शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मोदी प्रचारसभेसाठी गल्लीगल्लीत : कदम

By admin | Updated: October 13, 2014 23:04 IST

मतदारच गिळंकृत करणार आहेत

कसई दोडामार्ग : शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याचा विडा उचलेल्या राणेंना या निवडणुकीत मतदारच गिळंकृत करणार आहेत तर मोदी देशाचे पंतप्रधान असल्याचे विसरुन गल्लीगल्लीत मते मागत फिरत आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी विरोधीपक्ष नेते रामदास कदम यांनी करत विरोधकांवर चौफेर टीका केली. दोडामार्ग येथे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारसभेत रामदास कदम यांची तोफ धडाडली. यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जान्हवी सावंत, बाबुराव धुरी, अनारोजीन लोबो, प्रकाश रेडकर, संजय गवस, संजय देसाई, प्रदीप नाईक, प्रज्ञा नाईक, रमेश नाईक, राजू नाईक, विश्वाप्पा देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कदम यांनी नारायण राणे, नरेंद्र मोदी, राजन तेली, अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली. कोकणी माणसानेच शिवसेना मोठी केल्याने शिवसेनेचा विजय निश्चित असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. नारायण राणेंनी १५ वर्षात विकास केला तो आपल्या मुलांचा. त्यामुळेच त्यांच्याकडे अनेक बंगले असल्याचा टोलाही कदम यांनी लगावला. राणे सेना संपविणार होते. मात्र, आज स्वत:च संपणार आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना जेलची हवा चाखायला लावणार आहे. भाजपाचे अमित शहा शिवसेनेला उंंदीर म्हणतात. पण जसा अफझलखानाचा शिवाजी महाराजांनी कोथळा काढला, तसाच हा उंदीर कोथळा काढेल, अशी टीका भाजपावर केली. पाकिस्तान आपल्या देशावर हल्ला करीत असताना पंतप्रधान मोदी मात्र ग्ाल्ली गल्लीत मते मागत फिरत आहेत, अशा शब्दात मोदींचाही समाचार घेतला. धनुष्य तुमच्या हातात दिले आहे, या सर्व शत्रूंचा नाश करा, असे कदम यांनी आवाहन केले. (वार्ताहर)