच ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला. समुद्रातही ताशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने बंदर विभागाकडून मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीबागायतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. गेला आठवडाभर मान्सून हुलकावणी देत होता. शेतकरी आणि आंबा बागायतदारांनाही मशागतीची कामे करावयाची असल्याने दमदार पावसाची प्रतिक्षा होती. मात्र शुक्रवारपासून मालवणात बऱ्यापैकी पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंत मागील २४ तासात तालुक्यात ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाच्या सरी दमदार असल्या तरी जोर नसल्यामुळे तालुक्यात कुठेही पडझडीच्या घटनेची नोंद नव्हती. दोन दिवसांत तालुक्याच्या सर्वच ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे शेतीबागायतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी नांगरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. तर आंबा बागायतदारांनी बागायतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, समुद्र खवळलेला असून समुद्रात ताशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी) दोडामार्गात संततधार! दोडामार्ग तालुक्याला शनिवारी मान्सून पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. या पावसाचा फटका साटेली-भेडशी आठवडा बाजाराला बसला. सामानाची आवराआवर करताना व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शनिवारी कोसळलेल्या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे. अधूनमधून दर्शन देणाऱ्या वरुणराजाने शनिवारी सकाळपासूनच धो-धो बरसण्याचा धडाका लावला. तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. साटेली-भेडशी आठवडा बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे मात्र बळीराजा सुखावला असून मशागतीची कामे सुरू झाली. ४८ तासात अतिवृष्टी? रविवार १४ जूनपासून ४८ तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार संबंधितांना सतर्क राहण्याच्या सूचना आपत्ती निवारण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.