शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘गोमंत संत सोहिरोबानाथ’ नाटकाची मोहिनी

By admin | Updated: January 20, 2015 23:34 IST

संगीत राज्य नाट्य स्पर्धा : अपुरे पाठांतर, प्रकाशयोजनेत घाई--राज्य नाट्य स्पर्धा

‘संगीत गोमंत संत सोहिरोबानाथ’ हे संगीत नाटक! हे नाटक भार्गवी थिएटर्स, पर्वरी, गोवा या संस्थेने सादर केले.अनंत आंबिये हे सावंतवाडीचे राजे सोम सावंत यांच्याकडे कुलकर्णी पदावर सेवेत होते. त्यांना जो पुत्र झाला त्याला फक्त दोन दिवसांचा असताना गोरखनाथांचा शिष्य, गहिनीनाथ यांचा आशीर्वाद लाभला. त्यामुळे तो बालपणापासूनच श्रीहरीची भक्ती करु लागला. त्या मुलाचे नाव होते ‘सोहिरु अनंत आंबिये’ तेच पुढे संत सोहिरोबा!सोमसावंतांकडील कुलकर्णी पद हे सोहिरुच्या ईश्वरभक्तीत अडसर ठरत होते. त्यामुळे सोहिरुने सेवेचा राजीनामा दिला. त्याच दरम्यान गहिनीनाथांनी त्यांना कानमंत्र देऊन साक्षात्कार घडविला. त्यामुळे ते ईश्वरभक्तीत तल्लीन होऊन त्यांनी अनेक कवने लिहिली. गायनात रममाण होऊन त्यांनी भारतातील काही प्रांतात नामस्मरणाचा महिमा समाजासमोर ठेवून समाजप्रबोधन केले. शेवटी मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ यांनी त्यांना संतपद प्राप्त झाल्यामुळे वैकुंठास नेले, असे नाटकाचे कथानक!महादेव सगुण हरमलकर यांनी चांगली संहिता मांडली. फिरत्या रंगमंचाचा वापर करण्यात आला. संत सोहिरोबानाथांची भूमिका साकारणारे दशरथ नाईक हे ही भूमिका अक्षरश: जगले. भावपूर्ण आवाज, तल्लीनता, शास्त्रीय संगीताचे संस्कार, समर्थ अभिनय हे त्यांचे विशेष!ते समाजप्रबोधनासाठी सोहिरोबानाथ फिरले. हा प्रसंग प्रेक्षकात येऊन दशरथ नाईक यांनी ‘हरीभजनाविण काळ घालवू नको’ हे पद गाऊन दाखविला.या नाटकाचे संगीत दिग्दर्शन प्रा. मयुरेश वस्त यांनी केले. वेगवेगळे राग व वेगवेगळे ताल वापरुन त्यांनी सोहिरोबांच्या आधीच प्रसिद्ध असलेल्या अभंगांच्या चाली बदलून वेगळ्या चाली लावण्याचे मोठे धाडस केले व ते यशस्वी झाले.श्रुती केरकर (मुक्ता) यांचा आवाज गोड होता. मात्र, थंडीमुळे तो बसल्याचे जाणवत होते. पाठांतर नसल्यामुळे मात्र त्यांचे संवाद म्हणताना बरेच शब्द अडखळत होते. फिरत्या रंगमंचावरील नेपथ्य व प्रकाशयोजना यामध्ये समन्वय होत नव्हता. प्रकाशयोजना खूप घाईघाईने अमलात आणली जात होती. त्यामुळे नेपथ्य बदलताना गोंधळ उडत होता.मधुकर नाईक (सोम सावंत), तुषार गोवेकर (खेमू) यांनी भूमिका साकारल्या. मात्र, त्यांची गायनाची तयारी कमी पडली. पहिल्याच अभंगात त्यांना सूर सापडला नाही. दुसरा अभंग चांगला पेलला.आॅर्गनवादक प्रसाद गावस व तलबावादक सूरज मोरजे यांनी सुरेख व समर्पक संगीत साथ केली. सूरज मोरजे यांनी वेगवेगळ्या तालातील अभंग मोठ्या खुबीने वाजविले, तरीही त्यांची तबल्याची लय कुठेही कमी-जास्त झाली नाही.संत सोहिरोबानाथांच्या रचनाखेरीज काही रचना बांधून त्यांना नाट्यसंगीताच्या अंगाने चाली देऊन त्या सादर करता आल्या असत्या, तर अधिक मजा आली असती. कारण नाटकांमध्ये एकही पद हे नाट्यपद अंगाचे नव्हते. सगळे अभंगच होते.श्रुती केरकर यांचे अपुरे पाठांतर व प्रकाश योजनेमध्ये झालेली घाई यामुळे नाटक थोडे घसरले. तरीही दशरथ नाईक (सोहिरोबा) यांनी आपली भूमिका इतक्या उंचीवर नेऊन ठेवली की, या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.संगीत गोमंत, संत सोहिरोबानाथ नाटकात काही त्रुटी समोर आल्या असल्या तरी सादरीकरणाबाबतीत कलाकारांनी मेहनत घेतलेली जाणवत होती. दशरथ नाईक यांनी संगीताची बाजू चांगली सांभाळली. समाज प्रबोधनाच्या हेतूने सोयरोबानाथांनी केलेल्या कार्याचे प्रत्यक्ष दर्शन हा प्रयोग घडवतो.