शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

मनसेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास गप्प बसणार नाही

By admin | Updated: November 30, 2014 00:50 IST

परशुराम उपरकर : ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा

सावंतवाडी : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून वनविभागाने आडाळी येथे मायनिंग उत्खनन करण्यास परवानगी दिली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून यावर पांघरून घालण्यासाठी आमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अडचणीत आणून नसलेले गुन्हे दाखल केले जात आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, असा इशारा मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब उपस्थित होते. यावेळी मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले, मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यामागे एखाद्या पक्षाचा आवाज दाबणे हाच हेतू होतो. पण आम्ही गप्प बसणार नाही. वनक्षेत्रपाल संजय शिदे यांचे निलंबन होईपर्यंत मनसे या ना त्या मार्गाने आपले आंदोलन सुरूच ठेवणार आहे. आम्ही स्वत:साठी गेलो नव्हतो. जनतेच्या प्रश्नासाठी गेलो होतो. मग एखाद्या घटनेनंतर तब्बल आठवड्याने गुन्हे दाखल करण्याचा हेतू काय, असा सवालही उपरकर यांनी केला आहे.आडाळी येथे वनजमिनीत मोठ्या प्रमाणात मायनिंग उत्खनन केले गेले आहे. त्यावर कोणाचा लक्ष नाही. सर्वोच्च न्यायालयाचे सर्व आदेश या अधिकाऱ्यांनी धुळीस मिळवले, मग याच्यावर कारवाई व्हायला नको का? सिंधुुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. वनजमिनी तर लाकूड व्यापाऱ्यांनी गिळंकृत केल्या आहेत, त्यावर हे अधिकारी गप्प का, असा सवाल केला आहे. तसेच याप्रश्नी वरिष्ठ पातळीवरही न्याय मागणार असून ही सर्व वस्तुस्थिती उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्या कानावर घातली असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)