शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

बांधकाम कामगारांसाठी मंत्र्यांसह बैठक

By admin | Updated: April 3, 2015 01:04 IST

शंकर पुजारी : ओरोस येथील मेळाव्यात दिली माहिती

कुडाळ : बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत कामगार विभागाचे सचिव, आयुक्त, बांधकाम मंडळाचे अध्यक्ष व आमदार, युनियन प्रतिनिधी यांची बैठक येत्या आठ दिवसांत घेण्यात येणार असल्याची माहिती ओरोस येथील बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात अध्यक्ष डॉ. शंकर पुजारी यांनी दिली. निवारा बांधकाम कामगार सिंधुुदुर्गच्यावतीने ओरोस येथील रवळनाथ मंदिर येथे बांधकाम कामगारांचा मेळावा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. पुजारी बोलत होते. यावेळी युनियनचे मंगेश नारिंग्रेकर, सोनल नारिंग्रेकर, गोपाळ पावसकर, नलिनी पावसकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. पुजारी म्हणाले, २७ मार्च रोजी मुंबई आझाद मैदान येथे बांधकाम संघटनांच्यावतीने मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच शिष्टमंडळाच्यावतीने महाराष्ट्राचे कामगारमंत्री प्रकाश मेहता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी कामगार विभागाचे सचिव, आयुक्त, बांधकाम मंडळाचे अध्यक्ष व आमदार, युनियन प्रतिनिधी यांची बैठक येत्या आठ दिवसांत घेण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. कामगार संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनासंबंधी शिष्टमंडळाच्यावतीने बोलताना कॉ. पुजारी म्हणाले, सध्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपकरामधून व्याजासहीत ४,२२८ कोटी रुपये जमा आहेत. त्यापैकी मागील चार वर्षांत कामगारांच्या कल्याणकारी योजनेवर फक्त १५९ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच कल्याणकारी योजनेच्या जाहिरातीसाठी ७०,००,००० कोटी रुपये खर्च केले आहेत. महाराष्ट्रात बांधकाम कामगारांची एकूण संख्या ५०,००,००० पेक्षाही जास्त आहे. त्यामधील फक्त २,८७,००० कामगारांनी कल्याणकारी मंडळाकडे लाभार्थी म्हणून नोंद केली असल्याची माहिती संघटनेच्या जनहित याचिके- मध्ये कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष एच. के. सावळे यांनी प्रतिज्ञापत्रासह दिल्याचे त्यांनी सांगितले. कामगार मंत्री यांना दिलेल्या निवेदनात अशी मागणी केली आहे की, सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील अद्याप ५००० कामगारांना प्रत्येकी ३००० रुपये घोषित योजनेनुसार मिळावयाचे आहेत. तसेच ४०० लाभार्थी कामगारांच्या मुलांना मागील एक वर्षापासून शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत. मागील दोन महिन्यांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० बांधकाम कामगारांनी रिसतर अर्ज करूनही त्यांना अद्याप मंडळाचे ओळखपत्र मिळाले नाही. मंबई उच्च न्यायालयामध्ये बांधकाम कामगारांना ६० वर्षांनंतर पेन्शन मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)