शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरोंदा जेटीबाबत तेलींकडून जनतेची दिशाभूल

By admin | Updated: January 23, 2015 23:35 IST

परशुराम उपरकर : आरोंदा तिठा ते किरणपाणी रस्त्यावरील बांधकाम नियमबाह्य

कणकवली : आरोंदा जेटी प्रकल्पावरून राजन तेली जनतेची दिशाभूल करीत आहेत. आरोंदा तिठा ते किरणपाणी रस्त्यावरील बांधकाम नियमबाह्य असून, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वी मेरिटाईम बोर्डाला पत्र लिहिले आहे. त्यामुळे आरोंदा जेटी बांधकामात अनियमितता असल्याची टीका मनसेचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी केली. येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, आरोंदा जेटीबाबत परवानग्या न घेता काम सुरू केल्यामुळेच आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जेटीबाबतच्या कामात अनियमितता तसेच पर्यावरणविषयक धोका हे दोन प्रमुख मुद्दे याचिकेतून मांडले आहेत. या प्रकल्पाजवळ खारलँड विभागाने बंधारा बांधला आहे. या ठिकाणची परवानगी घेणे आवश्यक असताना तसे झालेले नाही. तेली यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पांसाठी ग्रामसभेच्या ठरावाची गरज नसेल, तर ते नारायण राणे यांचे सहकारी म्हणून कार्यरत असताना जिल्ह्यात अनेक प्रकल्प झाले असते. कळणे मायनिंग प्रकल्पाबाबत ग्रामसभेच्या ठरावाला बगल देऊन जनसुनावणी वेळी खाणमालकांच्या बाजूने तेली यांनी भूमिका घेतली होती. जे काँग्रेसमध्ये असताना केले तेच भाजपात येऊन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील जेटीमुळे कितीजणांना रोजगार मिळाला? हे तेली यांनी जाहीर करावे. त्यामुळे आरोंदा जेटीबाबतचा त्यांचा दावा फोल आहे. कळणे मायनिंगसाठी ज्यांनी डंपर घेतले ते आता पस्तावले आहेत. तेली जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना कर्ज घेऊन ३०० डंपर घेतलेले आता किती समाधानी आहेत? याचे संशोधन त्यांनी करावे. कोणत्या कारखान्याने अथवा कंपनीने जिल्ह्यात यावे, हे त्या कंपनीने ठरवायचे आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल तेली यांनी करू नये. इन्सुली सूतगिरण, तेलताड प्रकल्प, करूळ काच कारखाना, कुडाळ एमआयडीसी याबाबतही त्यांनी विचार करावा व जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असा टोलाही उपरकर यांनी यावेळी लगावला. (वार्ताहर)अभिनंदनाचा ठराव ग्रामसभेत नामंजूरआरोंदा ग्रामसभेने तीनवेळा बहुमताने जेटीबाबत विरोधी ठराव घेतला आहे. सरपंचांनी तत्कालीन मंत्री नारायण राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव जेटी मालकांच्या सांगण्यावरून केला होता. मात्र, तो ग्रामसभेने नामंजूर केला. युती शासनाला विकासकामांसाठी ग्रामसभेच्या ठरावाची यापुढे गरज भासणार नसेल तर जनतेला नको असलेले प्रकल्प शासन जनतेच्या माथी मारायला निघाले आहे, असेच यातून सिद्ध होते.