शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट गुरे, रस्ता भरे!

By admin | Updated: June 13, 2015 00:20 IST

कसई दोडामार्ग : वाहतूकधारक त्रस्त, भाजीपाला फस्त

वैभव साळकर - दोडामार्ग  -कसई दोडामार्गचे शहरवासी कचरा समस्या, वाहतूक कोंडीची समस्यांपासून हैराण झाले असताना त्यात आता मोकाट गुरांच्या समस्येची भर पडली आहे. या गुरांचा प्रश्न बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात सतावतो आहे. रस्त्यात तळ ठोेकणाऱ्या गुरांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अशा मोकाट गुरांना आळा घालण्याची मागणी शहरवासीयांकडून सातत्याने होत आहे. कसई दोडामार्ग शहराला नगर पंचायतीचे वेध लागले आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, नगर पंचायतीच्या माध्यमातून शहराचा कारभार हाकताना येथील जनतेला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, हे प्रशासनानेही जाणून घेणे गरजेचे आहे. शहरवासीयांना कचरा समस्या, वाहतूककोंडीचा प्रश्न आ वासून उभा आहेच. याचबरोबर रस्त्यावरील मोकाट गुरांच्या समस्येची भर पडली आहे. या गुरांचा सर्वात जास्त त्रास शहरातील व्यावसायिक, भाजी विक्रेते, फुलविक्रेते आणि वाहनचालकांना होत आहे. रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या दुकानात गुरांचे झुंडीच्या झुंडी शिरण्याचा प्रकार बाजारपेठेत वारंवार पाहवयास मिळतो आहे. फुलविके्र त्यांच्याबाबतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे या मोकाट गुरांचा त्रास भाजी व फुलविक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. जर एखाद्या गुरास मोठ्या गाडीची ठोकर बसून ते मृत्यूमुखी पडल्यास अथवा जखमी झाल्यास त्याचा मालक भरपाईसाठी दत्त म्हणून उभा राहण्याचे प्रकारदेखील अनेकदा मार्केटमधील नागरिकांनी अनुभवले आहेत. त्यामुळे आपल्या जनावरांना मोकाट सोडणाऱ्या मालकांवरच खरे तर कारवाई करण्याची गरज आता भासत आहे. (उद्याच्या अंकात वाचा - बाजारपेठ विस्तृतीकरणाचे राहणार मोठे आव्हान?)दुकानाचे नुकसानअनेकवेळा दोडामार्ग बाजारपेठेत मोकाट फिरणाऱ्या जनावरांमध्येच झुंजी लागतात. एकदा बिथरलेले हे बैल किंवा जनावरे मग काही केल्या मागे न हटता भर रस्त्यात अथवा शेजारच्या दुकानात बैल घुसून नुकसान करतात.मकोंडवाड्याची गरजशहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून एका विशिष्ट ठिकाणी बांधण्यासाठी कोंडवाड्याची गरज आहे. मात्र, दोडामार्ग शहरात कोंडवाडा नसल्याने जनावरांना पकडून मग त्यांचे करायचे काय? असा प्रश्न प्रशासनाला पडतो आहे. परिणामत: भविष्यातील विचार करता, शहरामध्ये कोंडवाड्याची गरज ही एक मोठी जबाबदारी नगरपंचायतीकडे असणार आहे.भर बाजारपेठेतच झुंजीचे प्रकारदोडामार्ग बाजारपेठेत मोकाट फिरणारे बैल भर बाजारपेठेतच झुंजण्याचे प्रकार जीवघेणे ठरत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.