शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जलयुक्त शिवारसाठी मोबाईल व्हॅनची फेरी

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

पाणी नियोजनाची दिली जातेय माहिती-माजगाव, मळगाव, नेमळेत उत्साही स्वागत

तळवडे : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत प्रचार व जनजागृतीसाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे मोबाईल व्हॅनद्वारे फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाचा प्रारंभ माजगाव, मळगाव, नेमळे या गावांतून करण्यात आला. सध्या दुष्काळाचे चटके महाराष्ट्राला बसत असताना शासनामार्फत विविध योजना व प्रकल्पांतून पाणी नियोजन व पाण्याच्या बचतीवर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलशिवार योजनेचा प्रारंभ करून महाराष्ट्रभर त्याची काटेकोर अमंलबजावणी करण्यात आली. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या योजनेद्वारे पाण्याचे नियोजन व नियोजनासाठी राबविण्यात येणारे उपचार मातीनाला बांध, सिमेंट नालाबांध, वळण बंधारे, समतोल चर, गाळ काढणे, मजगी व लघू पाटबंधारे विभाग जिल्हा परिषदेकडून बांधण्यात येणारे सिमेंट नालाबांध याविषयी प्रबोधन केले जात आहे. शेतकरी वर्गाने या योजना यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे. कोणतीही योजना यशस्वी करायची असल्यास ग्रामस्थ व शेतकरी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभते. त्यामुुळे शेतकऱ्यांनी याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. कार्यक्रमाचे मळगावचे सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर, कृषी सहायक सी. जी. मेस्त्री, कृषी पर्यवेक्षक सी. जी. मेस्त्री, कृषी पर्यवेक्षक आर. एल. घावरे, विजय राऊळ तसेच मळगावचे ग्रामस्थ व शेतकरी वर्ग व अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचाआज बदलत्या हवामानानुसार व निसर्गातील बदलामुळे भूमीवरील पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. कृषी विभाग, लघू पाटबंधारे विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग व जलसंपदा विभागामार्फत ही कारवाई केली जाते. त्यामुळे या योजनेचा योग्य अवलंब झाला आहे. पावसाचा थेंबन्थेंब जमिनीत मुरून जमिनीतील पाण्याची पातळी वाढविली जात आहे. यात शेतकरी वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.