शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

जिल्ह्यातील गणरायांना निरोप

By admin | Updated: September 16, 2016 23:42 IST

अनंत चतुर्दशी : १८ हजार गणेशमूर्तींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन; पावसाच्या हजेरीने भक्त चिंब

कणकवली : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला' च्या जयघोषात जिल्ह्यातील १८ हजार ३७९ घरगुती, तर २१ सार्वजनिक गणेशमूर्तींचे गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन करण्यात आले. यामध्ये कणकवलीचे भूषण असलेल्या टेंबवाडी येथील ‘संतांच्या गणपती’ चा समावेश होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक भागात पावसानेही जोरदार हजेरी लावत गणेश भक्तांना चिंब भिजवले.सिंधुदुर्गात यावर्षी ६६ हजार ५४५ घरगुती, तर ३७ सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यापैकी दीड दिवसांनी सार्वजनिक एक, तर १४ हजार १४४ घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. पाचव्या दिवशी १७ हजार १६४ घरगुती गणपती, सहाव्या दिवशी गौरीसह १ हजार ९८, सातव्या दिवशी सार्वजनिक ६, तर घरगुती १० हजार १८३, नवव्या दिवशी ३ हजार ५६४, तर अकराव्या दिवशी २१ सार्वजनिक आणि १८ हजार ३७९ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.गेले अकरा दिवस आरती आणि भजनांमुळे वातावरण भक्तिमय बनले होते. बालगोपाळांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गणपती बाप्पांच्या आराधनेत भक्तमंडळी तल्लीन झाल्याचे चित्र होते. बाप्पांसाठी उकडीचे मोदक आणि करंज्यांचा नैवेद्य दाखवित, सुखकर्ताङ्घदु:खहर्ताचे सूर आळवित गणेशभक्तांनी आपले त्याच्याशी असलेले नाते अधिकच घट्ट केले. निरोपाचा दिवस उजाडला, तशी पुन्हा एकदा लगबग सुरू झाली. आरतीच्या सुरांनी पुन्हा एकदा बाप्पांची आळवणी करण्यात आली. सायंकाळ झाली, तोपर्यंत निरोपाचा क्षण जवळ आला, या जाणीवेने बच्चेकंपनीची घालमेल सुरू झाली. त्यातच बच्चे कंपनीचा ‘पुढच्या वर्षी लवकर या..’ चा जयघोष सुरू झाला.नदी, नाले, समुद्र्रकिनारे, तलाव आदी विसर्जनस्थळी गणरायाला अखेरचा निरोप देण्यासाठी असंख्य हात जोडले गेले. फटाके आणि ढोलताशांचे आवाज आसमंतात घुमत होते. मात्र, दुसरीकडे बाप्पाप्रती असलेल्या भक्तीभावनेचा मनातला एक कोपरा हळवा झाला होता.कणकवलीतील जानवली नदीवरील गणपती सान्यावर टेंबवाडी येथील संतांच्या गणपतीला निरोप देण्यात आला. पारंपारिक पध्दतीने लाकडी मंचकावर विराजमान झालेल्या या गणरायाला मोठ्या भक्तिभावाने विसर्जन स्थळापर्यंत नेण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत बच्चे कंपनीसह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.कणकवली नगरपंचायतीच्यावतीने भालचंद्र महाराज आश्रमाजवळील भक्त निवासाकडे गणरायावर पुष्पवृष्टीकरण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा माधुरी गायकवाड़, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. कणकवलीत पोलिस निरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर आपत्कालीन पथकही कार्यरत होते. (प्रतिनिधी)जल्लोषात मिरवणूका : प्रशासनाचे चोख नियोजनकणकवली शहरासह जिल्ह्यात समुद्र, नदी, तलाव, ओढे अशा पारंपरिक ठिकाणी,गणपती सान्यावर गणरायाला निरोप देण्यात आला . कुडाळ येथील सिंधुदुर्गच्या राजाचेही जल्लोषी मिरवणुकीने सायंकाळी ४ वाजता विसर्जन करण्यात आले.गणेश विसर्जनाच्या निमित्त जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणुकीमुळे शहरांमध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडीची समस्या देखील पोलिस जातीनिशी सोडवित होते. तर स्थानिक नगर पालिकांनीही विशेष नियोजन केले होते.भाविकांचा जयघोषअकरा दिवस मोदकांचा नैवेद्य आणि आरती-भजनांच्या सुरावटीसह मनोभावे पूजन केलेल्या गणरायाला गुरुवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात असंख्य भाविकांनी ‘डोळ्यांनी पाहीन रुप तुझे..’चे सूर आळवित ‘पुढच्या वर्षी लवकर या...’ची हाक दिली.