शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक भरती संपली, शहर स्वच्छता मोहीम कधी?

By admin | Updated: February 20, 2015 23:11 IST

रत्नागिरी नगर परिषद : मारुती मंदिर परिसरात अजूनही घाणीचे साम्राज्य

रत्नागिरी : शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गेल्या आठवड्यात झालेल्या सैनिक भरती प्रक्रियेतील त्रुटी उघड झाल्यानंतर आता मारुती मंदिर परिसर स्वच्छतेची समस्या समोर आली आहे. त्यामुळे या भागातील स्वच्छतेसाठी रत्नागिरी नगरपरिषद आता स्वच्छता मोहीम कधी हाती घेणार, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. रत्नागिरीत ८ ते १८ फेबु्रवारी २०१५ या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच गोवा, गुजरात व उर्वरित महाराष्ट्रासाठी सैनिक भरतीचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवसापासूनच या भरती आयोजनात अनंत अडचणी, त्रुटी उघड झाल्या. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या तरुणांना अनेक गैरसोर्इंना सामोरे जावे लागले. केवळ ८ स्वच्छतागृहांमुळे तर दररोज येणाऱ्या हजारोे तरुणांची प्रचंड गैरसोय झाली. निवासाची सोय नव्हती की भोजन, नाश्त्याची व्यवस्था शासकीय पातळीवर करण्यात आली नाही. हॉटेल व्यावसायिकांना विश्वासात घेऊन किती तरुण या भरतीत सहभागी होणार, याची साधी कल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांत तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर जेवण नाहीच पण साधा वडापावही या तरुणांना उपलब्ध झाला नाही. त्यानंतरच्या दिवसात काही स्वयंसेवी संस्थांनी मोफत भोजन, नाश्त्याची व्यवस्था केली. निवास व्यवस्था नसल्याने वर्तमानपत्राचा कागद मारुती मंदिर सर्कल, परिसरातील मोकळी जागा, हिंदू कॉलनीतील काही लोकांच्या कुंपणात जमिनीवर टाकून झोपण्याची वेळ या तरुणांवर आली. स्वच्छतागृहेदेखील उपलब्ध नसल्याने आजूबाजूच्या परिसराचाच वापर स्वच्छतागृहांसारखा झाला आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांच्या महासैन्यभरतीच्या काळात या परिसराला अत्यंत बकाल स्वरुप आले आहे. त्याच्या खुणा मारूती मंदिर, हिंदू कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरात आजही दिसून येत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने या सर्व भागांमध्ये लवकरात लवकर खास स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी आता शहरवासियांतून होत आहे. अशाप्रकारचे मोठे कार्यक्रम घेताना त्याचे योग्य नियोजन नसेल, तर शहर परिसरातील क्रीडांगणे अशा मोठ्या कार्यक्रमांसाठी दिली जाऊ नयेत, अशा सूचनाही नागरिकांतून केल्या जात आहेत. (प्रतिनिधी)