शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

मुदतवाढीसाठी बंदर विभागाची मनमानी

By admin | Updated: June 9, 2016 01:55 IST

सिंधुदुर्ग किल्लादर्शन : होडी व्यावसायिकांचा आरोप, २५ हजार पर्यटक दर्शनापासून वंचित

मालवण : मालवणातील बंदर विभागाच्या अनागोंदी कारभारामुळेच सुमारे २५ हजाराहून अधिक पर्यटक ‘किल्ले सिंधुदुर्ग’च्या दर्शनापासून वंचित राहिले आहेत. १ जूनपासून वळवाचा पाऊस सुरु झाला. मात्र समुद्रातील अंतर्गत हालचालीत कोणताही बदल झाला नसताना ३ जूननंतर किल्ले प्रवासी होडी वाहतुकीला वाढीव मुदत देण्यात आली नाही. याचा फटकाही पर्यटक, पर्यटन व्यावसायिक तसेच शासनालाही बसला आहे. शासनाचा बंदर विभागावर अंकुश नसल्याने अधिकारी मनमानी करत असून यात किल्ले होडी प्रवासी व्यावसायिक भरडला गेला आहे, असा आरोप होडी संघटनेचे रामचंद्र (दादा) आचरेकर यांनी केला आहे.दरम्यान, शिवसेना-भाजपा सरकार केवळ शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करत आहे. पर्यटकांचे प्रमुख केंद्र असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग दर्शनापासून पर्यटक व शिवभक्तांना वंचित ठेवण्याचा प्रकार झाला आहे. पूर्वी २५ मेनंतर किल्ले प्रवासी वाहतूक समुद्री हवामानातील बदल, पर्यटकांची संख्या याचा विचार करून स्थानिक पातळीवरच एक-एक दिवस या स्वरुपात दिली जात होती. गतवर्षी ७ जूनपर्यंत असलेली किल्ले होडी प्रवासी मुदत काही वर्षांपूर्वी २१ जूनपर्यंत देण्यात आली होती, असे असताना ३ जूनला यावर्षी होडी प्रवास बंद झाल्याने किल्ले दर्शनास आलेल्या पर्यटकांना माघारी परतावे लागले आहे, अशी माहिती आचरेकर यांनी मालवण येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी शिवशक्ती संघटनेचे अध्यक्ष मोरजकर उपस्थित होते. आचरेकर म्हणाले, शासन-प्रशासनाच्या कारभाराचा परिणाम महसूल तिजोरीवर पडला आहे. शासनाला कर स्वरुपात मिळणारी प्रती व्यक्ती दहा रुपयांचा करमणूक महसूल कर लाखोंच्या पटीत बुडाला आहे. बंदर विभागाच्या जाचक अटी व नियमांचा फटका होडी व्यावसायिकांना बसत आहे. यावर्षी व्यावसायिकांना न मिळालेली अपेक्षित मुदतवाढ पुढील वर्षापासून जाचक अटी दूर होऊन मिळावी. होडी व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांना समुद्री हवामानातील बदल तत्काळ दिसून येतात. त्यामुळे स्वत:चा व पर्यटकांचा जीव धोक्यात घालून होडी वाहतूक सुरु ठेवली जात नाही. यावर्षी १ जूनपासून सुरु झाला तरी समुद्री हवामानात बदल झालेला नाही. त्यामुळे समुद्र शांत आहे. अशा स्थितीत १० ते १५ जूनपर्यंत मुदतवाढ मिळणे गरजेचे होते. मात्र बंदर विभागाच्या बंदीमुळे तसेच होडीजप्ती व अन्य प्रकारची कारवाई बंदर विभाग हाती घेईल या भीतीने व्यावसायिकांनी होड्या किनाऱ्यावर सुरक्षित स्थळी आणल्या आहेत. त्यामुळे बंदर विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे जलक्रीडा व्यावसायिकांना महसूल प्रशासनाकडून कर वसुली होते त्याच स्वरुपात तहसीलदार यांच्या अखत्यारीत होडी सेवा ठेवल्यास व्यावसायिक व पर्यटकांच्या दृष्टीने ते फायद्याचे होईल, असेही आचरेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आचरेकर : नारायण राणेंसारखे सहकार्य मिळत नाहीनारायण राणे पुन्हा आमदार झाले ही चांगली बाब आहे. पूर्वी राणे मंत्री असताना होडी व्यावसायिकांना व जिल्ह्यातील अन्य व्यावसायिकांना प्रशासनाकडून मनमानी स्वरुपात त्रास देण्याचे प्रकार होत नव्हते. सद्यस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले दीपक केसरकर यांच्याकडूनही व्यवसायिकांच्या पदरी निराशा पडली. केसरकर यांचे सावंतवाडी, दोडामार्ग वगळता जिल्ह्यातील समस्यांबाबत देणे-घेणे नाही, असाच प्रकार सुरु असल्याचा आरोपही दादा आचरेकर यांनी केला.