शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प रद्दचे पत्र आणूनच आमदारांनी चर्चेला यावे

By admin | Updated: September 4, 2016 00:31 IST

सेनेकडून फसवणूक : वायंगणी ग्रामस्थांची भूमिका

आचरा : विधानसभा निवडणुकीपूर्वी सी-वर्ल्ड प्रकल्पाला विरोध करणारे आमदार वैभव नाईक आता या प्रकल्पाच्या बाजूने बोलत आहेत. त्यांची ही भाषा लोकांची फसवणूक करणारी असून त्यांनी हा प्रकल्प रद्द केल्याचे पत्र आणावे आणि नंतरच ग्रामस्थांच्या भेटीस यावे, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.सी-वर्ल्डचे राजकारण करीत वैभव नाईक यांनी निवडणुकीत विजय मिळविला. आता तेच ३५० एकरात प्रकल्प साकारण्याची भाषा करीत आहेत. सी-वर्ल्डवर चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांकडे येण्यासाठी त्यांना वेळ नाही. यापुढे त्यांनी प्रकल्प रद्द केल्याचे पत्र घेऊन यावे अन्यथा चर्चेला येवू नये, असे या ग्रामस्थांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.मालवण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाईक यांनी ३५० एकरांची अधिसूचना काढण्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी वायंगणी ग्रामस्थांनी कालावल टीकमवाडी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी प्रफुल्ल माळकर, मालती जोशी, मनोहर टीकम, मंगेश आंगणे, चंदू सावंत, समीर वायंगणकर, मंगेश मसुरकर, आबा वायंगणकर, सुधाकर वालावलकर, रामचंद्र वायंगणकर, ब्रह्मानंद टीकम, हनुमंत सावंत, पांडुरंग वायंगणकर, सोनाली सावंत, दीपक जोशी, विलास जोशी, उत्तम खांबल, हरिश्चंद्र सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कायम ग्रामस्थांसोबत असणारे उदय दुखंडे ग्रामस्थांना टाळत असल्याचे दिसून आले. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यावेळी ग्रामस्थांनी सी-वर्ल्डला विरोध केला होता. त्यावेळीही आमदार व खासदारांनी आपण ग्रामस्थांच्या बाजूने असल्याचे सांगून मते मिळविली होती. वाळू आंदोलनात आमदार नाईक यांनी पुढाकार घेऊन आवाज उठविला होता. त्यांनाच आता वायंगणी-तोंडवळी ग्रामस्थांसाठी वेळ नाही का? असा सवाल या ग्रामस्थांनी केला. सी-वर्ल्ड प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी दोन वर्षांपूर्वी त्यांची भेट घेऊन केली होती. आज नाईक यांना ग्रामस्थांना बोलण्यास वेळ नाही. ते आता ग्रामस्थांना न भेटता पत्रकारांमार्फत आपले मत प्रकट करीत आहेत. प्रकल्प रद्द करण्याची भाषा विसरून ते ३५० एकराची अधिसूचना काढण्याची भाषा करीत आहेत. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध असून ग्रामसभांनी तसे ठरावही केलेले आहेत. असे असताना शिवसेना लोकांना फसवित आहे. या प्रकल्पाला आमचा विरोध कायम असून आम्हांला कोणत्याही पक्षाच्या कुबड्यांची गरज नाही. आम्ही आमचे आंदोलन स्वबळावर लढवू, असेही ग्रामस्थांतर्फे यावेळी स्पष्ट करण्यात आले. (वार्ताहर)