शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कणकवली बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: April 4, 2015 00:07 IST

न्याय देण्याची मागणी : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर व्यापाऱ्यांचा मोर्चा

कणकवली : कणकवली शहर तसेच परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणांच्या पोलिसांच्या तपास पद्धतीबाबत नाराजी व्यक्त करीत व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदच्या दिलेल्या हाकेला शुक्रवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शहरातील पटकीदेवी मंदिरापासून बाजारपेठमार्गे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांना निवेदन देऊन आपल्याला न्याय देण्याची मागणी केली.कणकवली शहर व परिसरात गेल्या वर्षभरात घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी शहरातील तीन युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान घरफोडी प्रकरणातील सोने विकत घेतलेल्या सुवर्णकाराचे नाव समोर आले होते. या सुवर्णकारासह अन्य सुवर्णकारांवर पोलीस दडपशाहीने कारवाई करीत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला होता. सुवर्णकाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. त्यामुळे गुरुवारी व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आपले म्हणणे मांडले होते. तसेच पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करीत कणकवली बाजारपेठ ‘बंद’ची हाक दिली होती. याला प्रतिसाद देत शुक्रवारी सकाळपासून बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद होती, तर तुरळक प्रमाणात काही दुकाने उघडी होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील पटकीदेवी मंदिराकडून उपविभागीय पोलीस कार्यालयापर्यंत व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. यामध्ये सुवर्णकारांसह काही नागरिकही सहभागी झाले होते. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, माजी आमदार राजन तेली यांच्यासह काही राजकीय नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांना दैवज्ञ हितवर्धक समाज संघटना कणकवली, कणकवली तालुका व्यापारी महासंघ तसेच धनंजय कसवणकर यांच्यापत्नी शिवानी कसवणकर यांनी निवेदन सादर केले. तसेच आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी केली. (वार्ताहर)तपासात पक्षपातीपणा नाहीघरफोडीप्रकरणी पोलिसांचा कायदेशीररीत्या तपास सुरू आहे. आमच्या तपासावर वरिष्ठ अधिकारी तसेच न्यायालयाचा अंकुश असतो. आम्ही सर्वेसर्वा नाही. त्यामुळे तपास करताना पक्षपातीपणा होणार नाही, तसेच आरोपी सोडून कोणावरही विनाकारण कारवाई होणार नाही, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले....तर तीव्र आंदोलनकणकवली बाजारपेठ बंद ठेवून तसेच मोर्चा काढून पोलिसांकडे न्याय मिळण्यासाठी मागणी केली आहे. मात्र, पोलिसांची दडपशाही अशीच सुरू राहिल्यास तसेच न्याय न मिळाल्यास जिल्ह्यातील सुवर्णकार, व्यापाऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी शुक्रवारी हॉटेल साईपॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.