शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

मोदी प्रचारसभेसाठी गल्लीगल्लीत : कदम

By admin | Updated: October 13, 2014 23:04 IST

मतदारच गिळंकृत करणार आहेत

कसई दोडामार्ग : शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याचा विडा उचलेल्या राणेंना या निवडणुकीत मतदारच गिळंकृत करणार आहेत तर मोदी देशाचे पंतप्रधान असल्याचे विसरुन गल्लीगल्लीत मते मागत फिरत आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी विरोधीपक्ष नेते रामदास कदम यांनी करत विरोधकांवर चौफेर टीका केली. दोडामार्ग येथे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारसभेत रामदास कदम यांची तोफ धडाडली. यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जान्हवी सावंत, बाबुराव धुरी, अनारोजीन लोबो, प्रकाश रेडकर, संजय गवस, संजय देसाई, प्रदीप नाईक, प्रज्ञा नाईक, रमेश नाईक, राजू नाईक, विश्वाप्पा देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कदम यांनी नारायण राणे, नरेंद्र मोदी, राजन तेली, अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली. कोकणी माणसानेच शिवसेना मोठी केल्याने शिवसेनेचा विजय निश्चित असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. नारायण राणेंनी १५ वर्षात विकास केला तो आपल्या मुलांचा. त्यामुळेच त्यांच्याकडे अनेक बंगले असल्याचा टोलाही कदम यांनी लगावला. राणे सेना संपविणार होते. मात्र, आज स्वत:च संपणार आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना जेलची हवा चाखायला लावणार आहे. भाजपाचे अमित शहा शिवसेनेला उंंदीर म्हणतात. पण जसा अफझलखानाचा शिवाजी महाराजांनी कोथळा काढला, तसाच हा उंदीर कोथळा काढेल, अशी टीका भाजपावर केली. पाकिस्तान आपल्या देशावर हल्ला करीत असताना पंतप्रधान मोदी मात्र ग्ाल्ली गल्लीत मते मागत फिरत आहेत, अशा शब्दात मोदींचाही समाचार घेतला. धनुष्य तुमच्या हातात दिले आहे, या सर्व शत्रूंचा नाश करा, असे कदम यांनी आवाहन केले. (वार्ताहर)