शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

‘गोमंत संत सोहिरोबानाथ’ नाटकाची मोहिनी

By admin | Updated: January 20, 2015 23:34 IST

संगीत राज्य नाट्य स्पर्धा : अपुरे पाठांतर, प्रकाशयोजनेत घाई--राज्य नाट्य स्पर्धा

‘संगीत गोमंत संत सोहिरोबानाथ’ हे संगीत नाटक! हे नाटक भार्गवी थिएटर्स, पर्वरी, गोवा या संस्थेने सादर केले.अनंत आंबिये हे सावंतवाडीचे राजे सोम सावंत यांच्याकडे कुलकर्णी पदावर सेवेत होते. त्यांना जो पुत्र झाला त्याला फक्त दोन दिवसांचा असताना गोरखनाथांचा शिष्य, गहिनीनाथ यांचा आशीर्वाद लाभला. त्यामुळे तो बालपणापासूनच श्रीहरीची भक्ती करु लागला. त्या मुलाचे नाव होते ‘सोहिरु अनंत आंबिये’ तेच पुढे संत सोहिरोबा!सोमसावंतांकडील कुलकर्णी पद हे सोहिरुच्या ईश्वरभक्तीत अडसर ठरत होते. त्यामुळे सोहिरुने सेवेचा राजीनामा दिला. त्याच दरम्यान गहिनीनाथांनी त्यांना कानमंत्र देऊन साक्षात्कार घडविला. त्यामुळे ते ईश्वरभक्तीत तल्लीन होऊन त्यांनी अनेक कवने लिहिली. गायनात रममाण होऊन त्यांनी भारतातील काही प्रांतात नामस्मरणाचा महिमा समाजासमोर ठेवून समाजप्रबोधन केले. शेवटी मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ यांनी त्यांना संतपद प्राप्त झाल्यामुळे वैकुंठास नेले, असे नाटकाचे कथानक!महादेव सगुण हरमलकर यांनी चांगली संहिता मांडली. फिरत्या रंगमंचाचा वापर करण्यात आला. संत सोहिरोबानाथांची भूमिका साकारणारे दशरथ नाईक हे ही भूमिका अक्षरश: जगले. भावपूर्ण आवाज, तल्लीनता, शास्त्रीय संगीताचे संस्कार, समर्थ अभिनय हे त्यांचे विशेष!ते समाजप्रबोधनासाठी सोहिरोबानाथ फिरले. हा प्रसंग प्रेक्षकात येऊन दशरथ नाईक यांनी ‘हरीभजनाविण काळ घालवू नको’ हे पद गाऊन दाखविला.या नाटकाचे संगीत दिग्दर्शन प्रा. मयुरेश वस्त यांनी केले. वेगवेगळे राग व वेगवेगळे ताल वापरुन त्यांनी सोहिरोबांच्या आधीच प्रसिद्ध असलेल्या अभंगांच्या चाली बदलून वेगळ्या चाली लावण्याचे मोठे धाडस केले व ते यशस्वी झाले.श्रुती केरकर (मुक्ता) यांचा आवाज गोड होता. मात्र, थंडीमुळे तो बसल्याचे जाणवत होते. पाठांतर नसल्यामुळे मात्र त्यांचे संवाद म्हणताना बरेच शब्द अडखळत होते. फिरत्या रंगमंचावरील नेपथ्य व प्रकाशयोजना यामध्ये समन्वय होत नव्हता. प्रकाशयोजना खूप घाईघाईने अमलात आणली जात होती. त्यामुळे नेपथ्य बदलताना गोंधळ उडत होता.मधुकर नाईक (सोम सावंत), तुषार गोवेकर (खेमू) यांनी भूमिका साकारल्या. मात्र, त्यांची गायनाची तयारी कमी पडली. पहिल्याच अभंगात त्यांना सूर सापडला नाही. दुसरा अभंग चांगला पेलला.आॅर्गनवादक प्रसाद गावस व तलबावादक सूरज मोरजे यांनी सुरेख व समर्पक संगीत साथ केली. सूरज मोरजे यांनी वेगवेगळ्या तालातील अभंग मोठ्या खुबीने वाजविले, तरीही त्यांची तबल्याची लय कुठेही कमी-जास्त झाली नाही.संत सोहिरोबानाथांच्या रचनाखेरीज काही रचना बांधून त्यांना नाट्यसंगीताच्या अंगाने चाली देऊन त्या सादर करता आल्या असत्या, तर अधिक मजा आली असती. कारण नाटकांमध्ये एकही पद हे नाट्यपद अंगाचे नव्हते. सगळे अभंगच होते.श्रुती केरकर यांचे अपुरे पाठांतर व प्रकाश योजनेमध्ये झालेली घाई यामुळे नाटक थोडे घसरले. तरीही दशरथ नाईक (सोहिरोबा) यांनी आपली भूमिका इतक्या उंचीवर नेऊन ठेवली की, या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.संगीत गोमंत, संत सोहिरोबानाथ नाटकात काही त्रुटी समोर आल्या असल्या तरी सादरीकरणाबाबतीत कलाकारांनी मेहनत घेतलेली जाणवत होती. दशरथ नाईक यांनी संगीताची बाजू चांगली सांभाळली. समाज प्रबोधनाच्या हेतूने सोयरोबानाथांनी केलेल्या कार्याचे प्रत्यक्ष दर्शन हा प्रयोग घडवतो.