शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

दापोली तालुक्यात व्यापाऱ्याचे अपहरण, सुटका; सहा अटकेत

By admin | Updated: November 11, 2015 23:41 IST

अपहरणकर्ते सुपारीदादा : चित्रपट दृश्याला शोभेल असा थरार

खेड : चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे एका चिरेखाण व्यावसायिकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न सहाजणांनी केल्याचा प्रकार बुधवारी दापोली तालुक्यातील उन्हवरे फाटा येथे घडला. काही जागरूक ग्रामस्थांनी हा प्रकार तत्काळ पोलिसांच्या कानावर घातल्याने खेडमध्ये पोलिसांनी फिल्डिंग लावून अपहरणकर्त्यांची इनोव्हा अडविली आणि चिरेखाण व्यावसायिक रूपेश बाजीराव पवार यांची सुटका केली. अपहरण करणाऱ्या सहाजणांना गजाआड करण्यात आले आहे. ते सुपारी घेऊन अशी कामे करणारे मुंबईतील सराईत असल्याची माहिती पुढे येत आहे.दापोली तालुक्यातील गावतळे येथील चिरेखाण व्यावसायिक रूपेश पवार (वय ३५) आपल्या बोलेरो गाडीतून दापोलीहून गावतळेकडे जात होते. वाकवली दरम्यान उन्हवरे फाटा येथून ते पुढे निघाले, तेव्हा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीतून काहीजण खाली उतरले. त्यांनी पवार यांची गाडी अडवली. आपण सीबीआय आॅफिसर असल्याची बतावणी करीत त्यांनी पवार यांना धमकावण्यास सुरुवात केली आणि गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर इनोव्हा कारमध्ये कोंबले.यावेळी चांगलीच झटापट झाली. ही झटापट तेथील काही लोकांनी पाहिली. त्यांनी तेथून काही अंतरावर असलेले सामाजिक कार्यकर्ते नीलेश शेठ यांना दूरध्वनीवरून कळविले. नीलेश शेठ यांनी तत्काळ खेड पोलिसांना हा प्रकार कळविला. खेड पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेचच फिल्डिंग लावली. पोलीस कर्मचारी आप्पा दाभोळकर, नरेंद्र चव्हाण आणि अनंत मयेकर यांनी खेड शहरातील तीनबत्ती नाका येथे इनोव्हा कार अडवली आणि रमेश पवार यांची सुटका केली. इनोव्हामधील सहा अपहरणकर्त्यांसह गाडी (पान ५ वर)अटक केलेल्यांची नावेयाप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये अब्दुल हमीद सय्यद अहमद (विक्रोळी, मुंबई), गफार हमीद जहरअली, अनस सागर खान (कोपरखैरणे, नवी मुंबई), यतीन चिंतामणी चौगुले (डोंबिवली) पंकज लिंबू (ऐरोली, नवी मुंबई) शेख आबीद गफूर रौब (विक्रोळी, मुंबई) यांचा समावेश आहे. व्यावसायिक भागीदारीतून घटना ?फिर्यादी रूपेश बाजीराव पवार आणि चिपळूण येथील अश्विन मोरे यांची (कोळबांदरा, ता. दापोली) येथील चिरेखाण व्यवसायामध्ये भागीदारी होती. गेली दोन वर्षे या दोघांमध्ये इस्टेटसंबंधी मतभेद होते आणि सतत वादही होत होते. त्यावरून त्यांचे भांडणही झाले होते. हे भांडण मिटविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. यातूनच आपल्यावर मारेकरी पाठविल्याचा संशय पवार यांनी व्यक्त केला आहे.