शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दूध बिलाचे पैसे आता थेट खात्यावर

By admin | Updated: February 4, 2015 00:05 IST

शासनाचा फतवा : शासनाच्या विरोधात उत्पादक आक्रमक

रत्नागिरी : दूध उत्पादकांच्या दुधाच्या बिलाचे पैसे आता त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जावेत, असा फतवा शासनाने काढला आहे. मात्र, उत्पन्नापेक्षा यासाठीची प्रक्रियाच अडचणीची असल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादकांमधून विरोध होत आहे. ही पद्धत बंद करा, अन्यथा आम्ही संस्थांना दूध घालणेच बंद करू, अशी भूमिका जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी आजच्या बैठकीत घेतल्याने जिल्ह्यातील हा व्यवसाय पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर आहे.शासनाने दुग्ध उत्पादकांच्या दुधाचे बिल थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत दूध उत्पादकांची राष्ट्रीयीकृत बँकेत खाती उघडण्यासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास कार्यालय, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या येथील शाखेतर्फे दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मार्र्गदर्शन करण्यासाठी मुंबईच्या सहकारी संस्थांच्या विभागीय निबंधक मीना आहेर, स्टेट बँंक आॅफ इंडियाचे (मुंबई) उपमहाप्रबंधक संदीप सोपारी, विभागाचे सहायक सरव्यवस्थापक बाळकृष्ण कानडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस. के. कांबळे, सहकारी संस्था (दुग्ध)चे सहायक निबंधक संजय कांबळे, जिल्हा उपनिबंधक राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते. शहरातील माध्यमिक अध्यापक पतपेढीत झालेल्या या बैठकीला जिल्ह्यातील सर्व संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते. मात्र, यावेळी संस्थांनी यासाठी जोरदार आक्षेप घेतला. बहुसंख्य दूध उत्पादक सहकारी संस्था ग्रामीण भागात आहेत. पूर्वी या संस्थांमध्ये गावातील शेतकऱ्यांकडून दूध संकलन केले जात असे. सर्व शेतकऱ्यांच्या एकूण दुधाचे बिल हे संस्थेच्या खात्यावर जमा होत असे. त्यातून संस्था प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या दुधाचे पैसे वितरीत करीत असत. मात्र, शासनाच्या नवीन फतव्यामुळे आता या शेतकऱ्यांना आपल्या गावातून आपल्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी बँकेच्या ठिकाणी १२ ते १५ किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)अडचणीत दुग्ध व्यवसाय बहुसंख्य शेतकरी दिवसाला १ ते २ लीटर दूध संस्थांना वितरीत करतात. त्यांना यातून १५ दिवसांनी मिळणाऱ्या २०० ते ५०० रूपयांसाठी अर्धा दिवस वाया घालवून बँकेत यावे लागणार आहे. यासाठी १०० ते २०० रूपयांचा खर्च करावा लागणार आहे. या अडचणी संस्थांनी आजच्या बैठकीत मांडल्या. आधीच येथील दूध व्यवसाय अडचणीत आहे. त्यातच आता शासनाने दूध बिल थेट बँक खात्यात जमा करण्याचा फतवा काढला, तर आम्ही संस्थेकडे दूध घालण्याचेच बंद करू, असा इशारा या उत्पादकांनी अधिकाऱ्यांना दिला.