शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

कोकण आयुक्तांनी दिला स्वच्छतेचा संदेश

By admin | Updated: January 1, 2017 22:36 IST

मालवणात राबविले स्वच्छता अभियान : जल चेतना अभियानाचे प्रणेते राजेंद्रसिंह राणा यांची उपस्थिती

मालवण : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्यावतीने किनारपट्टीवर राबविण्यात येणाऱ्या निर्मल सागर तट अभियानात कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख आणि शासनाचे जलदूत आणि जल चेतना अभियानाचे प्रणेते राजेंद्रसिंह राणा यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला. मालवण दांडी मोरयाचा धोंडा येथील समुद्र किना?्यावर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.मालवण दांडी येथे कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जलदूत राजेंद्रसिंह राणा यांनी शनिवारी सायंकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपजिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार वीरधवल खाडे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, मुख्याधिकारी रंजना गगे, नायब तहसीलदार धनश्री भालचिम, एस. एस. गोसावी, ग्रामसेवक युवराज चव्हाण यासह वायरी सरपंच सुजाता मातोंडकर, प्रियांका रेवणकर, हरी खोबरेकर, भाई मांजरेकर, श्यामा झाड तसेच सर्व शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दांडी किनाऱ्यावर राबविण्यात आलेल्या मोहिमेत ओला, सुका कचरा वेगळा करण्यात आला. प्रशासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वायरी ग्रामस्थांनी मोहिमेत सहभाग घेतला. आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रात्री वायरी ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधल्यानंतर शिवकालीन पोवाड्यांचा कार्यक्रम सादर झाला. (प्रतिनिधी)स्वच्छतेने जागवूया महाराजांचा इतिहासकिल्ले सिंधुदुर्ग उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील मोरयाचा धोंडा या पवित्र ठिकाणी जलपुजन केले होते. महाराजांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी येथील समुद्र किनाऱ्यांची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे महाराजांचा इतिहास जागविण्यासाठी किनाऱ्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे. नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या पवित्र ठिकाणच्या किनाऱ्यांची स्वच्छता करणे हे आपले भाग्य असल्याचे कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.प्रशासन, ग्रामस्थ यांना साथीला घेऊन कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी स्वच्छता मोहीम राबविली खरी, पण मोहिमेच्या सुरुवातीला पूजन केलेल्या मोरयाच्या धोंड्याचे ठिकाणी कच?्याचा साचलेल्या ढिगाकडे सर्वांनी साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे सायंकाळी राबविण्यात आलेली स्वच्छता मोहीम चचेर्चा विषय ठरली होती.