शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: April 4, 2015 00:07 IST

न्याय देण्याची मागणी : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर व्यापाऱ्यांचा मोर्चा

कणकवली : कणकवली शहर तसेच परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणांच्या पोलिसांच्या तपास पद्धतीबाबत नाराजी व्यक्त करीत व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदच्या दिलेल्या हाकेला शुक्रवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शहरातील पटकीदेवी मंदिरापासून बाजारपेठमार्गे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांना निवेदन देऊन आपल्याला न्याय देण्याची मागणी केली.कणकवली शहर व परिसरात गेल्या वर्षभरात घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी शहरातील तीन युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान घरफोडी प्रकरणातील सोने विकत घेतलेल्या सुवर्णकाराचे नाव समोर आले होते. या सुवर्णकारासह अन्य सुवर्णकारांवर पोलीस दडपशाहीने कारवाई करीत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला होता. सुवर्णकाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. त्यामुळे गुरुवारी व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आपले म्हणणे मांडले होते. तसेच पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करीत कणकवली बाजारपेठ ‘बंद’ची हाक दिली होती. याला प्रतिसाद देत शुक्रवारी सकाळपासून बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद होती, तर तुरळक प्रमाणात काही दुकाने उघडी होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील पटकीदेवी मंदिराकडून उपविभागीय पोलीस कार्यालयापर्यंत व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. यामध्ये सुवर्णकारांसह काही नागरिकही सहभागी झाले होते. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, माजी आमदार राजन तेली यांच्यासह काही राजकीय नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांना दैवज्ञ हितवर्धक समाज संघटना कणकवली, कणकवली तालुका व्यापारी महासंघ तसेच धनंजय कसवणकर यांच्यापत्नी शिवानी कसवणकर यांनी निवेदन सादर केले. तसेच आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी केली. (वार्ताहर)तपासात पक्षपातीपणा नाहीघरफोडीप्रकरणी पोलिसांचा कायदेशीररीत्या तपास सुरू आहे. आमच्या तपासावर वरिष्ठ अधिकारी तसेच न्यायालयाचा अंकुश असतो. आम्ही सर्वेसर्वा नाही. त्यामुळे तपास करताना पक्षपातीपणा होणार नाही, तसेच आरोपी सोडून कोणावरही विनाकारण कारवाई होणार नाही, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले....तर तीव्र आंदोलनकणकवली बाजारपेठ बंद ठेवून तसेच मोर्चा काढून पोलिसांकडे न्याय मिळण्यासाठी मागणी केली आहे. मात्र, पोलिसांची दडपशाही अशीच सुरू राहिल्यास तसेच न्याय न मिळाल्यास जिल्ह्यातील सुवर्णकार, व्यापाऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी शुक्रवारी हॉटेल साईपॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.