शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

प्रकल्प रद्दचे पत्र आणूनच आमदारांनी चर्चेला यावे

By admin | Updated: September 4, 2016 00:31 IST

सेनेकडून फसवणूक : वायंगणी ग्रामस्थांची भूमिका

आचरा : विधानसभा निवडणुकीपूर्वी सी-वर्ल्ड प्रकल्पाला विरोध करणारे आमदार वैभव नाईक आता या प्रकल्पाच्या बाजूने बोलत आहेत. त्यांची ही भाषा लोकांची फसवणूक करणारी असून त्यांनी हा प्रकल्प रद्द केल्याचे पत्र आणावे आणि नंतरच ग्रामस्थांच्या भेटीस यावे, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.सी-वर्ल्डचे राजकारण करीत वैभव नाईक यांनी निवडणुकीत विजय मिळविला. आता तेच ३५० एकरात प्रकल्प साकारण्याची भाषा करीत आहेत. सी-वर्ल्डवर चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांकडे येण्यासाठी त्यांना वेळ नाही. यापुढे त्यांनी प्रकल्प रद्द केल्याचे पत्र घेऊन यावे अन्यथा चर्चेला येवू नये, असे या ग्रामस्थांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.मालवण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाईक यांनी ३५० एकरांची अधिसूचना काढण्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी वायंगणी ग्रामस्थांनी कालावल टीकमवाडी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी प्रफुल्ल माळकर, मालती जोशी, मनोहर टीकम, मंगेश आंगणे, चंदू सावंत, समीर वायंगणकर, मंगेश मसुरकर, आबा वायंगणकर, सुधाकर वालावलकर, रामचंद्र वायंगणकर, ब्रह्मानंद टीकम, हनुमंत सावंत, पांडुरंग वायंगणकर, सोनाली सावंत, दीपक जोशी, विलास जोशी, उत्तम खांबल, हरिश्चंद्र सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कायम ग्रामस्थांसोबत असणारे उदय दुखंडे ग्रामस्थांना टाळत असल्याचे दिसून आले. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यावेळी ग्रामस्थांनी सी-वर्ल्डला विरोध केला होता. त्यावेळीही आमदार व खासदारांनी आपण ग्रामस्थांच्या बाजूने असल्याचे सांगून मते मिळविली होती. वाळू आंदोलनात आमदार नाईक यांनी पुढाकार घेऊन आवाज उठविला होता. त्यांनाच आता वायंगणी-तोंडवळी ग्रामस्थांसाठी वेळ नाही का? असा सवाल या ग्रामस्थांनी केला. सी-वर्ल्ड प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी दोन वर्षांपूर्वी त्यांची भेट घेऊन केली होती. आज नाईक यांना ग्रामस्थांना बोलण्यास वेळ नाही. ते आता ग्रामस्थांना न भेटता पत्रकारांमार्फत आपले मत प्रकट करीत आहेत. प्रकल्प रद्द करण्याची भाषा विसरून ते ३५० एकराची अधिसूचना काढण्याची भाषा करीत आहेत. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध असून ग्रामसभांनी तसे ठरावही केलेले आहेत. असे असताना शिवसेना लोकांना फसवित आहे. या प्रकल्पाला आमचा विरोध कायम असून आम्हांला कोणत्याही पक्षाच्या कुबड्यांची गरज नाही. आम्ही आमचे आंदोलन स्वबळावर लढवू, असेही ग्रामस्थांतर्फे यावेळी स्पष्ट करण्यात आले. (वार्ताहर)