शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

वीरांच्या स्मृतींनी आप्त हेलावले

By admin | Updated: September 24, 2015 00:12 IST

रत्नागिरी : भारत - पाक युद्धातील विजयाचा सुवर्ण महोत्सव

शोभना कांबळे - रत्नागिरी --१९६५ साली झालेल्या भारत - पाकिस्तान युद्धातील विजयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाने शहीद झालेल्यांच्या पराक्रमाच्या स्मृती जाग्या झाल्या अन् या स्मृतीनी त्यांच्या आप्तांना हेलावून टाकले. या कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना या साऱ्यांना अश्रू लपवता आले नाहीत.पाच महिने भारताचे पाकशी युद्ध सुरू होते. भारतीय सैनिकांनी जिवाची बाजी लावत, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पाकिस्तानला पळवून लावले व विजय मिळविला. मात्र, यात अनेक भारतीय सैनिकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. यात रत्नागिरी जिल्ह्यातील १५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका सैनिकाचा समावेश होता. या युद्धात अखेर विजय मिळालाच. यापैकी काही तर २०-२२व्या वर्षीच सैन्यात दाखल झाले होते. काही देशसेवेने भारलेले असल्याने आपल्या नववधूला, चार - सहा महिन्यांच्या चिमुकल्याला मागे टाकून युद्धासाठी गेले ते परत न येता मातृभूमीच्या कुशीतच कायमचे विसावले होते.या विजयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमिताने राज्याचा सैनिक कल्याण विभाग, तसेच माजी सैनिक संघटना, रत्नागिरी व सिंंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या युद्धात तसेच इतर युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींचा तसेच शौर्यपदक मिळालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील २८ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ अशा एकूण ५१ जणांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान १९६५ सालीच्या युद्धाची चित्रफीत दाखवण्यात आली होती. त्यामुळे या साऱ्यांना या युद्धभूमी दिसली होती. त्यामुळे आपला वीरसैनिक कसा लढला असेल, याची त्यांना कल्पना आली. त्यामुळे वीर माता - पिता, पत्नी यांचा सत्कार होताना त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. आपल्या पती किंवा पुत्राला गमावल्याचे दु:ख एवढी वर्षे सहन करीत असतानाच मातृभूमीसाठी त्याने आपले प्राण अर्पण केले आणि त्याच्या पराक्रमाबद्दलची कृतज्ञता याबद्दल आज आपला गौरव होतोय, याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 1१९६२, १९६५ आणि १९७१ अशा तीनही युद्धात सहभागी झालेल्या पांडुरंग राघो जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.2रत्नागिरीतील गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या मुलांनी ध्वजनिधीतून १० हजार रूपयांचा निधी सैनिकांच्या कल्याणासाठी मिळवून दिला आहे.3कर्नल नाईक यांनी माजी सैनिकांच्या अवलंबितांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमासाठी शाळांमधील मुले स्वयंसेवक होते. सत्कारमूर्तीचे नाव पुकारताच या वयोवृद्ध असलेल्या वीरमाता, वीरपत्नी यांच्याजवळ येऊन व्यासपीठावर घेऊन जाण्याचे काम ही मुले करीत होती. परत त्यांना जाग्यावर आणून बसविताना अनेक माता या मुलांच्या गालावरून मायेचा हात फिरवायला विसरल्या नाहीत.कार्यक्रमाचा प्रारंभ रत्नागिरीतील गायिका अंजली लिमये यांच्या प्रसिद्ध कवी प्रदीप यांचे गानकोकिळा लता मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या ‘ए मेरे वतने के लोगो’ या गाण्याने झाला. त्यामुळे सैनिकांच्या नातेवाईकांबरोबरच उपस्थित नागरिकांनाही गहिवरून आले. पुन्हा सत्कारादरम्यान लिमये यांनी ग. दि. माडगुळकर यांच्या ‘भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी’ या प्रसिद्ध रचनेने त्यांना आदरांजली अर्पण केली. या गाण्याने साऱ्यांनाच पुन्हा हेलावून टाकले. यावेळी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह पूर्णत: भारावून गेले होते.