शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

‘गोमंत संत सोहिरोबानाथ’ नाटकाची मोहिनी

By admin | Updated: January 20, 2015 23:34 IST

संगीत राज्य नाट्य स्पर्धा : अपुरे पाठांतर, प्रकाशयोजनेत घाई--राज्य नाट्य स्पर्धा

‘संगीत गोमंत संत सोहिरोबानाथ’ हे संगीत नाटक! हे नाटक भार्गवी थिएटर्स, पर्वरी, गोवा या संस्थेने सादर केले.अनंत आंबिये हे सावंतवाडीचे राजे सोम सावंत यांच्याकडे कुलकर्णी पदावर सेवेत होते. त्यांना जो पुत्र झाला त्याला फक्त दोन दिवसांचा असताना गोरखनाथांचा शिष्य, गहिनीनाथ यांचा आशीर्वाद लाभला. त्यामुळे तो बालपणापासूनच श्रीहरीची भक्ती करु लागला. त्या मुलाचे नाव होते ‘सोहिरु अनंत आंबिये’ तेच पुढे संत सोहिरोबा!सोमसावंतांकडील कुलकर्णी पद हे सोहिरुच्या ईश्वरभक्तीत अडसर ठरत होते. त्यामुळे सोहिरुने सेवेचा राजीनामा दिला. त्याच दरम्यान गहिनीनाथांनी त्यांना कानमंत्र देऊन साक्षात्कार घडविला. त्यामुळे ते ईश्वरभक्तीत तल्लीन होऊन त्यांनी अनेक कवने लिहिली. गायनात रममाण होऊन त्यांनी भारतातील काही प्रांतात नामस्मरणाचा महिमा समाजासमोर ठेवून समाजप्रबोधन केले. शेवटी मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ यांनी त्यांना संतपद प्राप्त झाल्यामुळे वैकुंठास नेले, असे नाटकाचे कथानक!महादेव सगुण हरमलकर यांनी चांगली संहिता मांडली. फिरत्या रंगमंचाचा वापर करण्यात आला. संत सोहिरोबानाथांची भूमिका साकारणारे दशरथ नाईक हे ही भूमिका अक्षरश: जगले. भावपूर्ण आवाज, तल्लीनता, शास्त्रीय संगीताचे संस्कार, समर्थ अभिनय हे त्यांचे विशेष!ते समाजप्रबोधनासाठी सोहिरोबानाथ फिरले. हा प्रसंग प्रेक्षकात येऊन दशरथ नाईक यांनी ‘हरीभजनाविण काळ घालवू नको’ हे पद गाऊन दाखविला.या नाटकाचे संगीत दिग्दर्शन प्रा. मयुरेश वस्त यांनी केले. वेगवेगळे राग व वेगवेगळे ताल वापरुन त्यांनी सोहिरोबांच्या आधीच प्रसिद्ध असलेल्या अभंगांच्या चाली बदलून वेगळ्या चाली लावण्याचे मोठे धाडस केले व ते यशस्वी झाले.श्रुती केरकर (मुक्ता) यांचा आवाज गोड होता. मात्र, थंडीमुळे तो बसल्याचे जाणवत होते. पाठांतर नसल्यामुळे मात्र त्यांचे संवाद म्हणताना बरेच शब्द अडखळत होते. फिरत्या रंगमंचावरील नेपथ्य व प्रकाशयोजना यामध्ये समन्वय होत नव्हता. प्रकाशयोजना खूप घाईघाईने अमलात आणली जात होती. त्यामुळे नेपथ्य बदलताना गोंधळ उडत होता.मधुकर नाईक (सोम सावंत), तुषार गोवेकर (खेमू) यांनी भूमिका साकारल्या. मात्र, त्यांची गायनाची तयारी कमी पडली. पहिल्याच अभंगात त्यांना सूर सापडला नाही. दुसरा अभंग चांगला पेलला.आॅर्गनवादक प्रसाद गावस व तलबावादक सूरज मोरजे यांनी सुरेख व समर्पक संगीत साथ केली. सूरज मोरजे यांनी वेगवेगळ्या तालातील अभंग मोठ्या खुबीने वाजविले, तरीही त्यांची तबल्याची लय कुठेही कमी-जास्त झाली नाही.संत सोहिरोबानाथांच्या रचनाखेरीज काही रचना बांधून त्यांना नाट्यसंगीताच्या अंगाने चाली देऊन त्या सादर करता आल्या असत्या, तर अधिक मजा आली असती. कारण नाटकांमध्ये एकही पद हे नाट्यपद अंगाचे नव्हते. सगळे अभंगच होते.श्रुती केरकर यांचे अपुरे पाठांतर व प्रकाश योजनेमध्ये झालेली घाई यामुळे नाटक थोडे घसरले. तरीही दशरथ नाईक (सोहिरोबा) यांनी आपली भूमिका इतक्या उंचीवर नेऊन ठेवली की, या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.संगीत गोमंत, संत सोहिरोबानाथ नाटकात काही त्रुटी समोर आल्या असल्या तरी सादरीकरणाबाबतीत कलाकारांनी मेहनत घेतलेली जाणवत होती. दशरथ नाईक यांनी संगीताची बाजू चांगली सांभाळली. समाज प्रबोधनाच्या हेतूने सोयरोबानाथांनी केलेल्या कार्याचे प्रत्यक्ष दर्शन हा प्रयोग घडवतो.