शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंची कामे अर्धवट

By admin | Updated: June 3, 2015 23:47 IST

सावडाव धबधबा : खर्च वाया, सुनियोजीत प्रयत्न करणे आवश्यक

मिलिंद पारकर - कणकवली -पावसाळा सुरू झाला की सावडाव येथील धबधबा सुरू होईल. सावडाव धबधबा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी लाखो रूपये खर्चून कामे करण्यात आली. परंतु कामे अर्धवट स्थितीत असल्याने पर्यटक सुविधांपासून यावर्षीही वंचित राहणार आहेत. सावडाव धबधबा विकसित करण्यासाठी अर्धवट कामे तत्काळ पूर्ण करण्यासोबत सुनियोजित प्रयत्न आवश्यक आहेत. कणकवली तालुक्यात पर्यटन स्थळे कमीच आहेत. मालवण, देवगड, वेंगुर्लेसारखी तालुक्याला किनारपट्टी नाही. तालुक्यातील बहुधा एकमेव पर्यटनस्थळ असलेला सावडाव धबधब्यावर पावसाळ्यात स्थानिकांसह परजिल्ह्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. मुंबई-गोवा महामार्गावरून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. धबधब्याच्या आजूबाजूला वस्ती नाही. पावसाळ्यानंतर सहा ते आठ महिने धबधबा सुरू राहतो. पर्यटनस्थळावर येण्यासाठी खासगी वाहनाशिवाय पर्याय नाही. कणकवलीपासून १८ किलोमीटर व महामार्गावर बेळणे फाट्यावरून ६ किलोमीटर अंतर पडते. या ठिकाणी पर्यटन विकासांतर्गत गेल्या तीन-चार वर्षांत येथे पक्का रस्ता झाला. टॉवर बांधण्यात आला. त्या बाजूला चेंजिंग रूम, प्रसाधनगृहे, धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आदी कामे करण्यात आली आहेत. मात्र, प्रसाधनगृहांचे काम अर्धवट आहे. चेंजिंग रूमच्या पाईपलाईनचे कामही पूर्ण झालेले नाही. बैठकांचे साहित्य आणून टाकण्यात आले. मात्र, बैठका बसवण्यात आलेल्या नाहीत. टॉवरचे कामही निकृष्ट पद्धतीने केल्याचे दिसत आहे. रस्त्यासह एकूण कामासाठी सुमारे ८० लाख रूपये अपेक्षित आहे. वर्षभरापूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमवेत या कामाची झडती घेतली होती. मात्र, त्यानंतरही कामात कोणतीही प्रगती झालेली नाही. धबधब्याच्या बाजूला खाद्यपदार्थ विक्रीसाठी म्हणून कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र, त्याच्या काचा फुटून गेल्या आहेत. देखभालीसाठी कोणीही पर्यटनस्थळावर नसल्याने मोडतोडीचे प्रकारही होत असून सर्व सुविधा रामभरोसे टाकण्यात आलेल्या आहेत. हा परिसर निर्मनुष्य असून धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षारक्षक अथवा कोणीही जबाबदार व्यक्ती नसते. त्यामुळे महिलांसाठी वातावरण सुरक्षित नाही. पावसाळ्यात याठिकाणी युवा वर्ग मौजमजेसाठी जातो. प्रसाधनगृहातच चुली मांडून जेवण शिजवले जाते आणि मद्यपान केले जाते. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या मोठ्या फलकावर सावडाव धबधब्याचे छायाचित्र न लावता विजयदुर्ग किल्ला आणि वेंगुर्ले बंदराचे छायाचित्र लावण्यात आलेले आहे. त्याठिकाणी सावडाव धबधब्याचे छायाचित्र आवश्यक होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम ग्रामपंचायतीने ताब्यात घेण्यासाठी पत्र दिले आहे. मात्र, अपूर्ण असल्याने आम्ही ते घेतलेले नाही. रस्त्यासाठी लोकांनी आपली जागा, झाडे काढून दिली. परंतु बांधकाम विभागाने संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे शेती धोक्यात आली आहे. धबधब्यावरील सुविधा ग्रामपंचायतीच्या ताब्यात आलेल्या नसल्याने देखभाल होऊ शकत नाही.- दत्ताराम काटे, उपसरपंच, सावडावशिस्त आणि सुविधांची गरजसावडाव धबधबा हंगामी पर्यटन स्थळ असले तरी पावसाळ्याचे सहा ते आठ महिने येथे पर्यटन बहरू शकते. मात्र, त्यासाठी शिस्त आणणे गरजेचे आहे. पर्यटकांना कुटुंबासह येथे जाण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करू शकते. मात्र, अद्याप अर्धवट असल्याने हे बांधकाम ताब्यात घेण्यात आलेले नाही. धबधब्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थ मिळण्याची कोणतीही सोय नाही. हंगामात वडापाव, चहाचे स्टॉल तेवढे लावले जातात. गावात कोणाला सांगितल्यास जेवण करून दिले जाते. सावडाव धबधब्याच्या बाजूलाच परिसराचे विहंगम दर्शन घेण्यासाठी उंच टॉवर उभारण्यात आला आहे. मात्र, या टॉवरच्या रेलिंगचे काम निकृष्ट असल्याने टॉवरवर जाणे धोकादायक ठरू शकते. पर्यटनस्थळावर वीजेची अथवा पाण्याची सोय नाही. बोअरवेल मारण्याचे काम प्रस्तावित आहे.