शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

सैनिक भरती संपली, शहर स्वच्छता मोहीम कधी?

By admin | Updated: February 20, 2015 23:11 IST

रत्नागिरी नगर परिषद : मारुती मंदिर परिसरात अजूनही घाणीचे साम्राज्य

रत्नागिरी : शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गेल्या आठवड्यात झालेल्या सैनिक भरती प्रक्रियेतील त्रुटी उघड झाल्यानंतर आता मारुती मंदिर परिसर स्वच्छतेची समस्या समोर आली आहे. त्यामुळे या भागातील स्वच्छतेसाठी रत्नागिरी नगरपरिषद आता स्वच्छता मोहीम कधी हाती घेणार, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. रत्नागिरीत ८ ते १८ फेबु्रवारी २०१५ या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच गोवा, गुजरात व उर्वरित महाराष्ट्रासाठी सैनिक भरतीचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवसापासूनच या भरती आयोजनात अनंत अडचणी, त्रुटी उघड झाल्या. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या तरुणांना अनेक गैरसोर्इंना सामोरे जावे लागले. केवळ ८ स्वच्छतागृहांमुळे तर दररोज येणाऱ्या हजारोे तरुणांची प्रचंड गैरसोय झाली. निवासाची सोय नव्हती की भोजन, नाश्त्याची व्यवस्था शासकीय पातळीवर करण्यात आली नाही. हॉटेल व्यावसायिकांना विश्वासात घेऊन किती तरुण या भरतीत सहभागी होणार, याची साधी कल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांत तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर जेवण नाहीच पण साधा वडापावही या तरुणांना उपलब्ध झाला नाही. त्यानंतरच्या दिवसात काही स्वयंसेवी संस्थांनी मोफत भोजन, नाश्त्याची व्यवस्था केली. निवास व्यवस्था नसल्याने वर्तमानपत्राचा कागद मारुती मंदिर सर्कल, परिसरातील मोकळी जागा, हिंदू कॉलनीतील काही लोकांच्या कुंपणात जमिनीवर टाकून झोपण्याची वेळ या तरुणांवर आली. स्वच्छतागृहेदेखील उपलब्ध नसल्याने आजूबाजूच्या परिसराचाच वापर स्वच्छतागृहांसारखा झाला आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांच्या महासैन्यभरतीच्या काळात या परिसराला अत्यंत बकाल स्वरुप आले आहे. त्याच्या खुणा मारूती मंदिर, हिंदू कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरात आजही दिसून येत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने या सर्व भागांमध्ये लवकरात लवकर खास स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी आता शहरवासियांतून होत आहे. अशाप्रकारचे मोठे कार्यक्रम घेताना त्याचे योग्य नियोजन नसेल, तर शहर परिसरातील क्रीडांगणे अशा मोठ्या कार्यक्रमांसाठी दिली जाऊ नयेत, अशा सूचनाही नागरिकांतून केल्या जात आहेत. (प्रतिनिधी)