शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

मोकाट गुरे, रस्ता भरे!

By admin | Updated: June 13, 2015 00:20 IST

कसई दोडामार्ग : वाहतूकधारक त्रस्त, भाजीपाला फस्त

वैभव साळकर - दोडामार्ग  -कसई दोडामार्गचे शहरवासी कचरा समस्या, वाहतूक कोंडीची समस्यांपासून हैराण झाले असताना त्यात आता मोकाट गुरांच्या समस्येची भर पडली आहे. या गुरांचा प्रश्न बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात सतावतो आहे. रस्त्यात तळ ठोेकणाऱ्या गुरांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अशा मोकाट गुरांना आळा घालण्याची मागणी शहरवासीयांकडून सातत्याने होत आहे. कसई दोडामार्ग शहराला नगर पंचायतीचे वेध लागले आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, नगर पंचायतीच्या माध्यमातून शहराचा कारभार हाकताना येथील जनतेला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, हे प्रशासनानेही जाणून घेणे गरजेचे आहे. शहरवासीयांना कचरा समस्या, वाहतूककोंडीचा प्रश्न आ वासून उभा आहेच. याचबरोबर रस्त्यावरील मोकाट गुरांच्या समस्येची भर पडली आहे. या गुरांचा सर्वात जास्त त्रास शहरातील व्यावसायिक, भाजी विक्रेते, फुलविक्रेते आणि वाहनचालकांना होत आहे. रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या दुकानात गुरांचे झुंडीच्या झुंडी शिरण्याचा प्रकार बाजारपेठेत वारंवार पाहवयास मिळतो आहे. फुलविके्र त्यांच्याबाबतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे या मोकाट गुरांचा त्रास भाजी व फुलविक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. जर एखाद्या गुरास मोठ्या गाडीची ठोकर बसून ते मृत्यूमुखी पडल्यास अथवा जखमी झाल्यास त्याचा मालक भरपाईसाठी दत्त म्हणून उभा राहण्याचे प्रकारदेखील अनेकदा मार्केटमधील नागरिकांनी अनुभवले आहेत. त्यामुळे आपल्या जनावरांना मोकाट सोडणाऱ्या मालकांवरच खरे तर कारवाई करण्याची गरज आता भासत आहे. (उद्याच्या अंकात वाचा - बाजारपेठ विस्तृतीकरणाचे राहणार मोठे आव्हान?)दुकानाचे नुकसानअनेकवेळा दोडामार्ग बाजारपेठेत मोकाट फिरणाऱ्या जनावरांमध्येच झुंजी लागतात. एकदा बिथरलेले हे बैल किंवा जनावरे मग काही केल्या मागे न हटता भर रस्त्यात अथवा शेजारच्या दुकानात बैल घुसून नुकसान करतात.मकोंडवाड्याची गरजशहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून एका विशिष्ट ठिकाणी बांधण्यासाठी कोंडवाड्याची गरज आहे. मात्र, दोडामार्ग शहरात कोंडवाडा नसल्याने जनावरांना पकडून मग त्यांचे करायचे काय? असा प्रश्न प्रशासनाला पडतो आहे. परिणामत: भविष्यातील विचार करता, शहरामध्ये कोंडवाड्याची गरज ही एक मोठी जबाबदारी नगरपंचायतीकडे असणार आहे.भर बाजारपेठेतच झुंजीचे प्रकारदोडामार्ग बाजारपेठेत मोकाट फिरणारे बैल भर बाजारपेठेतच झुंजण्याचे प्रकार जीवघेणे ठरत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.